शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

नागपूर विद्यापीठ; महाविद्यालय शहरात, वसतिगृह जंगलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 11:16 IST

ग्रामीण भागातून मोठी आस घेऊन शिक्षणासाठी शहरात आलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा बस नाही, करावी लागते पायपीट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागातून मोठी आस घेऊन शिक्षणासाठी शहरात आलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसत आहे. शहरातील महाविद्यालय असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना शहरापासून दूर अंतरावरील वसतिगृहात स्थानांतरित केल्याने त्यांना अनेक गैरसोर्इंचा सामना करावा लागत आहे. पायपीट करून बसस्टॅँडवर पोहचणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळत नाही. शिक्षणाचा अक्षरश: खेळखंडोबा होत असल्याची कैफियत विद्यार्थ्यांनी मांडली.सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांची महाविद्यालये ही शहराच्या भागात आहेत. त्यामुळे शहरातच वसतिगृहाची व्यवस्था झाल्यास त्यांना सोयीचे होते. हे विद्यार्थी स्वत:च्या सायकलनेही कॉलेजमध्ये पोहचू शकतात. मात्र यावर्षी अनेक विद्यार्थ्यांना यावर्षी शहराबाहेरील वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली. अशाच वर्धा रोडवरील रुई पांजरी ग्रामपंचायतमध्ये असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. हे वसतिगृह शहरापासून २२ किलोमीटर दूर अंतरावर आहे. आधी हे वसतिगृह मेन रोडवर असल्याचे सांगत वेळेवर बस मिळत असल्याचे सांगण्यात आले. मात्र मुख्य रस्त्यापासून दूर जंगलात असलेल्या गावामध्ये हे वसतिगृह आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना बस पकडण्यासाठी बरेच दूर पायी चालावे लागते. त्यानंतरही वेळेवर त्यांना बस मिळत नाही. बहुतेक विद्यार्थी धरमपेठ विज्ञान महाविद्यालय, डॉ. आंबेडकर कॉलेज, के.डी.के. कॉलेज आदी महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. यातील बहुतेकांचे कॉलेज हे सकाळी ७ वाजतापासून सुरू होतात. मात्र रिठीवरून पहिली बसच ७.३० वाजता सुटते. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयात पोहचेपर्यंत ९.३० वाजतात व तोपर्यंत अनेक वर्ग संपलेले असतात.कॉलेज ११.३० वाजता सुटल्यानंतर मुलांना ४ वाजताच्या बसची वाट पहावी लागते. विद्यार्थ्यांना त्यांच्या वेळेवर नाश्ता मिळत नाही व हे विद्यार्थी महाविद्यालयाची वेळ पाळण्यासाठी नाश्ता सोडून उपाशीच निघतात. त्यामुळे त्यांना दिवसभर उपाशी राहावे लागते. वर्धा रोडवर असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या वसतिगृहाची सुविधा होते, मात्र शहरातील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक त्रास आणि शैक्षणिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना शहरातीलच वसतिगृहात स्थानांतरित करण्यात यावे आणि शक्य असेल तर महाविद्यालयाच्या वेळेनुसार बसची सुविधा करून देण्यात यावी, या मागणीचे निवेदन झरीच्या वसतिगृहात राहणाऱ्या ७० च्यावर विद्यार्थ्यांनी विभागाकडे केली आहे.

म्हणून केले विद्यार्थ्यांना स्थानांतरितयाबाबत विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दीक्षाभूमीजवळील संत चोखामेळा वसतिगृहाचे बांधकाम करण्यात येणार असल्याने या विद्यार्थ्यांना झरी पांजरीच्या वसतिगृहात स्थानांतरित केल्याचे सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे चोखामेळाचे दोन वसतिगृह आहेत. त्यापैकी जुन्या म्हणजे द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना स्थानिक वसतिगृहात जागा देण्यात आली व प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना इतरत्र हलविण्यात आले. झरी पांजरीचे वसतिगृह जंगलात आहे. येथे वैद्यकीय सुविधा नाहीत व विद्यार्थ्यांना जंगली श्वापदांचा सामना करावा लागतो. त्यामुळे शहरातील मानेवाडा किंवा मनीषनगरच्या वसतिगृहात व्यवस्था करण्यात यावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ