शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

वीज काटकसरीने वापरा; अन्यथा दिवाळी अंधारात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 21:08 IST

Nagpur News वीज काटकसरीने वापरण्याचे आवाहन ही महावितरणने केले आहे. त्यामुळे नागरिकांनी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अन्यथा भारनियमन लागेल आणि दिवाळी अंधारात घालवण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागपूर : कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यावर वीज टंचाईचे संकट आले आहे. परिस्थिती हळूहळू सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोळशाचा पुरवठाही होऊ लागला असला तरी परिस्थिती अजूनही बिकट आहे. यासोबतच वीज काटकसरीने वापरण्याचे आवाहन ही महावितरणने केले आहे. त्यामुळे नागरिकांनी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अन्यथा भारनियमन लागेल आणि दिवाळी अंधारात घालवण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Use electricity sparingly; Otherwise Diwali in the dark!)

कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातील वीज प्रकल्पातील उत्पादन घसरले आहे. यातच दसरा व दिवाळीचा उत्सव आणि उकाडा जाणवू लागल्याने विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे मागणी व पुरवठा यातील तफावत वाढल्याने संकट आणखी गडद झाले आहे.

...तर भारनियमन सुरू करावे लागणार

कोळशाच्या पुरवठ्यात हळूहळू वाढ होत आहे. तरीही वीज केंद्रात कोळशाचा साठा समाधानकारक नाही. बहुतांश वीज केंद्रात केवळ दोन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. परिस्थिती लवकर सुधारली नाही. किंवा कोळशाच्या पुरवठ्यात थोडीही कमतरता आली आणि वीज संच बंद ठेवावे लागले तर भारनियमन सुरु करावे लागू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

- थकबाकीची डोकेदुखी

नागपूर परिमंडळात तब्बल ६ लाखांवरील वीज ग्राहकांवर तब्बल २५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. एकीकडे कोळशाचे संकट असताना दुसरीकडे थकबाकीची ही डोकेदुखी आहे वीज बिलाची थकबाकी न मिळाल्याने कोळसा कंपन्यांचे बिल देणे शक्य झाले नाही. परिणामी कोळसा कंपन्यांची थकबाकी ही वाढलेली आहे.

- गरज असेल तेव्हाच दिवे लावा

वीज ग्राहकांनी मागणी व उपलब्धता यामध्ये समतोल राखण्यासाठी सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा. गरज असेल तेव्हाच दिवे, पंखे लावावे. असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वीज जपून वापरा, वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे.

विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीज खरेदीसह जलविद्युत व अन्य स्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून, त्यामुळे नागरिकांनीही विजेचा वापर सावधगिरीने करावा.

अमित परांजपे, मुख्य अभियंता, महावितरण

टॅग्स :electricityवीज