शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

वीज अपघात टाळण्यासाठी सर्वोत्कृष्ट उपकरणे वापरा; हायकोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 11:20 IST

आग लागणे, ब्रेकडाऊन होणे इत्यादी अपघात टाळण्यासाठी वीज वितरण व्यवस्थेत सर्वोत्कृष्ट उपकरणे वापरणे आवश्यक आहे.

ठळक मुद्दे चाचणीसाठी तीन महिन्यांचा वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आग लागणे, ब्रेकडाऊन होणे इत्यादी अपघात टाळण्यासाठी वीज वितरण व्यवस्थेत सर्वोत्कृष्ट उपकरणे वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे यासंदर्भात तीन महिन्यात तांत्रिक चाचणी पूर्ण करून आवश्यक दिशानिर्देश जारी करण्यात यावेत असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी केंद्र सरकारला दिलेत.यासंदर्भात पद्मकुमार जैन यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. राज्यात ‘सेंट्रल इलेक्ट्रिसिटी आॅथोरिटी (टेक्निकल स्टॅन्डर्डस् फॉर कन्स्ट्रक्शन आॅफ इलेक्ट्रिकल प्लॅन्स अ‍ॅन्ड इलेक्ट्रिक लाईन्स) रेग्युलेशन्स-२०१०’मधील तरतुदींचे काटेकोर पालन होत नाही असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. पारेषण, वितरण व वीज उपकेंद्रात अधिनियमाने ठरवून दिलेल्या दर्जाचे ट्रान्सफार्मर्स व अन्य उपकरणे वापरली जात नाहीत. त्यामुळे आग लागणे व ब्रेकडाऊन होण्याच्या घटना घडतात. त्यात अनेकदा प्राणहानी व वित्तहानी होते. या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपकरणे खरेदी करतानाच त्यांचा दर्जा तपासला जाणे आवश्यक आहे. तसेच, उपकरणे नियमानुसार बसवली गेली पाहिजे आणि उपकरणाची नियमित देखभाल व सर्व्हिसिंग केली गेली पाहिजे. परंतु, या गोष्टी होत नाहीत. त्यामुळे दूर्घटना घडतात असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. सरकारने आतापर्यंत घडलेल्या दुर्घटनांची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, चौकशीनंतर दोषपूर्ण वीज उपकरणे पुरविणाऱ्या विक्रेत्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी व त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :electricityवीज