शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

वरुण गांधी भाजपाकडून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:55 IST

एकेकाळी भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये मोजले जाणारे व युवकांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकडून प्रोजेक्ट केले जाणारे खासदार वरुण गांधी यांची शुक्रवारी भाजपाकडून फारशी दखल ....

ठळक मुद्देस्वागतासाठी मोठे नेते नाहीत : कार्यकर्त्यांचीही गर्दी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये मोजले जाणारे व युवकांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकडून प्रोजेक्ट केले जाणारे खासदार वरुण गांधी यांची शुक्रवारी भाजपाकडून फारशी दखल न घेण्यात आल्याचे पहायला मिळाले. एका कार्यक्रमासाठी नागपुरात आलेल्या वरुण गांधी यांच्या स्वागतासाठी भाजपाचे मोठे नेते तर दूरच पण एरव्ही विमानतळावर हारतुरे घेऊन आघाडीवर राहणारे सक्रिय कार्यकर्तेही पोहचले नाहीत. भाजपाकडून गांधी यांना अशी वागणूक का मिळाली हा चर्चेचा विषय ठरला आहे.भाजपाच्या राजकारणात नागपूरचे वाढलेले महत्त्व विचारात घेता येथे येणाºया भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांचे जोशात स्वागत होत असल्याचे पहायला मिळते. वरुण गांधी यांचे दुपारी १२ च्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी भाजपाचे नेते उपस्थित नव्हते. हे चित्र पाहून तेथे उपस्थित त्यांच्या समर्थकांनाही धक्का बसला. त्यानंतर गांधी हे एका हॉटेलमध्ये पोहचले. तेथेही त्यांच्या भेटीसाठी भाजपाचे नेते किंवा कार्यकर्ते पोहचले नाहीत. विधानसभा अधिवेशन सुरू असल्यामुळे सर्व आमदार मुंबईत आहेत. त्यामुळे मोठे नेते उपस्थित नव्हते, असा खुलासा भाजपाच्या एका नेत्याने केला.मात्र, स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, नगरसेवक यांनीही सपशेल पाठ फिरविली. भाजपाकडून न मिळालेला प्रतिसाद वरुण गांधी यांनाही खटकल्याचे जाणवले. त्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी असे काहीच नाही म्हणत विषय टाळला.शेतकºयांच्या प्रश्नावर सरकार संवेदनशील असावेप्रत्येक राज्य सरकारने शेतकºयांच्या प्रश्नांवर संवेदनशील असले पाहिजे. मग तो प्रश्न कृषी अनुदानाचा असो की कर्जमाफीचा. उत्तर प्रदेशमध्ये कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकºयांना मदत करण्यासाठी आपण स्वत: सव्वा कोटी रुपये दिले. त्यानंतर दानदात्यांकडून २६ कोटी रुपये गोळा करून ते सुमारे चार हजार शेतकºयांना वितरित करण्यात आले, असेही गांधी यांनी सांगितले.कुणाच्या आशीर्वादाशिवाय तरुणांनाराजकारणात पद मिळत नाहीदेशात अनेक तरुण व सामान्य लोक आहेत, ज्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे, गुणवत्ता आहे. मात्र, त्यांना राजकारणात प्रवेश करण्यासाठी खूप धडपड करावी लागते. जोवर एखाद्या बड्या व्यक्तीचा आशीर्वाद मिळत नाही तोवर युवकांना राजकारणात महत्त्वाचे पद मिळत नाही. हे चित्र बदलण्याची आवश्यकता आहे, असे मत वरुण गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. देश स्वतंत्र झाला तेव्हा भारतीयांचे सरासरी वय ३८ होते. आता ते कमी होऊन २४ वर आले आहे. देश तरुण झाला आहे. दुसरीकडे त्यावेळी खासदारांचे सरासरी वय ४५ होते. ते आता ५९ पर्यंत वाढले आहे. ही दरी भरावी लागेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. खासदारांचे वेतन व भत्ते ठरविण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात यावा. वेतन वाढविण्याचा अधिकार खासदारांना नसावा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.