शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

विनाकठड्यांच्या विहिरी उठताहेत वन्यजीवांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 21:00 IST

Wells are danger for wildlife न्यजीवांच्या रक्षणासाठी सरकार आणि वन विभागाकडून अथक प्रयत्न केले जात असले तरी जंगलालगत असलेल्या रानशिवारातील विहिरी मात्र वन्यजीवांच्या जीवावर उठल्याचे दिसत आहे. यासाठी वन विभागाकडून प्रयत्न होत असले तरी या प्रयत्नांमध्ये जोम नसल्याने दरवर्षी प्राण्यांचे हकनाक मृत्यू होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वन्यजीवांच्या रक्षणासाठी सरकार आणि वन विभागाकडून अथक प्रयत्न केले जात असले तरी जंगलालगत असलेल्या रानशिवारातील विहिरी मात्र वन्यजीवांच्या जीवावर उठल्याचे दिसत आहे. यासाठी वन विभागाकडून प्रयत्न होत असले तरी या प्रयत्नांमध्ये जोम नसल्याने दरवर्षी प्राण्यांचे हकनाक मृत्यू होत आहेत. २०१९ ते चालू मे-२०२१ या काळात विहिरीत पडून ६ वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद वन विभागाकडे आहे. बुधवारी सकाळी भंडारा जिल्ह्यात उघडकीस असलेल्या दोन वाघांच्या बछड्यांच्या मृत्यूमुळे या घटनेतील गांभीर्य अधिकच वाढले आहे. अशा विहिरींच्या बंदोबस्तासाठी असलेले प्रयत्न केवळ कागदापुरते मर्यादित असल्याने घटना थोपविण्यात यश आलेले दिसत नाही. अनेक विहिरी जुन्या असून त्यांच्याकडे कुणाचेच लक्ष नाही.

योजना कागदावरच

कठडे नसलेल्या विहिरींच्या बंदोबस्तासाठी योजना आहेत. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेच्या माध्यमातून गाककऱ्यांना विहिरीवर कठडे बांधण्यासाठी पैसे देण्याची तरतूद आहे. मात्र यासाठी शेतकरी फारसे पुढे येताना दिसत नाहीत. काही ठिकाणी युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत कठडे बांधण्याची तरतूद आहे. मात्र या योजना कागदावरच आहेत.

कठडे नसणाऱ्या विहिरींचे प्रमाण अधिक आहे. ते बांधण्यासाठी शेतकऱ्यांना वन विभाग प्रोत्साहित करीत असतो. जिल्हा परिषद योजनांमधून विहिरी देताना कठडे बांधण्यावर भर देण्यासाठी आम्ही पत्र दिले आहे.

- नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

विहिरीत वाघ पडण्याच्या घटना

२०१९ - ३ वाघ

२०२० - अन्य प्राणी

२०२१ - ३ वाघ

टॅग्स :wildlifeवन्यजीव