शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विद्यापीठाने अंतिम वर्ष परीक्षेबाबत दिशानिर्देश द्यावे : अभाविपची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 19:10 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात धोरण निश्चित न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आतापर्यंत विद्यापीठाने कोणत्याही प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे तयार केलेली नाहीत. त्यामुळे यासंदर्भात लवकरात लवकर दिशानिर्देश जारी करावेत, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देहोम सेंटरवरच परीक्षा घ्यावी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात धोरण निश्चित न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आतापर्यंत विद्यापीठाने कोणत्याही प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे तयार केलेली नाहीत. त्यामुळे यासंदर्भात लवकरात लवकर दिशानिर्देश जारी करावेत, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची परीक्षा महाविद्यालयांच्या होम सेंटरवरच घेता येईल व संचालन विद्यापीठाने करावे, असे अभाविपतर्फे मांडण्यात आले आहे.बऱ्याच महाविद्यालयाचे अभ्यासक्रम पूर्ण झालेले नाही, परीक्षेची गुणवत्ता लक्षात घेता तसेच विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव होऊ नये याकरिता विद्यापीठाने कमीत कमी समान अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घ्यावी. अभ्यासक्रमावर आधारित परिपत्रक विद्यापीठाद्वारे काढण्यात यावे. त्याचप्रमाणे विद्यापीठात शिक्षण घेणाºया इतर राज्यातील विद्यार्थ्यांकरिता त्यांच्या घरीच परीक्षा केंद्र द्यावे. उत्तरपत्रिका पीडीएफ द्वारा अथवा इतर सोशल मीडिया द्वारा पाठवण्याची मुभा द्यावी, अशी सूचना अभाविपतर्फे करण्यात आली आहे.तालुकास्तरावर परीक्षा घ्याविद्यापीठ क्षेत्रातील तालुका स्तरावर परीक्षा घेण्याची व्यवस्था करण्यात यावी. विद्यार्थी ज्या गावी अडकला असेल त्याला तेथेच परीक्षा देण्याची व्यवस्था विद्यापीठातर्फे करण्यात यावी. महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे साहित्य उपलब्ध करून द्यावे असे परिपत्रक विद्यापीठाने जारी करावे. तसेच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या मागील सत्रात राहिलेल्या विषयांमुळे त्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी विद्यापीठाने आपली भूमिका स्पष्ट करावी व विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी अभाविपचे महानगरमंत्री अमित पटले यांनी केली आहे. 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा