शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

धर्मामुळेच समाजाची उन्नती, सरसंघचालकांनी दिला तानाजी मालुसरेंचा दाखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 13:54 IST

धर्मामुळे समाजाची उन्नती होते, व्यक्ती कुटुंबावर अवलंबून असते, कुटुंब समाजावर अवलंबून असते.

नागपूर - संरसंघाचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात समाज आणि कुटुंब समजावून सांगताना धर्माचीही जोड दिली. यावेळी, इतिहासाचा दाखल देत तानाजा मालुसरे यांनी आपल्या मुलाचं लग्न सोडलं पण समाजकर्तव्य बजावण्यासाठी खिंड लढवल्याचं सांगितलं. धर्मामुळेच समाजाची उन्नती होते, असेही भागवत यांनी म्हटलं. तर, चीनच्या होत असलेल्या प्रगतीकडेही त्यांनी लक्ष वेधले. प्राचीन काळापासून आपल्या देशाची औषधीशास्त्रात जगावर छाप आहे. मात्र, आपल्या पारंपारिक औषधी ज्ञानावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे. चीनने त्यांच्या परंपरागत ज्ञानाला आधुनिकतेशी जोडून त्यांच्या विशिष्ट औषधी तयार केल्या आहेत. त्यांनी स्वत:च्या बळावर हे उभे केले आहे.

आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजच्या उद्घाटन कार्यक्रमाला संबोधित करताना डॉ. मोहन भागवत म्हणाले की, धर्मामुळे समाजाची उन्नती होते, व्यक्ती कुटुंबावर अवलंबून असते, कुटुंब समाजावर अवलंबून असते. तानाजी मालुसरे आपल्या मुलाचे लग्न सोडून आले नसते तर स्वराज्याचे काय झाले असते, त्यावेळी अशी घराणी होती, म्हणूनच औरंगजेब भारतात येऊन पण काही करू शकला नाही, असा दाखल भागवत यांनी दिला. औरंगजेब भारतात 30 वर्षे रहिला तरी काही करू शकला नाही, शेवटी त्याची कबर भारतातच बांधली गेली. याचा अर्थ असा परिवार, असा समाज, अशी व्यक्ती, असे कुटुंब, जे एकमेकांवर अवलंबून आहेत. कुटुंब आणि समाजाबद्दल समाजवताना धर्मामुळेच समाजाची उन्नती होत असल्याचेही मत भागवत यांनी व्यक्त केलं, 

भारताने चीनच्या फार्मसी क्षेत्रापासून शिकावे

चीनच्या विविध भूमिकांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वारंवार प्रहार करण्यात येतो. मात्र सरसंघचालकांनी चीनच्या ‘फार्मसी’ क्षेत्राबाबत नागपुरात कौतुकोद्गार काढले. प्राचीन काळापासून आपल्या देशाची औषधीशास्त्रात जगावर छाप आहे. मात्र आपल्या पारंपारिक औषधी ज्ञानावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे. चीनने त्यांच्या परंपरागत ज्ञानाला आधुनिकतेशी जोडून त्यांच्या विशिष्ट औषधी तयार केल्या आहेत. त्यांनी स्वत:च्या बळावर हे उभे केले आहे. भारताकडे समृद्ध परंपरा असून भारतानेदेखील चीनच्या ‘फार्मसी’ क्षेत्रापासून शिकले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.मोहन भागवत यांनी केले. नागपुरात ते सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

परंपरागत ज्ञानाची आधुनिक फार्मसी शास्त्राशी सांगड घालावी

चीनमध्ये पंरपरागत औषधोपचार आणि आधुनिक विज्ञान याची सांगड घालून एक वेगळी पद्धत निर्माण केली आहे. भारतीय फार्मसी क्षेत्राने चीन कडून हे आत्मसात करण्याची गरज आहे. फार्मसीचे क्षेत्र अतिशय चांगले असून या शास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीवर अवलंबून रहावे लागत नाही. फार्मसीच्या ज्ञानावर स्वतःचा रोजगार करता येतो. आम्ही आमच्या परंपरागत ज्ञानाची या विज्ञानाशी सांगड घालू शकतो का याचा विचार करण्याची गरज आहे. आपण परंपरागत ज्ञानाची आधुनिक फार्मसी शास्त्राशी सांगड घातली पाहिजे, असे डॉ.भागवत म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHinduहिंदू