शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
3
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
5
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
6
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
7
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
8
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
9
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
10
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
11
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
12
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
13
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
14
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
15
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
16
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
17
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
18
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
19
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
20
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

पश्चिम विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा; शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2023 20:14 IST

Nagpur News नागपूर जिल्ह्यात कुही, रामटेक, काटाेल, उमरेड, भिवापूर या तालुक्यात पाऊस कमी असला तरी वादळ वाऱ्याचा जाेर अधिक हाेता. वादळामुळे आंबा बहराचे माेठे नुकसान झाले.

ठळक मुद्दे फळबागांसह गहू, तूर, हरभरा पिकांचे नुकसान

नागपूर/ अकोला : नागपूर जिल्ह्यात कुही, रामटेक, काटाेल, उमरेड, भिवापूर या तालुक्यात पाऊस कमी असला तरी वादळ वाऱ्याचा जाेर अधिक हाेता. वादळामुळे आंबा बहराचे माेठे नुकसान झाले. सध्या शेतात हरभरा, गहू ही पिके कापणीला आली आहेत. वादळामुळे या पिकांनाही फटका बसला.

पश्चिम विदर्भात गत तीन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांना फटका बसला आहे. अकाेला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांत गहू, तूर, हरभरा पिकांसह फळबागांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश संबंधित जिल्हा प्रशासनाने दिले असले तरी अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात जवळपास ७०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, तुरीच्या पिकाला याचा सर्वाधिक फटका बसला. लोणार तालुक्यातील परडा दराडे येथील शाळेची भिंत कोसळून नुकसान झाले. तीन दिवसांत सरासरी ८ मिमी पावसाची नोंद झाली असून, बुलढाणा तालुक्यात हे प्रमाण सर्वाधिक आहे. नांदुरा व संग्रामपूर तालुक्यात नुकसानाची तीव्रता अधिक आहे.

वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळ वाऱ्यामुळे फळबाग, गहू, हरभऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील २०४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. संत्रा, पपई, लिंबू, संत्रा यासह अन्य फळबागेचे नुकसान झाले तसेच आंब्याचा मोहरही गळून पडला.

अकाेला जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने ६ मार्चला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार अकाेट, तेल्हारा तालुक्यातील ११५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे़. त्यामध्ये गहू, हरभरा, कांदा, आंबा व फळबाग पिकांना तडाखा बसला असून, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुका, आगर, वाडेगाव येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे.

 

गहू आडवा, हरभऱ्याचे मातेरे, कांदा मातीमोल

अमरावती : रब्बीचे पीक काढणीला आले असताना जोरदार वाऱ्यासह आलेल्या या पावसाने गहू जमिनीवर पडला. याशिवाय काढणीला आलेला व सवंगणी होऊन गंजी लावलेल्या हरभऱ्याचे मातेरे झाले आहे. काढलेल्या कांद्याला पाणी लागल्याने खराब होण्याची शक्यता आहे.

अमरावती जिल्ह्यात मंगळवारी सरासरी २.३ मिमी पावसाची नोंद झाली. पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्याने काही भागांत गव्हाचे पीक जमीनदोस्त झाले आहे. विभागीय आयुक्त निधी पांडे यांनी ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश पाचही जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

वर्धा जिल्ह्यात संत्राबागांना फटका

वर्धा : धुलिवंदनाच्या दिवशी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील संत्राबागांना मोठा फटका बसला. त्यासोबतच गहू आणि चण्यानेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली.कारंजा आणि देवळी तालुक्यात ८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.

टॅग्स :agricultureशेती