शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

सुरक्षित रेल्वे परिचालनासाठी मध्य रेल्वेच्या विविध उपाययोजना

By नरेश डोंगरे | Updated: December 20, 2023 00:43 IST

एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान मध्य रेल्वेने एकूण ३० गेट केले बंद

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: अपघातमुक्त सेवा देऊन रेल्वेच्या सुरक्षित संचालनासाठी मध्य रेल्वेने गेल्या काही महिन्यांपासून अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याचा चांगला परिणाम समोर येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो आणि नंतर रेल्वे प्रशासनासोबतच प्रवाशांनाही मोठा मनस्ताप मिळतो. तो टाळण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने लेव्हल क्रॉसिंग गेट बंद करणे, रेल्वे डबे आणि शक्ती यान मध्ये धूर प्रतिबंधक उपकरणांची तरतूद करणे, आंतर-रेल्वे सुरक्षा लेखापरीक्षण करून अपघाताच्या मॉक ड्रिल घेणे आदींवर भर दिला आहे.

रोड लेव्हल क्रॉसिंग गेटमुळे नागरिकांना त्रास होतो. अपघाताची भीती असते. त्यामुळे ओव्हर किंवा अंडर ब्रीज बांधून सर्व रोड क्रॉसिंग गेट बंद करण्यात येत आहेत. एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान मध्य रेल्वेने एकूण ३० गेट बंद केले आहेत. त्यात भुसावळ विभागातील १०, नागपूर विभागातील ८, पुणे विभाग ६, मुंबई ५ आणि सोलापूर विभागातील एका गेटचा समावेश आहे. रेल्वे गाडीत आगीचा धोका रोखण्यासाठी रेल्वे गाडीचे डबे आणि शक्तियानमध्ये धूर शोधक आणि धूर शामक यंत्रणा लावली जात असून, गेल्या ८ महिन्यांत विविध रेल्वेगाड्यांच्या डब्यांमध्ये ८८ एकूण ४२० धूर शोधक यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत.

या शिवाय ब्लॉक प्रोव्हिंग एक्सल काउंटर सिस्टम, ओएचई मास्टचे क्रिटिकल इम्प्लांटेशन, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसह सिग्नलिंग गिअर्स सिस्टम कार्यान्वित करण्यात आली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर-२०२३ या कालावधीत आतापर्यंत एकूण ८२ सुरक्षा सचोटी चाचण्या घेण्यात आल्या आहेत ज्यात नागपूर विभागातील २३, सोलापूर विभागातील १७, पुणे विभागातील १० आणि मुंबई आणि भुसावळ विभागातील प्रत्येकी १६ चाचण्यांचा समावेश आहे. उत्तम सुरक्षा उपाय सुनिश्चित करण्यासाठी आणि कोणत्याही त्रुटी व पूर्वाग्रह दूर करण्यासाठी निष्पक्ष लेखापरीक्षण करण्याचा नियमित प्रयत्न असतो. यामध्ये रेल्वे बोर्डाने नामनिर्देशित केलेल्या क्षेत्रीय वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक टीम असते जी बोर्डाच्या सूचनेनुसार इतर क्षेत्रांना भेट देऊन थर्ड पार्टी सुरक्षा लेखापरीक्षण करतात. त्याचप्रमाणे अपघात झाल्यास तातडीने कोणत्या आणि कशा उपाययोजना करायच्या त्यासाठी ठिकठिकाणी अकस्मात मॉक ड्रिल घेतल्या जात आहेत.

चर्चा सत्र, शिबिरे आणि समुपदेशन

प्रवाशांना अपघातमुक्त सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षा चर्चासत्र, शिबिरे आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठकी घेऊन त्यांचे समुपदेशन केले जात आहे. या सर्व उपाययोजनांचे चांगले परिणाम दिसून येत असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे