शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

नागपूर विद्यापीठ; महाविद्यालय शहरात, वसतिगृह जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 11:16 IST

ग्रामीण भागातून मोठी आस घेऊन शिक्षणासाठी शहरात आलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा बस नाही, करावी लागते पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागातून मोठी आस घेऊन शिक्षणासाठी शहरात आलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसत आहे. शहरातील महाविद्यालय असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना शहरापासून दूर अंतरावरील वसतिगृहात स्थानांतरित केल्याने त्यांना अनेक गैरसोर्इंचा सामना करावा लागत आहे. पायपीट करून बसस्टॅँडवर पोहचणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळत नाही. शिक्षणाचा अक्षरश: खेळखंडोबा होत असल्याची कैफियत विद्यार्थ्यांनी मांडली.सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांची महाविद्यालये ही शहराच्या भागात आहेत. त्यामुळे शहरातच वसतिगृहाची व्यवस्था झाल्यास त्यांना सोयीचे होते. हे विद्यार्थी स्वत:च्या सायकलनेही कॉलेजमध्ये पोहचू शकतात. मात्र यावर्षी अनेक विद्यार्थ्यांना यावर्षी शहराबाहेरील वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली. अशाच वर्धा रोडवरील रुई पांजरी ग्रामपंचायतमध्ये असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. हे वसतिगृह शहरापासून २२ किलोमीटर दूर अंतरावर आहे. आधी हे वसतिगृह मेन रोडवर असल्याचे सांगत वेळेवर बस मिळत असल्याचे सांगण्यात आले. मात्र मुख्य रस्त्यापासून दूर जंगलात असलेल्या गावामध्ये हे वसतिगृह आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना बस पकडण्यासाठी बरेच दूर पायी चालावे लागते. त्यानंतरही वेळेवर त्यांना बस मिळत नाही. बहुतेक विद्यार्थी धरमपेठ विज्ञान महाविद्यालय, डॉ. आंबेडकर कॉलेज, के.डी.के. कॉलेज आदी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. यातील बहुतेकांचे कॉलेज हे सकाळी ७ वाजतापासून सुरू होतात. मात्र रिठीवरून पहिली बसच ७.३० वाजता सुटते. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहचेपर्यंत ९.३० वाजतात व तोपर्यंत अनेक वर्ग संपलेले असतात.कॉलेज ११.३० वाजता सुटल्यानंतर मुलांना ४ वाजताच्या बसची वाट पहावी लागते. विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेवर नाश्ता मिळत नाही व हे विद्यार्थी महाविद्यालयाची वेळ पाळण्यासाठी नाश्ता सोडून उपाशीच निघतात. त्यामुळे त्यांना दिवसभर उपाशी राहावे लागते. वर्धा रोडवर असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या वसतिगृहाची सुविधा होते, मात्र शहरातील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक त्रास आणि शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना शहरातीलच वसतिगृहात स्थानांतरित करण्यात यावे आणि शक्य असेल तर महाविद्यालयाच्या वेळेनुसार बसची सुविधा करून देण्यात यावी, या मागणीचे निवेदन झरीच्या वसतिगृहात राहणाऱ्या ७० च्यावर विद्यार्थ्यांनी विभागाकडे केली आहे.

म्हणून केले विद्यार्थ्यांना स्थानांतरितयाबाबत विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दीक्षाभूमीजवळील संत चोखामेळा वसतिगृहाचे बांधकाम करण्यात येणार असल्याने या विद्यार्थ्यांना झरी पांजरीच्या वसतिगृहात स्थानांतरित केल्याचे सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे चोखामेळाचे दोन वसतिगृह आहेत. त्यापैकी जुन्या म्हणजे द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना स्थानिक वसतिगृहात जागा देण्यात आली व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आले. झरी पांजरीचे वसतिगृह जंगलात आहे. येथे वैद्यकीय सुविधा नाहीत व विद्यार्थ्यांना जंगली श्वापदांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शहरातील मानेवाडा किंवा मनीषनगरच्या वसतिगृहात व्यवस्था करण्यात यावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ