शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अर्बन हिट आयलँड इफेक्टने नागपूरच्या उष्णतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 11:31 IST

Nagpur News मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानात दिसत असलेली प्रचंड वाढ नागपूरकरांच्या चिंतेचे कारण ठरले आहे. सुरुवातीलाच पारा चढला आहे. मग एप्रिल, मे महिन्यांत काय हाल हाेतील, ही चिंता नागरिकांच्या चर्चेत आहे.

ठळक मुद्देमार्चच्या पहिल्याच आठवड्यात पारा उंचावरतर एप्रिल, मेमध्ये काय हाेईल?

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात तापमानात दिसत असलेली प्रचंड वाढ नागपूरकरांच्या चिंतेचे कारण ठरले आहे. सुरुवातीलाच पारा चढला आहे. मग एप्रिल, मे महिन्यांत काय हाल हाेतील, ही चिंता नागरिकांच्या चर्चेत आहे. जाणकारांच्या मते यापूर्वी उन्हाळ्याच्या सुरुवातीला एवढी तापमान वाढ नाेंदविली गेली नाही. यामागे ‘अर्बन हिट आयलँड इफेक्ट’चे कारण आहे, ही शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली असून येणाऱ्या काळात शहरात उष्णतेच्या लाटेचा धाेका व्यक्त केला जात आहे.

साधारणत: मार्च महिना लागला की उन्हाळा सुरू हाेताे. मात्र सुरुवातीच्या काळात ३० ते ३२ अंशांवर तापमान राहते. मात्र यावर्षी पहिल्या तीन दिवसांतच तापमान ३५ अंशांच्या पार गेले आहे. बुधवारी शहरात ३७ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. हा प्रकार अर्बन हिट आयलँडचाच आहे, असा दावा तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी २००१ ते २०१७ पर्यंत केलेल्या तापमानवाढीच्या अभ्यासाच्या आधारावर देशातील प्रमुख महानगरांमध्ये यूएचआय निर्माण हाेत असल्याची चिंता व्यक्त केली आहे. यामध्ये नागपूरचाही समावेश येताे. एनर्जी ॲण्ड रिसाेर्सेस इंडियानेसुद्धा देशात अर्बन हिट आयलँडचा धाेका वाढत असल्याचे आणि उपग्रह तापमान निरीक्षणाच्या आधारावर बहुतेक महानगराचे तापमान २ अंशांनी वाढल्याचे नमूद केले आहे. ही तफावत अधिक वाढल्याचे तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

अर्बन हिट आयलँड व त्याची कारणे

‘अर्बन हिट आयलॅंड’ म्हणजे सभाेवतलच्या ग्रामीण भागापेक्षा अधिक उष्ण असलेला शहरी प्रदेश हाेय.

- नागपूर शहराचा विस्तार चारही बाजूंनी हाेत आहे. त्यामुळे अधिकाधिक इमारती बांधकामामुळे सिमेंटचे जंगलच विस्तारत आहे.

- अनेक प्रकल्पांच्या विकासकामांमुळे ग्रीन कव्हर झपाट्याने घटत आहे.

- गगनचुंबी अपार्टमेंट आणि वाढते औद्याेगीकरण.

- रस्ते, पेव्हमेंट, इमारती व छप्पर बांधकामासाठी जे साहित्य वापरले जात आहे ते सूर्याची उष्णता घेऊन पुन्हा उत्सर्जित करणारे आहे.

- नैसर्गिक भूप्रदेश, वनक्षेत्र व पाणलाेट क्षेत्र नसल्याने हे साहित्य अधिक उष्णता निर्माण करते.

- अधिकाधिक सिमेंटीकरणामुळे जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता प्रचंड घटत चालली आहे. त्यामुळे सूर्याची उष्णता जमिनीत शाेषण्याची क्षमताही घटली आहे.

- वाहने आणि उद्याेगांद्वारे हाेत असलेले प्रदूषण, हवेत असलेले धुलिकण हेही माेठ्या प्रमाणात यूएचआयसाठी कारणीभूत आहे.

यूएचआयचे परिणाम

- सामान्यपेक्षा तापमानात प्रचंड वाढ हाेणे. हे प्रमाण उष्णतेच्या लाटेचे कारण ठरणारे आहे.

- उष्णतेच्या लाटेचा मनुष्य व प्राण्यांवरही विपरीत परिणाम.

- प्रदूषणाचा स्तर वाढताे. हवेच्या प्रदूषणासह जल प्रदूषणातही वाढ. भूजल पातळीत घट.

- यामुळे नागरिकांच्या आराेग्याबाबत अनेक समस्या निर्माण हाेऊ शकतात. मृत्युदरात वाढ हाेणे.

- ऊर्जेचा अधिक उपयाेग व एअर कंडिशनच्या खर्चात वाढ.

उष्ण वाऱ्यामुळे वाढले तापमान : हवामान विभाग

मात्र हवामान विभागानुसार हा प्रकार अर्बन हिट आयलँडचा नाही. विभागाचे संचालक एम. एन. साहू यांनी सांगितले, सध्या राजस्थान व गुजरातकडून उष्ण वारे मध्य भारताकडे वाहत आहेत. त्यामुळे नागपूर व विदर्भाच्या तापमानात वाढ झाली आहे. थंड किंवा उष्ण प्रदेशातून वाहणाऱ्या वाऱ्याचे इतर भागात परिणाम हाेतात. वाऱ्याची दिशा बदलली की आपाेआप तापमान खाली येईल, असा दावा त्यांनी केला. पुढे तापमानात अधिक वाढ हाेईल, ही शक्यताही त्यांनी नाकारली आहे.

टॅग्स :weatherहवामान