शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते गाडे गुरुजी अनंतात विलीन

By admin | Updated: June 26, 2014 00:58 IST

ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते वसंतराव गाडे उपाख्य गाडे गुरुजी यांच्यावर बुधवारी अंबाझरी घाट येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वोदयी कार्यकर्त्या अपर्णा नंदागळे यांनी

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार नागपूर : ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते वसंतराव गाडे उपाख्य गाडे गुरुजी यांच्यावर बुधवारी अंबाझरी घाट येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्वोदयी कार्यकर्त्या अपर्णा नंदागळे यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यावेळी गांधीवादी आणि सर्वोदयी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. जी.एम. टावरी यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा घेण्यात आली. यावेळी माजी कुलगुरूहरिभाऊ केदार यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली. ते म्हणाले गाडे गुरुजी यांनी संस्कारक्षम नवी पिढी घडवण्याचे कार्य केले. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आपण कार्यरत राहू. अ‍ॅड. मा.म. गडकरी यांनी महात्मा गांधीजींच्या खऱ्या वारसदारांपैकी गाडे गुरुजी एक असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय प्रा. दिलीप महल्ले, भाऊ भोगे, यादवराव देवगडे, सु.श्री पांढरीपांडे, मंजूषा सावरकर, गाडे गुरुजींचे सहकारी अरुण देशपांडे, जयंत नंदापुरे, प्रा. ए.एस. उखळकर, वाघे गुरुजी यांनी गाडे गुरुजी यांच्या स्मृतींना उजाळा देत शोकसंवेदना व्यक्त केल्या. अरविंद देशमुख यांनी संचालन केले. पवनारच्या धाम नदीत होणार अस्थिविसर्जन गाडे गुरुजी हे संस्कार परिवाराचे प्रणेते होते. गीताईच्या प्रचारासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. खेडोपाडी त्यांनी संस्कार केंद्र सुरू केलीत. सर्वोदयी विचारांच्या या चिंतकाचे अस्थिविसर्जन हे उद्या गुरुवारी पवनार येथील धाम नदीमध्ये करण्यात येईल, असे त्यांचे सहकारी अरुण देशपांडे उपाख्य देशपांडे गुरुजी यांनी शोकसभेनंतर जाहीर केले. (प्रतिनिधी)गाडे गुरुजींचे होणार संस्कार स्मारक उमरेड रोडवर सर्वोदय आश्रमाची काही एकर जागा आहे. या जागेवर गाडे गुरुजी यांचे संस्कार स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाडे गुरुजी यांचे सुद्धा या स्मारकाला समर्थन होते. अरविंद देशमुख यांनी त्यासाठी सर्वप्रथम एक लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. आणखी काही लोक मदत करीत आहेत. गाडे गुरुजींचे हे स्मारक लवकरच उभारण्यात येणार असून यात लहान मुलांना संस्कारांचे धडे दिले जातील, असे देशपांडे गुरुजी यांनी संगितले. अंत्यसंस्कारातूनही संदेश गाडे गुरुजी यांनी आयुष्यभर समाजाचाच विचार केला. संस्कारक्षम पिढी घडवण्याचे कार्य केले. परंतु आपल्या मृत्यूनंतरही त्यांचे हे कार्य सुरू राहिले, याची प्रचिती बुधवारी त्यांच्या अंत्यसंस्कारातूनही दिसून आली. पर्यावरणाच्या दृष्टीने पार्थिव जाळण्यासाठी लाकडांऐवजी १०० टक्के गोवऱ्यांचा वापर करून करण्यात येत आहे. महापालिकेच्या सहकार्याने अंबाझरी घाटावर याचा प्रयोगिक तत्त्वावर वापर महिनाभरापूर्वी सुरू झाला. गाडे गुरुजी यांच्यावर पार्थिवावरही याच पद्धतीने संपूर्णपणे पर्यावरणाला पोषण असे हे अंत्यसंस्कार करण्यात आले.