शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

कापडासह कागद व ज्यूटच्या पिशव्यांचा वापर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 11:40 IST

प्लास्टिक बॅग व पॉलिथीनवर बॅन आणल्यानंतर नागपुरातील विविध भाजी बाजारात, मॉल्समध्ये कापड, ज्यूट व कागदाची पिशवी नि:शुल्क देत आहे. त्यासाठी भाजी विक्रेत्याकडून ठोकमध्ये भाजी खरेदी करावी लागणार आहे.

ठळक मुद्देठोक भाजी घेतल्यास पिशवी नि:शुल्कप्लास्टिक बंदीचा प्रभाव जाणवू लागला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्लास्टिक बॅग व पॉलिथीनवर बॅन आणल्यानंतर नागपुरातील विविध भाजी बाजारात, मॉल्समध्ये कापड, ज्यूट व कागदाची पिशवी नि:शुल्क देत आहे. त्यासाठी भाजी विक्रेत्याकडून ठोकमध्ये भाजी खरेदी करावी लागणार आहे.चिल्लरमध्ये जर भाजी घेतली तर ५ ते १० रुपये पिशवीसाठी द्यावे लागतील. काही भाजी विक्रेते तर ग्राहकांकडून पिशवीचे १० रुपये घेत आहे. दुसऱ्या दिवशी ग्राहकांनी पिशवी परत केल्यास पैसेही परत देत आहे. अशा पद्धतीने भाजी विक्रेत्यांनी आपापल्या स्तरावर पॉलिथीनचा पर्याय शोधला आहे. काही विक्रेते कागद गुंडाळून भाजी देत आहे, तर काही फळ विक्रेते जूटच्या पिशवीत फळ देत आहे.भाजी विक्रेता शामबाबू म्हणाले की, जेव्हापासून प्लॅस्टीक बॅन झाले आहे तेव्हापासून कापडाच्या पिशवीचा वापर मी करीत आहे. ठोकमध्ये भाजी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पिशवी नि:शुल्क देत आहे. जर ग्राहक एक-दोन किलो भाजी खरेदी करीत असेल तर त्यांच्याकडून पिशवीचे ५ ते १० रुपये घेत आहे.चिल्लरमध्ये जर भाजी घेतली तर ५ ते १० रुपये पिशवीसाठी द्यावे लागतील. काही भाजी विक्रेते तर ग्राहकांकडून पिशवीचे १० रुपये घेत आहे. दुसऱ्या दिवशी ग्राहकांनी पिशवी परत केल्यास पैसेही परत देत आहे. अशा पद्धतीने भाजी विक्रेत्यांनी आपापल्या स्तरावर पॉलिथीनचा पर्याय शोधला आहे. काही विक्रेते कागद गुंडाळून भाजी देत आहे, तर काही फळ विक्रेते जूटच्या पिशवीत फळ देत आहे.भाजी विक्रेता शामबाबू म्हणाले की, जेव्हापासून प्लॅस्टीक बॅन झाले आहे तेव्हापासून कापडाच्या पिशवीचा वापर मी करीत आहे. ठोकमध्ये भाजी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पिशवी नि:शुल्क देत आहे. जर ग्राहक एक-दोन किलो भाजी खरेदी करीत असेल तर त्यांच्याकडून पिशवीचे ५ ते १० रुपये घेत आहे.कागद व कापड पिशवीचा उपयोगसहकारनगर येथील भाजी विक्रेते अरुण शाहू म्हणाले की, प्लास्टिकवर बॅन लागल्यानंतर कागद व कापड पिशवीचा उपयोग करण्यात येत आहे. जे लोक ठोकमध्ये भाजी खरेदी करतात, त्यांना पिशवी नि:शुल्क देण्यात येत आहे. पिशवीच्या खरेदीत पैसे अधिक जात असले तरी, आमच्यासाठी पर्याय नाही. ग्राहकांकडे पिशवी नसल्यामुळे आमचेच नुकसान होत आहे. त्यामुळे हा पर्याय योग्य आहे.

पिशवी परत दिल्यास पैसे परतखामला भाजी बाजारात आलू-कांद्याचे विक्रेते सुजित शाह म्हणाले की, ग्राहकांजवळ पिशवी नसेल तर आम्ही त्यांना पिशवी उपलब्ध करून देतो. त्या मोबदल्यात त्यांच्याकडून दहा रुपये घेतो. दुसºया दिवशी जर ग्राहकाने पिशवी परत केली तर आम्ही १० रुपये परतही देतो. ग्राहकांनी जास्त खरेदी केल्यास त्यांना मोठी पिशवी नि:शुल्क देतो. अशाच प्रकारे अमरावती रोडवर एक भाजी विक्रेता ग्राहकांना भाजी खरेदी केल्यावर कापडाची पिशवी देतो. दुसºया दिवशी ग्राहकाने पिशवी परत केल्यास पैसेही परत देतो.

कागदाच्या डब्यामध्ये देतात फळखामला बाजारातील फळ विक्रेते आकाश खुबाळकर म्हणाले की, फळाचे वजन जास्त असल्याने कापडाची स्वस्त पिशवी फाटते. त्यामुळे ज्या कागदाच्या डब्यामध्ये फळ आणले जाते. त्याच डब्याचा वापर ग्राहकांना फळ देण्यासाठी करतो. ज्या ग्राहकाने जास्त फळ खरेदी केले त्याच्याकडून डब्याचे पैसेही घेत नाही.

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी