शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

वाल्मिकी समाजाची प्रगती व्हावी

By admin | Updated: August 29, 2015 03:18 IST

वाल्मिकी समाजाने इतर समाजाची जेवढी सेवा केली, तेवढी इतर कोणत्याही समाजाने केलेली नाही.

परिचय मेळावा : मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन नागपूर : वाल्मिकी समाजाने इतर समाजाची जेवढी सेवा केली, तेवढी इतर कोणत्याही समाजाने केलेली नाही. त्यामुळे आजच्या सामाजिक परिवर्तनात या समाजाचीही प्रगती व्हावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. श्री वाल्मिकी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित तिसऱ्या युवक-युवती परिचय मेळाव्याचे शुक्रवारी फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. लॉ कॉलेज चौकातील जवाहर वसतिगृहाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. प्रमुख अतिथी म्हणून महापौर प्रवीण दटके, आमदार सुधाकर देशमुख, नगरसेवक संदीप जोशी व परिणय फुके उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करू न कार्यक्रमाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. फडणवीस पुढे म्हणाले, वाल्मिकी समाजातील प्रतिभावंत मुले या समाजाची ताकद आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन पिढीतील बदल पाहायला मिळाला. आज वधू-वर परिचय मेळावा आवश्यक झाला आहे. अलीकडे महिलांचा सन्मान कमी होऊ लागला आहे. त्यांच्यावर अधिकार थोपविले जात असून, यातून समाजाचा ऱ्हास होत आहे. महिला ही परिवार व समाजाला दिशा देऊ शकते. त्यामुळे तिचा सन्मान झालाच पाहिजे, असे ते म्हणाले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिक्षणाशिवाय कोणताही समाज प्रगती करू शकत नाही, असे स्पष्ट करू न वाल्मिकी समाजातील तरुणांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या समाजाला मजबूत करावे, असे आवाहन केले. यावेळी वाल्मिकी समाजातील महिलांनी रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांना राखी बांधली. तसेच वाल्मिकी फाऊंडेशनतर्फे ५१ हजार रुपयांच्या सहायता निधीचा धनादेश मुख्यमंत्र्यांना देण्यात आला. हा निधी जलयुक्त शिवाराच्या कामांमध्ये वापरला जाईल, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कार्यक्रमाला संजय बंगाले, वैशाली चोपडे, सुनील तांबे, रमेश गिरडे, शंकरराव भुते, गिरीश पांडव, संजय करोशिया, विजय करोशिया उपस्थित होते. संचालक वाल्मिकी फाऊंडेशनचे अध्यक्ष सतीश डागोर यांनी केले.(प्रतिनिधी)कौशल्य विकास केंद्र उभारणार वाल्मिकी समाजातील युवक-युवतींना खासगी क्षेत्रात रोजगारांच्या संधी उपलब्ध करू न देण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याकरिता तातडीने पावले उचलण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट करू न, त्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करण्यास तयार असून महानगर पालिकेने या कामी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले. तसेच वाल्मिकी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी येत्या आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्याचे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आश्वासन दिले.