शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वरुण गांधी भाजपाकडून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:55 IST

एकेकाळी भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये मोजले जाणारे व युवकांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकडून प्रोजेक्ट केले जाणारे खासदार वरुण गांधी यांची शुक्रवारी भाजपाकडून फारशी दखल ....

ठळक मुद्देस्वागतासाठी मोठे नेते नाहीत : कार्यकर्त्यांचीही गर्दी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये मोजले जाणारे व युवकांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकडून प्रोजेक्ट केले जाणारे खासदार वरुण गांधी यांची शुक्रवारी भाजपाकडून फारशी दखल न घेण्यात आल्याचे पहायला मिळाले. एका कार्यक्रमासाठी नागपुरात आलेल्या वरुण गांधी यांच्या स्वागतासाठी भाजपाचे मोठे नेते तर दूरच पण एरव्ही विमानतळावर हारतुरे घेऊन आघाडीवर राहणारे सक्रिय कार्यकर्तेही पोहचले नाहीत. भाजपाकडून गांधी यांना अशी वागणूक का मिळाली हा चर्चेचा विषय ठरला आहे.भाजपाच्या राजकारणात नागपूरचे वाढलेले महत्त्व विचारात घेता येथे येणाºया भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांचे जोशात स्वागत होत असल्याचे पहायला मिळते. वरुण गांधी यांचे दुपारी १२ च्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी भाजपाचे नेते उपस्थित नव्हते. हे चित्र पाहून तेथे उपस्थित त्यांच्या समर्थकांनाही धक्का बसला. त्यानंतर गांधी हे एका हॉटेलमध्ये पोहचले. तेथेही त्यांच्या भेटीसाठी भाजपाचे नेते किंवा कार्यकर्ते पोहचले नाहीत. विधानसभा अधिवेशन सुरू असल्यामुळे सर्व आमदार मुंबईत आहेत. त्यामुळे मोठे नेते उपस्थित नव्हते, असा खुलासा भाजपाच्या एका नेत्याने केला.मात्र, स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, नगरसेवक यांनीही सपशेल पाठ फिरविली. भाजपाकडून न मिळालेला प्रतिसाद वरुण गांधी यांनाही खटकल्याचे जाणवले. त्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी असे काहीच नाही म्हणत विषय टाळला.शेतकºयांच्या प्रश्नावर सरकार संवेदनशील असावेप्रत्येक राज्य सरकारने शेतकºयांच्या प्रश्नांवर संवेदनशील असले पाहिजे. मग तो प्रश्न कृषी अनुदानाचा असो की कर्जमाफीचा. उत्तर प्रदेशमध्ये कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकºयांना मदत करण्यासाठी आपण स्वत: सव्वा कोटी रुपये दिले. त्यानंतर दानदात्यांकडून २६ कोटी रुपये गोळा करून ते सुमारे चार हजार शेतकºयांना वितरित करण्यात आले, असेही गांधी यांनी सांगितले.कुणाच्या आशीर्वादाशिवाय तरुणांनाराजकारणात पद मिळत नाहीदेशात अनेक तरुण व सामान्य लोक आहेत, ज्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे, गुणवत्ता आहे. मात्र, त्यांना राजकारणात प्रवेश करण्यासाठी खूप धडपड करावी लागते. जोवर एखाद्या बड्या व्यक्तीचा आशीर्वाद मिळत नाही तोवर युवकांना राजकारणात महत्त्वाचे पद मिळत नाही. हे चित्र बदलण्याची आवश्यकता आहे, असे मत वरुण गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. देश स्वतंत्र झाला तेव्हा भारतीयांचे सरासरी वय ३८ होते. आता ते कमी होऊन २४ वर आले आहे. देश तरुण झाला आहे. दुसरीकडे त्यावेळी खासदारांचे सरासरी वय ४५ होते. ते आता ५९ पर्यंत वाढले आहे. ही दरी भरावी लागेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. खासदारांचे वेतन व भत्ते ठरविण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात यावा. वेतन वाढविण्याचा अधिकार खासदारांना नसावा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.