शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

ॲड. सतीश उकेंच्या अटकेवरून पटोले-फडणवीसांमध्ये कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2022 19:58 IST

Nagpur News ॲड. सतीश उके यांना ईडीने अटक केल्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.

ठळक मुद्देमाझे वकील असल्यानेच उके यांच्यावर कारवाई : नाना पटोलेनागपूर पोलिसांकडून आधीच गुन्हा दाखल : फडणवीस

नागपूर : ॲड. सतीश उके यांना ईडीने अटक केल्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. सतीश उके हे माझे वकील आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर ईडीने कारवाई केली असल्याचा आरोप पटोले यांनी शुक्रवारी नागपुरात केला. तर फडणवीस यांनी हे आरोप फेटाळत उके यांच्यावर नागपूर पोलिसांनी आधीच गुन्हा दाखल केला असून, त्याच पीडित व्यक्तीने ईडीकडेही तक्रार केली असल्याचा दावा केला आहे.

पटोले म्हणाले, राज्यात कॉंग्रेसचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे आता पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केले जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरुद्ध दाखल याचिकेमध्ये ॲड. उके यांनी बाजू मांडली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. उके हे वकील आहेत. उद्या ते भाजप नेत्यांचीही बाजू न्यायालयात मांडू शकतात. परंतु या प्रकरणात आपले नाव जाणीवपूर्वक जोडले जात असल्याचा आरोपही पटोले यांनी केला. दहशतवाद किंवा अमली पदार्थांशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी ईडीची स्थापना करण्यात आली होती. मात्र, आता कोणतेही प्रकरण ईडीकडे सोपविले जाते. भाजपने ईडीचे महत्त्वच संपविले आहे, अशी टीका त्यांनी केली.

पटोलेंच्या आरोपांवर बोलताना फडणवीस म्हणाले, एका जमीन व्यवहार प्रकरणात नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून ईडीकडे तक्रार केली होती. त्या आधारावर ईडीने कारवाई केली आहे. ॲड. उके यांना न्यायाधीशांचा अवमान केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. अल्पसंख्याक समाजाची मते घेण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा लागली आहे. अल्पसंख्याक मतांसाठी दहशतीचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस