शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

धर्मामुळेच समाजाची उन्नती, सरसंघचालकांनी दिला तानाजी मालुसरेंचा दाखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 13:54 IST

धर्मामुळे समाजाची उन्नती होते, व्यक्ती कुटुंबावर अवलंबून असते, कुटुंब समाजावर अवलंबून असते.

नागपूर - संरसंघाचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात समाज आणि कुटुंब समजावून सांगताना धर्माचीही जोड दिली. यावेळी, इतिहासाचा दाखल देत तानाजा मालुसरे यांनी आपल्या मुलाचं लग्न सोडलं पण समाजकर्तव्य बजावण्यासाठी खिंड लढवल्याचं सांगितलं. धर्मामुळेच समाजाची उन्नती होते, असेही भागवत यांनी म्हटलं. तर, चीनच्या होत असलेल्या प्रगतीकडेही त्यांनी लक्ष वेधले. प्राचीन काळापासून आपल्या देशाची औषधीशास्त्रात जगावर छाप आहे. मात्र, आपल्या पारंपारिक औषधी ज्ञानावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे. चीनने त्यांच्या परंपरागत ज्ञानाला आधुनिकतेशी जोडून त्यांच्या विशिष्ट औषधी तयार केल्या आहेत. त्यांनी स्वत:च्या बळावर हे उभे केले आहे.

आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजच्या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित करताना डॉ. मोहन भागवत म्हणाले की, धर्मामुळे समाजाची उन्नती होते, व्यक्ती कुटुंबावर अवलंबून असते, कुटुंब समाजावर अवलंबून असते. तानाजी मालुसरे आपल्या मुलाचे लग्न सोडून आले नसते तर स्वराज्याचे काय झाले असते, त्यावेळी अशी घराणी होती, म्हणूनच औरंगजेब भारतात येऊन पण काही करू शकला नाही, असा दाखल भागवत यांनी दिला. औरंगजेब भारतात 30 वर्षे रहिला तरी काही करू शकला नाही, शेवटी त्याची कबर भारतातच बांधली गेली. याचा अर्थ असा परिवार, असा समाज, अशी व्यक्ती, असे कुटुंब, जे एकमेकांवर अवलंबून आहेत. कुटुंब आणि समाजाबद्दल समाजवताना धर्मामुळेच समाजाची उन्नती होत असल्याचेही मत भागवत यांनी व्यक्त केलं, 

भारताने चीनच्या फार्मसी क्षेत्रापासून शिकावे

चीनच्या विविध भूमिकांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वारंवार प्रहार करण्यात येतो. मात्र सरसंघचालकांनी चीनच्या ‘फार्मसी’ क्षेत्राबाबत नागपुरात कौतुकोद्गार काढले. प्राचीन काळापासून आपल्या देशाची औषधीशास्त्रात जगावर छाप आहे. मात्र आपल्या पारंपारिक औषधी ज्ञानावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे. चीनने त्यांच्या परंपरागत ज्ञानाला आधुनिकतेशी जोडून त्यांच्या विशिष्ट औषधी तयार केल्या आहेत. त्यांनी स्वत:च्या बळावर हे उभे केले आहे. भारताकडे समृद्ध परंपरा असून भारतानेदेखील चीनच्या ‘फार्मसी’ क्षेत्रापासून शिकले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.मोहन भागवत यांनी केले. नागपुरात ते सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

परंपरागत ज्ञानाची आधुनिक फार्मसी शास्त्राशी सांगड घालावी

चीनमध्ये पंरपरागत औषधोपचार आणि आधुनिक विज्ञान याची सांगड घालून एक वेगळी पद्धत निर्माण केली आहे. भारतीय फार्मसी क्षेत्राने चीन कडून हे आत्मसात करण्याची गरज आहे. फार्मसीचे क्षेत्र अतिशय चांगले असून या शास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीवर अवलंबून रहावे लागत नाही. फार्मसीच्या ज्ञानावर स्वतःचा रोजगार करता येतो. आम्ही आमच्या परंपरागत ज्ञानाची या विज्ञानाशी सांगड घालू शकतो का याचा विचार करण्याची गरज आहे. आपण परंपरागत ज्ञानाची आधुनिक फार्मसी शास्त्राशी सांगड घातली पाहिजे, असे डॉ.भागवत म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHinduहिंदू