शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

वरुण गांधी भाजपाकडून बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 00:55 IST

एकेकाळी भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये मोजले जाणारे व युवकांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकडून प्रोजेक्ट केले जाणारे खासदार वरुण गांधी यांची शुक्रवारी भाजपाकडून फारशी दखल ....

ठळक मुद्देस्वागतासाठी मोठे नेते नाहीत : कार्यकर्त्यांचीही गर्दी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये मोजले जाणारे व युवकांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकडून प्रोजेक्ट केले जाणारे खासदार वरुण गांधी यांची शुक्रवारी भाजपाकडून फारशी दखल न घेण्यात आल्याचे पहायला मिळाले. एका कार्यक्रमासाठी नागपुरात आलेल्या वरुण गांधी यांच्या स्वागतासाठी भाजपाचे मोठे नेते तर दूरच पण एरव्ही विमानतळावर हारतुरे घेऊन आघाडीवर राहणारे सक्रिय कार्यकर्तेही पोहचले नाहीत. भाजपाकडून गांधी यांना अशी वागणूक का मिळाली हा चर्चेचा विषय ठरला आहे.भाजपाच्या राजकारणात नागपूरचे वाढलेले महत्त्व विचारात घेता येथे येणाºया भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांचे जोशात स्वागत होत असल्याचे पहायला मिळते. वरुण गांधी यांचे दुपारी १२ च्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी भाजपाचे नेते उपस्थित नव्हते. हे चित्र पाहून तेथे उपस्थित त्यांच्या समर्थकांनाही धक्का बसला. त्यानंतर गांधी हे एका हॉटेलमध्ये पोहचले. तेथेही त्यांच्या भेटीसाठी भाजपाचे नेते किंवा कार्यकर्ते पोहचले नाहीत. विधानसभा अधिवेशन सुरू असल्यामुळे सर्व आमदार मुंबईत आहेत. त्यामुळे मोठे नेते उपस्थित नव्हते, असा खुलासा भाजपाच्या एका नेत्याने केला.मात्र, स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, नगरसेवक यांनीही सपशेल पाठ फिरविली. भाजपाकडून न मिळालेला प्रतिसाद वरुण गांधी यांनाही खटकल्याचे जाणवले. त्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी असे काहीच नाही म्हणत विषय टाळला.शेतकºयांच्या प्रश्नावर सरकार संवेदनशील असावेप्रत्येक राज्य सरकारने शेतकºयांच्या प्रश्नांवर संवेदनशील असले पाहिजे. मग तो प्रश्न कृषी अनुदानाचा असो की कर्जमाफीचा. उत्तर प्रदेशमध्ये कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकºयांना मदत करण्यासाठी आपण स्वत: सव्वा कोटी रुपये दिले. त्यानंतर दानदात्यांकडून २६ कोटी रुपये गोळा करून ते सुमारे चार हजार शेतकºयांना वितरित करण्यात आले, असेही गांधी यांनी सांगितले.कुणाच्या आशीर्वादाशिवाय तरुणांनाराजकारणात पद मिळत नाहीदेशात अनेक तरुण व सामान्य लोक आहेत, ज्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे, गुणवत्ता आहे. मात्र, त्यांना राजकारणात प्रवेश करण्यासाठी खूप धडपड करावी लागते. जोवर एखाद्या बड्या व्यक्तीचा आशीर्वाद मिळत नाही तोवर युवकांना राजकारणात महत्त्वाचे पद मिळत नाही. हे चित्र बदलण्याची आवश्यकता आहे, असे मत वरुण गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. देश स्वतंत्र झाला तेव्हा भारतीयांचे सरासरी वय ३८ होते. आता ते कमी होऊन २४ वर आले आहे. देश तरुण झाला आहे. दुसरीकडे त्यावेळी खासदारांचे सरासरी वय ४५ होते. ते आता ५९ पर्यंत वाढले आहे. ही दरी भरावी लागेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. खासदारांचे वेतन व भत्ते ठरविण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात यावा. वेतन वाढविण्याचा अधिकार खासदारांना नसावा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.