शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

उपराजधानी तापतेय, पारा चाळिशीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:10 IST

नागपूर : फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापासून बदललेल्या वातावरणामुळे आता उष्णता जाणवायला लागली आहे. नागपुरातील वातावरणात कोरडेपणा निर्माण झाला असून सायंकाळच्या ...

नागपूर : फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापासून बदललेल्या वातावरणामुळे आता उष्णता जाणवायला लागली आहे. नागपुरातील वातावरणात कोरडेपणा निर्माण झाला असून सायंकाळच्या आर्द्रतेमध्ये दिवसेंदिवस घट होत चालली आहे.

नागपुरातील मंगळवारच्या कमाल तामपानाची नोंद ३७.७ अंश सेल्सिअस झाली आहे. मागील चार दिवसांपासून उष्णता वाढत असल्याने रात्रीची थंडी पळाली आहे. पहाटे असलेला गारवा सुखद असला तरी वाढत्या कोरोना संक्रमणामुळे अधिकाधिक सुरक्षा घेताना नागरिक दिसत आहेत. मंगळवारी सकाळी ४४ टक्के आर्द्रता नोंदविली गेली, तर सायंकाळी त्यात बरीच घट होऊन फक्त १३ टक्क्यांची नोंद झाली. वारे वाहत असल्याने वातावरण कोरडे झाले आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत हा बदल जाणवत आहे.

चंद्रपुरात आतापासूनच उन्हाचे चटके बसायला लागले आहेत. मंगळवारी विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान ३९.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. अमरावती, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्याचे तापमानही नागपूरच्या बरोबरीनेच होते. फेब्रुवारीतील थंडीनंतर अचानक वातावरण तापायला लागल्याने सुरुवातीचे हे दिवस अनेकांना त्रासदायक ठरत आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, ३ मार्चपासून हवामान अधिक कोरडे राहणार असल्याने राज्यात उष्णतेचा पारा वाढत जाणार आहे. या बदलामुळे कुलर आणि एसीचा वापर नजीकच्या दिवसात वाढण्याची शक्यता आहे. थंड पाण्याचे माठही बाहेर निघत आहेत.