शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपुरात बसपामध्ये असंतोष, जाळले नेत्यांचे पुतळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 00:36 IST

महाराष्ट्र विधानसभेतील निवडणुकांनंतर परत एकदा बहुजन समाज पक्षाच्या प्रदेश नेतृत्वात बदल झाल्याने असंतोष निर्माण झाला आहे. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अ‍ॅड.वीरसिंह व नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.संदीप ताजने यांच्या विरोधात नारेबाजी केली. काही कार्यकर्त्यांनी नेत्यांचे प्रतिकात्मक पुतळेदेखील जाळले.

ठळक मुद्देराष्ट्रीय महासचिव वीरसिंह, संदीप ताजने यांच्याविरोधात संताप : प्रादेशिक पक्ष कार्यालयासमोर आंदोलन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र विधानसभेतील निवडणुकांनंतर परत एकदा बहुजन समाज पक्षाच्या प्रदेश नेतृत्वात बदल झाल्याने असंतोष निर्माण झाला आहे. आतापर्यंत केवळ पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू होते. परंतु मंगळवारी नागपुरातील नारी रोड स्थित प्रादेशिक कार्यालयासमोर कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अ‍ॅड.वीरसिंह व नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.संदीप ताजने यांच्या विरोधात नारेबाजी केली. काही कार्यकर्त्यांनी नेत्यांचे प्रतिकात्मक पुतळेदेखील जाळले.वीरसिंह यांच्यासारख्या नेत्यांनी महाराष्ट्रात पक्षाचा सौदा करण्याचे काम केल्याचा संतप्त कार्यकर्त्यांचा आरोप होता. वीरसिंह यांना राज्यातील जे पदाधिकारी मदत करतात त्यांना पक्षात मोठे पद दिले जाते. यामुळे स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाचा जनाधार कमी होत आहे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. ज्यांच्यामुळे महाराष्ट्रात पक्षाचे नुकसान होत आहे असे नेता नको हे आम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांना विरोध प्रदर्शनाच्या माध्यमातून सांगायचे आहे. दुसऱ्या नेत्यांना राज्याची जबाबदारी दिली तर ती आनंदाने स्वीकारु व नि:स्वार्थपणे पक्षाचे काम करु, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी दोन्ही नेत्यांविरोधात निदर्शने करण्यात आली.

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीagitationआंदोलन