शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

...तोपर्यंत अदानीच्या घोटाळ्यावर प्रश्न विचारत राहू - रंजीत रंजन

By आनंद डेकाटे | Updated: March 31, 2023 16:31 IST

जीपीसी गठीत करा, लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकजूट

नागपूर : अदानीचा घोटाळा गंभीर आहे. अदानीच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी रूपये कुणी लावले. अदानीची संपत्ती अचानक इतकी कशी वाढली. या प्रश्नांचे उत्तर देशाला मिळायलाच हवे. त्यामुळे केंद्र सरकार जोपर्यंत जेपीसी (जॉईंट पार्लमेंट्री कमिटी) स्थापन करीत नाही, तोपर्यंत अदानीच्या घोटाळ्याबाबत बोलत राहू, सरकारला जाब विचारत राहू, असा इशारा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय महासचिव व प्रवक्त्या रंजीत रंजन यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.

राहुल गांधी यांच्यावर ज्या पद्धतीने कारवाई करण्यात आली. त्यांचे लोकसभा सदस्यपद रद्द करण्यात आले. त्यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षही एकजूट होत आहेत. काँग्रेसतर्फे देशभरात पत्रकार परिषदा घेऊन व लोकांमध्ये जाऊन हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवला जात आहे. त्याअंतर्गत शुक्रवारी खा. रंजीत रंजन यांनी नागपुरात पत्रपरिषद घेऊन काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

खा. रंजीत रंजन म्हणाल्या, सत्ताधारी पक्षाचे चुकीचे धोरण आणि घोटाळ्यावर सरकारला जाब विचारणे हे विराेधी पक्षाचे काम असते. विरोधी पक्षाचे नेते म्हणून राहुल गांधी यांनी हे काम अगदी चोखपणे बजावले. यात राहुल गांधी यांचे काय चुकले? असा प्रश्न ही त्यांनी यावेळी उपस्थित केला. जेपीसी गठीत झाली तर आपले पितळ उघडे पडेल, याची सरकारला भिती असल्याचेही त्या म्हणाल्या. पत्रपरिषदेला जि.प. अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, आ. अभिजित वंजारी, माजी मंत्री सुनील केदार, राजेंद्र मुळक, किशोर गजभिये आदी उपस्थित होते.

- राहुल गांधी यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई

विरोधी पक्षाने आमच्या भ्रष्टाचारवर बोलू नये. संसदेत तर चर्चाच नको, आणि चर्चा केलीच तर आम्ही तुमचे सदस्यत्व सुद्धा रद्द करू शकतो, हे संकेत आहेत. केंद्र सरकार राहुल गांधीवर सुडबुद्धीने कारवाई करीत आहे. आज राहुल गांधी यांच्यावर कारवाई झाली उद्या इतर पक्षाच्या नेत्यांसोबतच हे होऊ शकते. त्यामुळे लोकशाहीच संकटात आली असून ती वाचवण्यासाठी सर्व देशातील सर्व राजकीय पक्ष एकजूट आहेत, असेही खा. रंजीत रंजन यांनी सांगितले.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकार