शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
2
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
3
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
4
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
5
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
6
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
7
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
8
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
9
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
10
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
11
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
12
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
13
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
14
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
15
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
16
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
17
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
18
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
19
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
20
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या

उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’साठी खडसेंचा आग्रह

By admin | Updated: November 19, 2015 03:40 IST

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन काही आठवड्यांवर आले असून मंत्र्यांच्या बंगल्यांचे वाटप अद्याप झालेले नाही.

प्रशासनाला पाठविले पत्र : प्रकृतीचे कारण की नंबर दोनचा दावा?नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन काही आठवड्यांवर आले असून मंत्र्यांच्या बंगल्यांचे वाटप अद्याप झालेले नाही. उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘देवगिरी’साठी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आग्रह धरला आहे. यासंदर्भात त्यांनी प्रशासनाला पत्रदेखील लिहिले आहे. खडसेंना हा बंगला द्यायचा की नाही याबाबतचा निर्णय अखेरच्या क्षणीच होण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या या आग्रहामागे मंत्रिमंडळात स्वत:ची क्रमांक दोनची जागा सिद्ध करण्याचा प्रयत्न तर नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.हिवाळी अधिवेशनाला ७ डिसेंबरपासून प्रारंभ होत असून मंत्र्यांच्या बंगल्यांचे वाटप झालेले नाही. ‘देवगिरी’ हा बंगला उपमुख्यमंत्र्यांसाठी राखीव आहे. परंतु राज्य शासनामध्ये उपमुख्यमंत्रिपद नाही. त्यामुळे मागील अधिवेशनातदेखील ‘देवगिरी’ बंगला रिकामाच ठेवण्यात आला होता. यातून अनेक जेष्ठ मंत्र्यांचा भ्रमनिरासदेखील झाला होता. परंतु मुख्यमंत्र्यांनीच हा निर्णय घेतल्यामुळे कोणीही यावर भाष्य केले नाही.यंदादेखील हा बंगला रिकामाच राहतो की काय याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. यातच खडसे यांनी स्थनिक प्रशासनाकडे पत्र पाठवून प्रकृतीच्या कारणांमुळे ‘देवगिरी’ बंगला देण्यात यावा, अशी विनंती केली आहे. मुख्यमंत्रिपद न मिळाल्यामुळे खडसे यांनी विविध माध्यमातून आपली नाराजी वारंवार व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘रामगिरी’वर नाही, तर कमीतकमी उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या ‘देवगिरी’वर राहण्याची संधी मिळावी म्हणून तर त्यांनी अशी विनंती केली नाही ना, अशा चर्चांना ऊत आला आहे.(प्रतिनिधी)नंबर दोन पद सिद्ध करण्यासाठी आग्रहमुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल परिसरात मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगला देण्यात आला आहे. तर त्या खालोखाल मोठा बंगला ‘रामटेक’ एकनाथ खडसे यांच्याकडे आहे. नागपुरातदेखील क्रमांक दोनचा बंगला आपल्यालाच मिळावा यासाठी खडसे यांचा आग्रह आहे. यातून राज्य शासनातील क्रमांक दोनचे पद सिद्ध होणार आहे.शेवटच्या क्षणी होणार निर्णयकॅबिनेट मंत्र्याचे निवासस्थान असलेल्या रविभवनातील परिसर आणि खोल्या सुशोभित करण्यावर अंतिम हात फिरवला जात आहे. परंतु बंगले कोणाला देण्यात येतील हे अद्याप निश्चित झालेले नाही. याबाबतचा अंतिम निर्णय सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील करतील. ‘देवगिरी’ आपल्याला मिळावा ही खडसेंची इच्छा आहेच व त्यांनी तशी विनंतीदेखील केली आहे. त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन बंगला द्यायचा की इतर मंत्र्यांची नाराजी नको म्हणून मागील वर्षीप्रमाणे यंदाही ‘देवगिरी’ रिकामाच ठेवायचा याचा निर्णय अखेरच्या दिवसांमध्ये होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.