शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
2
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
3
"कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
4
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
5
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
6
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
7
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
8
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
9
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
10
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
11
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
12
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
13
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
14
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
15
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
16
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
17
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
18
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
19
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
20
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल

काँग्रेसची एकी, अन अंतर्गत बेकीमुळे भाजपची गोची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 7:00 AM

Nagpur news पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जबरदस्त परिवर्तन ही टॅगलाईन घेऊन काँग्रेस मैदानात उतरली. कधी नव्हे ती एकी काँग्रेस नेत्यांमध्ये पहायला मिळाली.

ठळक मुद्देगडकरींची छाप प्रचारात दिसली नाही जबरदस्त परिवर्तन घडलेच

कमलेश वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जबरदस्त परिवर्तन ही टॅगलाईन घेऊन काँग्रेस मैदानात उतरली. कधी नव्हे ती एकी काँग्रेस नेत्यांमध्ये पहायला मिळाली. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे खंदे समर्थक असलेले अनिल सोले यांना ऐनवेळी थांबवून महापौर संदीप जोशी यांना दिलेली उमेदवारी भाजपमधील अनेकांच्या पचनी पडली नाही. गेल्यावेळी पदवीधरांवर असलेली गडकरींची छाप यावेळी कुठेच दिसली नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकहाती किल्ला लढवला पण पदवीधरांना ते रुचले नाहीत. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर चालविलेल्या कॅम्पेनमध्ये काँग्रेसनेही हात धुवून घेतले. शेवटी अभिजित वंजारी यांच्यासारख्या नव्या दमाच्या उमेदवाराला भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यात यश आले.

पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे अनिल सोले हे गडकरी यांचे खंदे समर्थक असतानाही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वजनामुळे महापौर संदीप जोशी यांना तिकीट मिळाले. मुळात सोले यांचे तिकीट कापून ते जोशी यांना देणे हा बदलच पक्षातील अनेकांना न पचणारा होता. घोषणेनंतर जोशी यांनी गडकरींचे आशीर्वाद घेतले. पण त्यानंतरही गडकरी समर्थक खुल्या मनाने सोबत आले नाहीत. नाराज सोले समर्थकांनी पक्षशिस्तीपोटी उघड नाराजी दाखविली नाही. मात्र, मतपत्रिकेत ती व्यक्त केली. शेवटच्या टप्प्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात तळ ठोकून बसले. बूथपर्यंत जाऊन प्रचार केला. अनेकांच्या उघड तर काहींच्या गुप्त भेटी घेतल्या. पण मतदारांना ते आकर्षित करू शकले नाही.

गेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर कोहळे या दोन आमदारांचे तिकीट कापल्यानंतरही त्या जागी भाजपच निवडून आली. या अनुभवामूळे उमेदवार बदलला तरी भाजपची ‌‘व्होट बँक‘ फुटत नाही, या भ्रमात नेते होते. शेवटी त्यांचा हा भ्रम तुटला आणि भाजपच्या धुरीणांनी स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला.

गेल्या विधानसभा निवडणुकीत पूर्व नागपुरात उमेदवारी न मिळताच वंजारी यांनी पक्षनेतृत्वाशी चर्चा करून आपला मोर्चा पदवीधर मतदारसंघाकडे वळविला होता. मायक्रो प्लॅनिंग करीत सहाही जिल्ह्यात स्वत:चे नेटवर्क उभे केले. प्रत्यक्ष मतदार नोंदणीवर भर दिला. काँग्रेसनेही त्यांच्या कामावर विश्वास दाखवत तिकीट दिले. एरव्ही गटातटात विभागलेली काँग्रेस यावेळी एकदिलाने लढली. पहले भाजपसे बचेंगे तभी तो आपसमे लढेंगे, अशी सामंजस्याची भूमिका काँग्रेसचे मंत्री व नेत्यांनी घेतली. बैठका

पक्षसंघटनेसह प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण ताकदीने वंजारी यांच्या पाठिशी उभा राहिला. पदवीधर निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसचे बूथ लागले. त्यामुळे भाजप नेत्याच्या कृपादृष्टीसाठी पडद्यामागे लपणाऱ्या काही नेत्यांना प्रत्यक्ष समोर येऊन काम करावे लागले. महाविकास आघाडी लढत असल्यामुळे राष्ट्रवादीनेही मोलाची साथ दिली तर भाजपवर टपून असलेल्या शिवसेनेनेही प्रचारात जीव ओतला. शेवटी तिघांनी मिळून ‌भाजपची शिकार केली आणि महाविकास आघाडीचा प्रयोग गडकरी- फडणवीसांच्या नागपुरात यशस्वी करून दाखवला.

बहुजनवाद जोरात

 पदवीधर ही सुशिक्षितांची निवडणूक समजली जाते. मात्र, या वेळी निवडणुकीत जात व बहुजनवाद जोरात चालला. एरव्ही भाजपची व्होट बँक समजल्या जाणाऱ्या तेली समाजाची एकगठ्ठा मते आपला माणूस म्हणून वंजारी यांच्या पारड्यात पडली. संघाचा उमेदवार विरुद्ध बहुजन असे चित्र निर्माण रंगविण्यात सामाजिक संघटनांना यश आले. याचा भाजपला मोठा फटका बसला. भाजपने हा धोका आधीच ओळखून प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांना निवडणूक प्रभारी बनविले होते. तर प्रचाराचा पूर्ण फोकस वर्धेचे खासदार रामदास तडस यांच्यावर केंद्रित केला. मात्र, त्यांनाही मतदारांनी सिरियसली घेतले नाही. ब्रेकनंतर मिळालेल्या पहिल्याच जबाबदारीत बावनकुळे फेल ठरले.

टॅग्स :Abhijit Wanjariअभिजीत वंजारी