शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
4
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
5
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
6
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
7
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
8
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
9
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
10
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
11
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
12
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
13
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
14
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
15
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
16
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
17
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
18
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
19
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
20
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला

वीज काटकसरीने वापरा; अन्यथा दिवाळी अंधारात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 9:07 PM

Nagpur News वीज काटकसरीने वापरण्याचे आवाहन ही महावितरणने केले आहे. त्यामुळे नागरिकांनी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अन्यथा भारनियमन लागेल आणि दिवाळी अंधारात घालवण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागपूर : कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यावर वीज टंचाईचे संकट आले आहे. परिस्थिती हळूहळू सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोळशाचा पुरवठाही होऊ लागला असला तरी परिस्थिती अजूनही बिकट आहे. यासोबतच वीज काटकसरीने वापरण्याचे आवाहन ही महावितरणने केले आहे. त्यामुळे नागरिकांनी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अन्यथा भारनियमन लागेल आणि दिवाळी अंधारात घालवण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Use electricity sparingly; Otherwise Diwali in the dark!)

कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातील वीज प्रकल्पातील उत्पादन घसरले आहे. यातच दसरा व दिवाळीचा उत्सव आणि उकाडा जाणवू लागल्याने विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे मागणी व पुरवठा यातील तफावत वाढल्याने संकट आणखी गडद झाले आहे.

...तर भारनियमन सुरू करावे लागणार

कोळशाच्या पुरवठ्यात हळूहळू वाढ होत आहे. तरीही वीज केंद्रात कोळशाचा साठा समाधानकारक नाही. बहुतांश वीज केंद्रात केवळ दोन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. परिस्थिती लवकर सुधारली नाही. किंवा कोळशाच्या पुरवठ्यात थोडीही कमतरता आली आणि वीज संच बंद ठेवावे लागले तर भारनियमन सुरु करावे लागू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

- थकबाकीची डोकेदुखी

नागपूर परिमंडळात तब्बल ६ लाखांवरील वीज ग्राहकांवर तब्बल २५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. एकीकडे कोळशाचे संकट असताना दुसरीकडे थकबाकीची ही डोकेदुखी आहे वीज बिलाची थकबाकी न मिळाल्याने कोळसा कंपन्यांचे बिल देणे शक्य झाले नाही. परिणामी कोळसा कंपन्यांची थकबाकी ही वाढलेली आहे.

- गरज असेल तेव्हाच दिवे लावा

वीज ग्राहकांनी मागणी व उपलब्धता यामध्ये समतोल राखण्यासाठी सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा. गरज असेल तेव्हाच दिवे, पंखे लावावे. असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वीज जपून वापरा, वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे.

विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीज खरेदीसह जलविद्युत व अन्य स्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून, त्यामुळे नागरिकांनीही विजेचा वापर सावधगिरीने करावा.

अमित परांजपे, मुख्य अभियंता, महावितरण

टॅग्स :electricityवीज