शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

सत्र प्रणालीच्या विरोधात राज्यातील कुलगुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 10:44 IST

पारंपरिक पदवी अभ्यासक्रमात सत्र प्रणाली बंद करण्यासंदर्भातील मुद्यावर ७ एप्रिल रोजी होणाऱ्या ‘जेबीव्हीसी’त (जॉईन्ट बोर्ड आॅफ व्हाईस चान्सलर्स) चर्चा होणार आहे. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे हेच यासंदर्भात प्रस्ताव मांडणार आहेत.

ठळक मुद्दे‘जेबीव्हीसी’मध्ये मुद्दा गाजणारकुलगुरु काणे मांडणार प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह राज्यातील सर्वच विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रमात सत्र प्रणाली सुरू करण्यात आली आहे. परंतु या प्रणालीमुळे विद्यार्थी केवळ परीक्षार्थी बनले असून त्यांचा विकास थांबला आहे. त्यामुळे पारंपरिक पदवी अभ्यासक्रमात सत्र प्रणाली बंद करण्यासंदर्भातील मुद्यावर ७ एप्रिल रोजी होणाऱ्या ‘जेबीव्हीसी’त (जॉईन्ट बोर्ड आॅफ व्हाईस चान्सलर्स) चर्चा होणार आहे. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे हेच यासंदर्भात प्रस्ताव मांडणार आहेत.विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमांनादेखील सत्र प्रणाली लागू केल्यामुळे विद्यापीठ व महाविद्यालये दोघांवरील ताणदेखील वाढला आहे. विद्यार्थी तर परीक्षार्थीच झाले आहेत. सत्रप्रणालीमुळे शिक्षकांना अभ्यासक्रम पूर्ण करणे व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन अशी दुहेरी कसरत करावी लागते. महाविद्यालयदेखील त्यात व्यस्त राहतात. विद्यार्थ्यांनादेखील अभ्यासाला वेळ मिळत नाही. मध्य प्रदेश व गुजरात या दोन्ही राज्यांनी विद्यार्थी हित लक्षात घेता पदवी अभ्यासक्रमांतील सत्रप्रणाली बंद केली.महाराष्ट्रातदेखील बी.ए. बीकॉम, बीएसस्सी या अभ्यासक्रमांना सत्र प्रणालीपासून दूर ठेवण्यात यावे, असे अनेक विद्यापीठांच्या कुलगुरुंचे मत आहे. यासंदर्भात राज्य शासनासमोर मागणी मांडण्यात येणार असून ‘जेबीव्हीसी’समोर डॉ.काणे हा प्रस्ताव मांडणार आहेत.

विधीसभेत झाली होती चर्चासत्रप्रणालीच्या दुष्पपरिणामासंदर्भात नागपूर विद्यापीठाच्या विधीसभेत सखोल चर्चा झाली होती. अ‍ॅड.मनमोहन बाजपेयी, डॉ.बबन तायवाडे यांनी हा मुद्दा उचलून धरला होता. यावेळी कुलगुरूंनीदेखील सत्र प्रणालीच्या विरोधातच भूमिका मांडली होती. सत्रप्रणाली विद्यार्थी, विद्यापीठ व महाविद्यालयांसाठी गैरसोयीचीच आहे. या मुद्यावर आम्ही अगोदर चर्चा केली होती. ही प्रणाली दूर करण्याचे अधिकार शासनाला आहेत. त्यामुळे शासनदरबारी हा मुद्दा मांडण्याची गरज आहे. ७ एप्रिल रोजी मुंबई येथे ‘जेबीव्हीसी’ची (जॉईन्ट बोर्ड आॅफ व्हाईस चान्सलर्स) बैठक आहे. यात सत्रप्रणाली हद्दपार करण्यासंदर्भातील भूमिका ठामपणे मांडण्यात येईल, असे कुलगुरुंनी सांगितले.

पदभरतीवरदेखील होणार चर्चा‘जेबीव्हीसी’मध्ये विद्यापीठांमधील रखडलेली पदभरती, नॅशनल रँकिंग, प्राचार्यांच्या निवृत्तीचे वय, पदवी प्रदान करणे,मॉडेल कॉलेज याबद्दल चर्चा करण्यात येणार आहे, असे कुलगुरूंनी सांगितले. पदभरती बंद असल्यामुळे नॅक मूल्यांकनात त्याचा अडसर निर्माण होणार आहे. त्यामुळे हा मुद्दादेखील प्रकर्षाने मांडण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ