शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

भाजीपाल्याचे ‘कॉर्पोरेट’ मार्केटिंग

By admin | Updated: June 15, 2015 03:11 IST

भाजीपाला विक्री म्हणजे एक किरकोळ उद्योग. समाजातही त्याला फारशी प्रतिष्ठा नाहीच.

जीवन रामावत नागपूरभाजीपाला विक्री म्हणजे एक किरकोळ उद्योग. समाजातही त्याला फारशी प्रतिष्ठा नाहीच. त्यामुळे कोणताही सुशिक्षित तरुण तो करण्याची हिंमत करीत नाही. मात्र एका तरुणाने या किरकोळ समजल्या जाणाऱ्या भाजीपाला विक्रीतून छोटा उद्योग उभा केला आहे, शिवाय शेतकऱ्यांना ‘कॉर्पोरेट’ मार्केटिंगची दिशा दाखविली आहे. ओम पाटील असे त्या तरुणाचे नाव आहे.बँकेतील नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली. परंतु कोणताही व्यवसाय म्हटले की, त्यासाठी लाखो रुपयांचे भांडवल लागते. त्यावेळी ओमच्या खिशात मात्र केवळ दोन हजार रुपये होते, पण तरीही तो हिंमत हरला नाही. जिद्द व चिकाटीच्या बळावर त्याने भाजीपाला विक्रीचे दुकान सुरू केले आणि आज यशस्वी व्यवसायी झाला. तो संघर्ष करीत असताना त्याला पणन महामंडळाच्या ‘शेतकऱ्यांचा भाजीपाला ग्राहकांच्या दारी’ या योजनेची माहिती मिळाली. स्वत: शेतकऱ्याचा मुलगा असल्याने त्याला ती योजना पटली. त्यानुसार त्याने लगेच पणन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊ न योजना समजून घेतली आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत त्याने खिशात कोणतेही भांडवल नसताना भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. भांडे प्लॉट परिसरातील निर्मलनगरी येथे भाजीपाला विक्रीचे पहिले दुकान थाटले. त्याला ग्राहकांचा फार मोठा प्रतिसाद मिळाला. त्यातून त्याला चांगला पैसा मिळू लागला, शिवाय त्याचा आत्मविश्वासही वाढला. यानंतर त्याने सात शेतकऱ्यांना एकत्रित करू न ओम असोसिएट स्वयंसहाय्यता शेतकरी गट स्थापन केला. पुढे पणन महामंडळाकडून एक गाडी भाड्याने घेऊ न, आता त्या गाडीतून भाजीपाला विक्री करीत आहे, तसेच कृषी विभागाच्या मदतीने जाफरनगर येथे गे्रडिंग व पॅकिंग सेंटर उभारले. या सेंटरवर शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला भाजीपाला स्वच्छ करू न त्याचे पॅकिंग केल्या जाते. यानंतर आॅर्डरप्रमाणे तो घरपोच पोहोचून दिल्या जातो. अशाप्रकारे तो सुमारे ६०० ग्राहकांना भाजीपाला पोहोचवितो. यातून ओमला दर महिन्याला ७० ते ८० हजार रुपये उत्पन्न मिळत असल्याचे तो म्हणाला. ७० तरुणांना रोजगार सध्या ६०० पेक्षा अधिक ग्राहकांना घरपोच भाजीपाला पोहोचविला जात असून, यातून ६० ते ७० तरुणांना रोजगार दिल्याचे समाधान यावेळी ओमने व्यक्त केले. शिवाय लवकरच शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांमध्येही भाजीपाला पोहोचविण्याची योजना असल्याचे तो म्हणाला. त्याच्या या भाजीपाल्याला दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. यातून त्याला चांगला नफा मिळत असून, शेतकऱ्यांनासुद्धा त्यांच्या भाजीपाल्याला योग्य भाव मिळत आहे. कृषी व पणन महामंडळाने शहरात सुमारे २० ते २५ गाड्यांचे वाटप केले असून, त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा भाजीपाला ग्राहकांपर्यंत पोहोचविला जात आहे. नोकरी सोडून थाटले दुकान ओमने बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण करू न बँकेत नोकरी मिळविली. परंतु काहीच दिवसांत त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली. मात्र १५ हजार रुपयांच्या पगारात घर चालविणे त्याला कठीण झाले. शेवटी त्याने नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला. आज तो यात यशस्वी झाला असून, इतर तरुणांनाही रोजगार उपलब्ध करू न दिला आहे.