शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वीज काटकसरीने वापरा; अन्यथा दिवाळी अंधारात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 21:08 IST

Nagpur News वीज काटकसरीने वापरण्याचे आवाहन ही महावितरणने केले आहे. त्यामुळे नागरिकांनी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अन्यथा भारनियमन लागेल आणि दिवाळी अंधारात घालवण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागपूर : कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यावर वीज टंचाईचे संकट आले आहे. परिस्थिती हळूहळू सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोळशाचा पुरवठाही होऊ लागला असला तरी परिस्थिती अजूनही बिकट आहे. यासोबतच वीज काटकसरीने वापरण्याचे आवाहन ही महावितरणने केले आहे. त्यामुळे नागरिकांनी ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अन्यथा भारनियमन लागेल आणि दिवाळी अंधारात घालवण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Use electricity sparingly; Otherwise Diwali in the dark!)

कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातील वीज प्रकल्पातील उत्पादन घसरले आहे. यातच दसरा व दिवाळीचा उत्सव आणि उकाडा जाणवू लागल्याने विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे मागणी व पुरवठा यातील तफावत वाढल्याने संकट आणखी गडद झाले आहे.

...तर भारनियमन सुरू करावे लागणार

कोळशाच्या पुरवठ्यात हळूहळू वाढ होत आहे. तरीही वीज केंद्रात कोळशाचा साठा समाधानकारक नाही. बहुतांश वीज केंद्रात केवळ दोन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. परिस्थिती लवकर सुधारली नाही. किंवा कोळशाच्या पुरवठ्यात थोडीही कमतरता आली आणि वीज संच बंद ठेवावे लागले तर भारनियमन सुरु करावे लागू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

- थकबाकीची डोकेदुखी

नागपूर परिमंडळात तब्बल ६ लाखांवरील वीज ग्राहकांवर तब्बल २५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. एकीकडे कोळशाचे संकट असताना दुसरीकडे थकबाकीची ही डोकेदुखी आहे वीज बिलाची थकबाकी न मिळाल्याने कोळसा कंपन्यांचे बिल देणे शक्य झाले नाही. परिणामी कोळसा कंपन्यांची थकबाकी ही वाढलेली आहे.

- गरज असेल तेव्हाच दिवे लावा

वीज ग्राहकांनी मागणी व उपलब्धता यामध्ये समतोल राखण्यासाठी सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा. गरज असेल तेव्हाच दिवे, पंखे लावावे. असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वीज जपून वापरा, वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे.

विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीज खरेदीसह जलविद्युत व अन्य स्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असून, त्यामुळे नागरिकांनीही विजेचा वापर सावधगिरीने करावा.

अमित परांजपे, मुख्य अभियंता, महावितरण

टॅग्स :electricityवीज