शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

‘वंदे मातरम’ला विरोध खेदजनकच - सुधाकर गायधनी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 21:26 IST

धर्माच्या नावावर ‘वंदे मातरम्’ला होणारा विरोध हा अतिशय खेदजनक प्रकार आहे. ज्याला ‘वंदे मातरम्’ कळते त्याला देश कळतो, असे मत ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांनी व्यक्त केले

नागपूर, दि. 29 - स्वातंत्र्यलढ्यामध्ये ‘वंदे मातरम’ने संपूर्ण देशाला प्रेरणा दिली होती. राष्ट्रचेतनेचे व शक्तीचे प्रतिक असलेले हे गीत आहे. मात्र आता धर्माच्या नावावर ‘वंदे मातरम्’ला होणारा विरोध हा अतिशय खेदजनक प्रकार आहे. ज्याला ‘वंदे मातरम्’ कळते त्याला देश कळतो, असे मत ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांनी व्यक्त केले. वामन गाणार लिखित ‘अंदमान की व्यथा, निकोबार की कथा’ या पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.‘वंदे मातरम्’ या गीताने देशभरात स्फुल्लिंग जागविले होते. त्याला धर्म, पंथाच्या मर्यादा नव्हत्या. क्रांतिकारक अशफाक उल्ला खान यांनी तर फाशीवर जाताना ‘वंदे मातरम’चाच नारा दिला होता. असे असताना धर्माच्या नावावर आता याच गीताला विरोध होत आहे ही दुर्दैवी बाब आहे, असे सुधाकर गायधनी म्हणाले. स्वातंत्र्याच्या चळवळीत अगणित लोकांनी हौतात्म्य पत्करले. मात्र अद्यापही स्वातंत्र्यलढ्याचा संपूर्ण इतिहास हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळेच स्वातंत्र्याची किंमत लोकांना कळत नाही, असे मत नानाभाऊ एंबडवार यांनी व्यक्त केले.