शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित रेल्वे परिचालनासाठी मध्य रेल्वेच्या विविध उपाययोजना

By नरेश डोंगरे | Updated: December 20, 2023 00:43 IST

एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान मध्य रेल्वेने एकूण ३० गेट केले बंद

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: अपघातमुक्त सेवा देऊन रेल्वेच्या सुरक्षित संचालनासाठी मध्य रेल्वेने गेल्या काही महिन्यांपासून अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याचा चांगला परिणाम समोर येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो आणि नंतर रेल्वे प्रशासनासोबतच प्रवाशांनाही मोठा मनस्ताप मिळतो. तो टाळण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने लेव्हल क्रॉसिंग गेट बंद करणे, रेल्वे डबे आणि शक्ती यान मध्ये धूर प्रतिबंधक उपकरणांची तरतूद करणे, आंतर-रेल्वे सुरक्षा लेखापरीक्षण करून अपघाताच्या मॉक ड्रिल घेणे आदींवर भर दिला आहे.

रोड लेव्हल क्रॉसिंग गेटमुळे नागरिकांना त्रास होतो. अपघाताची भीती असते. त्यामुळे ओव्हर किंवा अंडर ब्रीज बांधून सर्व रोड क्रॉसिंग गेट बंद करण्यात येत आहेत. एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान मध्य रेल्वेने एकूण ३० गेट बंद केले आहेत. त्यात भुसावळ विभागातील १०, नागपूर विभागातील ८, पुणे विभाग ६, मुंबई ५ आणि सोलापूर विभागातील एका गेटचा समावेश आहे. रेल्वे गाडीत आगीचा धोका रोखण्यासाठी रेल्वे गाडीचे डबे आणि शक्तियानमध्ये धूर शोधक आणि धूर शामक यंत्रणा लावली जात असून, गेल्या ८ महिन्यांत विविध रेल्वेगाड्यांच्या डब्यांमध्ये ८८ एकूण ४२० धूर शोधक यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत.

या शिवाय ब्लॉक प्रोव्हिंग एक्सल काउंटर सिस्टम, ओएचई मास्टचे क्रिटिकल इम्प्लांटेशन, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसह सिग्नलिंग गिअर्स सिस्टम कार्यान्वित करण्यात आली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर-२०२३ या कालावधीत आतापर्यंत एकूण ८२ सुरक्षा सचोटी चाचण्या घेण्यात आल्या आहेत ज्यात नागपूर विभागातील २३, सोलापूर विभागातील १७, पुणे विभागातील १० आणि मुंबई आणि भुसावळ विभागातील प्रत्येकी १६ चाचण्यांचा समावेश आहे. उत्तम सुरक्षा उपाय सुनिश्चित करण्यासाठी आणि कोणत्याही त्रुटी व पूर्वाग्रह दूर करण्यासाठी निष्पक्ष लेखापरीक्षण करण्याचा नियमित प्रयत्न असतो. यामध्ये रेल्वे बोर्डाने नामनिर्देशित केलेल्या क्षेत्रीय वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक टीम असते जी बोर्डाच्या सूचनेनुसार इतर क्षेत्रांना भेट देऊन थर्ड पार्टी सुरक्षा लेखापरीक्षण करतात. त्याचप्रमाणे अपघात झाल्यास तातडीने कोणत्या आणि कशा उपाययोजना करायच्या त्यासाठी ठिकठिकाणी अकस्मात मॉक ड्रिल घेतल्या जात आहेत.

चर्चा सत्र, शिबिरे आणि समुपदेशन

प्रवाशांना अपघातमुक्त सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षा चर्चासत्र, शिबिरे आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठकी घेऊन त्यांचे समुपदेशन केले जात आहे. या सर्व उपाययोजनांचे चांगले परिणाम दिसून येत असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे