शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वीज अपघात टाळण्यासाठी सर्वोत्कृष्ट उपकरणे वापरा; हायकोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 11:20 IST

आग लागणे, ब्रेकडाऊन होणे इत्यादी अपघात टाळण्यासाठी वीज वितरण व्यवस्थेत सर्वोत्कृष्ट उपकरणे वापरणे आवश्यक आहे.

ठळक मुद्दे चाचणीसाठी तीन महिन्यांचा वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आग लागणे, ब्रेकडाऊन होणे इत्यादी अपघात टाळण्यासाठी वीज वितरण व्यवस्थेत सर्वोत्कृष्ट उपकरणे वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे यासंदर्भात तीन महिन्यात तांत्रिक चाचणी पूर्ण करून आवश्यक दिशानिर्देश जारी करण्यात यावेत असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी केंद्र सरकारला दिलेत.यासंदर्भात पद्मकुमार जैन यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. राज्यात ‘सेंट्रल इलेक्ट्रिसिटी आॅथोरिटी (टेक्निकल स्टॅन्डर्डस् फॉर कन्स्ट्रक्शन आॅफ इलेक्ट्रिकल प्लॅन्स अ‍ॅन्ड इलेक्ट्रिक लाईन्स) रेग्युलेशन्स-२०१०’मधील तरतुदींचे काटेकोर पालन होत नाही असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. पारेषण, वितरण व वीज उपकेंद्रात अधिनियमाने ठरवून दिलेल्या दर्जाचे ट्रान्सफार्मर्स व अन्य उपकरणे वापरली जात नाहीत. त्यामुळे आग लागणे व ब्रेकडाऊन होण्याच्या घटना घडतात. त्यात अनेकदा प्राणहानी व वित्तहानी होते. या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपकरणे खरेदी करतानाच त्यांचा दर्जा तपासला जाणे आवश्यक आहे. तसेच, उपकरणे नियमानुसार बसवली गेली पाहिजे आणि उपकरणाची नियमित देखभाल व सर्व्हिसिंग केली गेली पाहिजे. परंतु, या गोष्टी होत नाहीत. त्यामुळे दूर्घटना घडतात असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. सरकारने आतापर्यंत घडलेल्या दुर्घटनांची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, चौकशीनंतर दोषपूर्ण वीज उपकरणे पुरविणाऱ्या विक्रेत्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी व त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :electricityवीज