शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

उपजिल्हा रुग्णालयातील व्हेंटिलेटर धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाच व्हेंटिलेटरची साेय करण्यात आली हाेती. मध्यंतरी या रुग्णालयातील तज्ज्ञ ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाच व्हेंटिलेटरची साेय करण्यात आली हाेती. मध्यंतरी या रुग्णालयातील तज्ज्ञ डाॅक्टरांची इतरत्र बदली करण्यात आल्याने तसेच त्यांच्या जागी कुणाचीही नियुक्ती करण्यात न आल्याने ते पाचही व्हेंटिलेटर धूळखात पडले आहेत. काेराेना संक्रमण काळात रुग्णांना व्हेंटिलेटर व ऑक्सिजनची नितांत आवश्यकता असल्याने तसेच रुग्णालयात खाटांची कमतरता जाणवत असल्याने हा प्रकार उघड झाला.

रामटेक शहरात उपजिल्हा रुग्णालय, नगर पालिकेचे सूतिकागृह व याेगीराज हाॅस्पिटलमध्ये काेविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. परंतु, या तिन्ही ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता जाणवत असून, व्हेंटिलेटरची गरज भासत आहे. या मूलभूत साेयी उपलब्ध झाल्यास रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालय सुसज्ज काेविड केअर सेंटर हाेऊ शकते. या उपजिल्हा रुग्णालयात काही वर्षांपूर्वी पाच व्हेंटिलेटर आणले हाेते.

डॉ. जफर अब्बास असगर अली यांना हे व्हेंटिलेटर ऑपरेट करण्याचा अनुभव हाेता. ते तालुक्यातील एकमेव भूलतज्ज्ञ हाेते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये डॉ. जफर अब्बास असगर अली यांना ८ मार्च २०२१ राेजी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले. त्यांच्या जागी कुणाचीही नियुक्ती करण्यात न आल्याने तसेच इतर डाॅक्टरांना व्हेंटिलेटर ऑपरेट करता येत नसल्याने ते धूळखात पडले आहेत.

ही बाब लक्षात येताच काॅंग्रेसचे पदाधिकारी उदयसिंग यादव यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांना निवेदन देऊन ही समस्या साेडविण्याची मागणी केली हाेती. या मागणीची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. पातूरकर यांनी आ. आशिष जयस्वाल यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. २१) उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत व्हेंटिलेटरची पाहणी केली. यावर पुढे काय कारवाई केली जाईल, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

....

कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात अनेक महत्त्वाची पदे रिक्त आहेत. यात वैद्यकीय अधिकारी, जनरल फिजिशियन, बालराेगतज्ज्ञ, डाेळ्यांचे डॉक्टर या महत्त्वाच्या तज्ज्ञ डाॅक्टरांसह मुख्य परिसेविका, सहायक परिसेविका, दाेन फार्मासिस्ट, दाेन लॅब टेक्निशियन, एक एक्सरे टेक्निशियन, वरिष्ठ लिपिक, अधीक्षक, लिपिक अशी महत्त्वाची पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. येथील आराेग्य सेवा रुळावर आणण्यासाठी ही सर्व पदे कंत्राटी पद्धतीने का हाेईना तातडीने भरणे गरजेचे आहे.