शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

ठगबाजांच्या विळख्यात उपराजधानी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:28 IST

नागपूर : कागदोपत्री घोटाळा करून सामान्यांच्या परिश्रमाच्या कमाईवर हात साफ करणारे ठगबाज नागपूरसाठी धोकादायक ठरत आहेत. नित्य नवे घोटाळे ...

नागपूर : कागदोपत्री घोटाळा करून सामान्यांच्या परिश्रमाच्या कमाईवर हात साफ करणारे ठगबाज नागपूरसाठी धोकादायक ठरत आहेत. नित्य नवे घोटाळे करून हे ठगबाज सामान्यांना कंगाल करत आहेत. गेल्या सहा दिवसात नोंद झालेल्या दोन प्रकरणात १३५ कोटी रुपयांचा घोटाळा पुढे आला आहे. हा आकडा आर्थिक गुन्हेगारीचे गांभीर्य विषद करणारा आहे.

आर्थिक घोटाळ्यांसाठी नागपूरचे नाव आधीपासूनच चर्चेत आहे. कळमना अर्बन, वासनकर, श्री सूर्या, समीर जोशी, रवी जोशी, झामरे, झाम, नवाेदय बँक, मैत्रेय पत संस्था, चिमणकर यांच्यासारख्यांनी यापूर्वी गरीब व मध्यमवर्गीयांचे हजारो-लाखो रुपये हडप केले आहेत. गुंतवणुकीत भक्कम नफा मिळविण्याच्या लालसेने परिश्रमपूर्वक मिळवलेले धन नागरिकांनी या ठगबाजांच्या हाती सोपवले. कोणी अचल संपत्ती विकून तर कुणी मुलांच्या शिक्षणाचा किंवा मुला-मुलीच्या लग्नासाठी बचत केलेली रक्कम अशा प्रकरणात गमावली. विशेष म्हणजे, हे सगळे प्रकरण गुंतवणूकदार रस्त्यावर उतरल्यावरच उघडकीस आले आहेत. पोलिसांनी स्वत:हून अशा घोटाळेबाजांवर अंकुश लावला, असे एकही प्रकरण गेल्या दोन दशकात दिसून आले नाही, हे विशेष. गेल्या सहा दिवसात नोंद झालेले दोन प्रकरण अशाच स्वरूपाचे आहेत.

यातील पहिले प्रकरण सीताबर्डी येथील आहे. गुंतवणुकीवर तीन टक्के मासिक व्याज आणि बोनस देण्याची लालूच दाखवून सुशिल कोल्हे, त्याचा भाऊ पंकज कोल्हे आणि साथीदार भरत साहू यांनी नागरिकांना ३५ कोटी रुपयांनी ठगवले आहे. कोल्हे बंधूंनी सुरुवातीला इंदोरा येथे कार्यालय थाटले. तीन वर्षे येथे एमएलएम कंपनी चालवली. त्यानंतर २०१८मध्ये सिव्हील लाईन्स येथील उत्कर्ष अपार्टमेंटमध्ये एजीएम कार्पोरेशन चालवत होते. प्रारंभी त्यांनी स्थानिक गुंतवणूकदारांना कंपनीशी जोडले आणि हळूहळू अन्य राज्यातही आपले जाळे पसरवले. डिजिटल मार्केटिंगमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावावर अनेकांना यात सहभागी करून घेतले. तारांकित हॉटेलमध्ये सेमिनार आयोजित करून आपले नेटवर्क महाराष्ट्रापासून ते हिमाचल, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, पंजाब आदी राज्यात वाढवले. नागपूरच्या धर्तीवर त्यांनी सर्वच राज्यांमधील गुंतवणूकदारांना प्रारंभावस्थेत लाभ दिला आणि नंतर व्यवसाय गुंडाळला. गेल्या एक वर्षापासून गुंतवणूकदार पोलिसांकडू चकरा मारत होते. मात्र, त्यांना आश्वासनापलिकडे काहीच प्राप्त झाले नाही. अखेर त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख व पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे विनवणी केली तेव्हा ७ नोव्हेंबरला सीताबर्डी ठाण्यात ३५ कोटी रुपयांच्या ठगवणुकीचे प्रकरण नोंदवले गेले. प्रकरण तापले असल्याचे कळताच कोल्हे बंधू फरार झाले.

अशाच प्रकारचे प्रकरण विजय गुरुनुले याचे आहे. याने ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावावर जवळपास १०० कोटी रुपयांनी सामान्यांना गंडवले आहे. जवळपास पाच वर्षापासून गुरुनुले सामान्यांना विविध योजनांच्या नावाखाली आपल्या सापळ्यात अडकवत होता. प्रतापनगर ठाण्याजवळ मंगलमूर्ती चौकात त्याचे कार्यालय होते. गुरुनुले व त्याचे सहकारी बोगस योजना राबवून जोरदार प्रचार-प्रसार करत होते. यात अनेक लोक अडकले. पोलिसांनाही याचा अंदाजा आला नाही. विशेष म्हणजे गुरुनुले सर्वात आधी गुंतवणूकदारांना सुरक्षा म्हणून दुसऱ्याच्या मालकीच्या फ्लॅटची नोटरी करून देत होता. दरम्यान काही पीडित प्रतापनगर ठाण्यात पोहोचले. पोलिसांच्या सुस्तीची जाणिव असल्याने या पीडितांना मोठ्या अधिकाऱ्यांकडे मदत मागण्यासाठी जावे लागले. त्यांनी अपर आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना हकीकत सांगितली. रेड्डी आणि नुरूल हसन यांच्या निर्देशानुसार सीताबर्डी, अंबाझरी, प्रतापनगर ठाण्यातील पोलीस दलाने गुरुनुलेच्या कार्यालयावर छापा मारला. एवढे सगळे झाल्यावरही गुरुनुलेची माणसे तक्रारकर्त्यांना रक्कम परत करण्यासोबतच अनेक प्रकारची प्रलोभने देत होते. परंतु, पोलीस अधिकाऱ्यांच्या कठोर भूमिकेमुळे आणि तक्रारकर्ता गणेश चाफले यांच्या हिमतीमुळे प्रकरण उघडकीस आले. १३ नोव्हेंबरला चाफले यांच्या तक्रारीवर केवळ १९.३५ लाख रुपयाच्या ठगवणुकीचा गुन्हा नोंदवला गेला. सहा दिवसाच्या तपासानंतर ७० कोटीचा आकडा पुढे आला असून, १०० कोटीपर्यंत हा आकडा जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या प्रकरणात नऊ आरोपींना अटक झाली आहे.

..........