शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

उपराजधानी तापतेय, पारा चाळिशीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:10 IST

नागपूर : फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापासून बदललेल्या वातावरणामुळे आता उष्णता जाणवायला लागली आहे. नागपुरातील वातावरणात कोरडेपणा निर्माण झाला असून सायंकाळच्या ...

नागपूर : फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापासून बदललेल्या वातावरणामुळे आता उष्णता जाणवायला लागली आहे. नागपुरातील वातावरणात कोरडेपणा निर्माण झाला असून सायंकाळच्या आर्द्रतेमध्ये दिवसेंदिवस घट होत चालली आहे.

नागपुरातील मंगळवारच्या कमाल तामपानाची नोंद ३७.७ अंश सेल्सिअस झाली आहे. मागील चार दिवसांपासून उष्णता वाढत असल्याने रात्रीची थंडी पळाली आहे. पहाटे असलेला गारवा सुखद असला तरी वाढत्या कोरोना संक्रमणामुळे अधिकाधिक सुरक्षा घेताना नागरिक दिसत आहेत. मंगळवारी सकाळी ४४ टक्के आर्द्रता नोंदविली गेली, तर सायंकाळी त्यात बरीच घट होऊन फक्त १३ टक्क्यांची नोंद झाली. वारे वाहत असल्याने वातावरण कोरडे झाले आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत हा बदल जाणवत आहे.

चंद्रपुरात आतापासूनच उन्हाचे चटके बसायला लागले आहेत. मंगळवारी विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान ३९.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. अमरावती, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्याचे तापमानही नागपूरच्या बरोबरीनेच होते. फेब्रुवारीतील थंडीनंतर अचानक वातावरण तापायला लागल्याने सुरुवातीचे हे दिवस अनेकांना त्रासदायक ठरत आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, ३ मार्चपासून हवामान अधिक कोरडे राहणार असल्याने राज्यात उष्णतेचा पारा वाढत जाणार आहे. या बदलामुळे कुलर आणि एसीचा वापर नजीकच्या दिवसात वाढण्याची शक्यता आहे. थंड पाण्याचे माठही बाहेर निघत आहेत.