शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानी तापतेय, पारा चाळिशीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:10 IST

नागपूर : फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापासून बदललेल्या वातावरणामुळे आता उष्णता जाणवायला लागली आहे. नागपुरातील वातावरणात कोरडेपणा निर्माण झाला असून सायंकाळच्या ...

नागपूर : फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापासून बदललेल्या वातावरणामुळे आता उष्णता जाणवायला लागली आहे. नागपुरातील वातावरणात कोरडेपणा निर्माण झाला असून सायंकाळच्या आर्द्रतेमध्ये दिवसेंदिवस घट होत चालली आहे.

नागपुरातील मंगळवारच्या कमाल तामपानाची नोंद ३७.७ अंश सेल्सिअस झाली आहे. मागील चार दिवसांपासून उष्णता वाढत असल्याने रात्रीची थंडी पळाली आहे. पहाटे असलेला गारवा सुखद असला तरी वाढत्या कोरोना संक्रमणामुळे अधिकाधिक सुरक्षा घेताना नागरिक दिसत आहेत. मंगळवारी सकाळी ४४ टक्के आर्द्रता नोंदविली गेली, तर सायंकाळी त्यात बरीच घट होऊन फक्त १३ टक्क्यांची नोंद झाली. वारे वाहत असल्याने वातावरण कोरडे झाले आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत हा बदल जाणवत आहे.

चंद्रपुरात आतापासूनच उन्हाचे चटके बसायला लागले आहेत. मंगळवारी विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान ३९.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. अमरावती, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्याचे तापमानही नागपूरच्या बरोबरीनेच होते. फेब्रुवारीतील थंडीनंतर अचानक वातावरण तापायला लागल्याने सुरुवातीचे हे दिवस अनेकांना त्रासदायक ठरत आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, ३ मार्चपासून हवामान अधिक कोरडे राहणार असल्याने राज्यात उष्णतेचा पारा वाढत जाणार आहे. या बदलामुळे कुलर आणि एसीचा वापर नजीकच्या दिवसात वाढण्याची शक्यता आहे. थंड पाण्याचे माठही बाहेर निघत आहेत.