शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

नागपुरात प्रशासकीय यंत्रणेने जोपासली अनोखी संवेदनशीलता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 00:45 IST

कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’च्या संकटकाळातही विविध विभागातील अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत शहराच्या विविध भागात राहणाऱ्या गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. स्वत:च्या पगारातून यथाशक्ती निधी गोळा करून त्यातून जीवनावश्यक वस्तूंच्या ७०० किट खरेदी करून स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वितरित केल्या.

ठळक मुद्देजीवनावश्यक वस्तूंच्या किटचे सातशे कुटुंबांना वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’च्या संकटकाळातही विविध विभागातील अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत शहराच्या विविध भागात राहणाऱ्या गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. स्वत:च्या पगारातून यथाशक्ती निधी गोळा करून त्यातून जीवनावश्यक वस्तूंच्या ७०० किट खरेदी करून स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वितरित केल्या.शासकीय सेवेत असतानाही सामाजिक संवेदना असलेल्या अधिकाऱ्यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत मदतीचा हात देऊन आपली संवेदशीलता जपली आहे. त्यात विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच समाजकल्याण, विक्रीकर आदींचाही समावेश आहे.‘लॉकडाऊन’च्या संकटकाळात प्रशासकीय कामाची चौकट ओलांडून समाजातील दुर्लक्षित, कष्टकऱ्यांना सुखाचे चार घास मिळावे यासाठी अनेकजण पुढे आले आहेत. समाजातील शेवटच्या घटकातील एकही माणूस उपाशीपोटी झोपता कामा नये यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करीत असून याला स्वयंसेवी संस्थांकडून चांगला सहयोग मिळत आहे. या संकटकाळात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी मदतीचे एक पाऊल पुढे टाकले आहे. यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना साद घातली. त्याला प्रतिसाद देत महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग, तहसीलदार प्रताप वाघमारे तसेच नितीन गोहणे, स्नेहल खवले यांनी सहकारी अधिकाऱ्यांना आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला महसूल नव्हे तर इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला. गोळा झालेल्या निधीमधून शासनातर्फे स्वस्त धान्य उपलब्ध होत असताना गरज राहते ती किराणा सामानाची. ती पूर्ण करण्यासाठी तीन डाळी, तेल, तिखट, मीठ, हळद आदी एक ते दीड महिना पुरेल एवढे साहित्य असलेल्या किट ७०० कुटुंबांसाठी तयार करण्यात आल्या. तिचे प्रियदर्शिनी संघटना, समता संघटना, कराडे मित्रमंडळ, सिद्धार्थ मित्रमंडळ आदींच्या साहाय्याने थेट गरीब व गरजूपर्यंत त्या वाटण्यात आल्या. हा उपक्रम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी करण्यात आला, हे विशेष.महसूल, विक्रीकर, समाजकल्याण, शिक्षण, माहिती आदी विभागातील अधिकाऱ्यांनी स्वत:च्या पगारातून तीन लाख रुपये गोळा केले. मोलमजुरी करणाऱ्या अत्यंत गरीब कुटुंबाची यादी तयार करण्यात आली. यामध्ये ओंकारनगर, वंजारीनगर, रामटेकेनगर, बेसा आदी भागात राहणाऱ्या गरीब कुटुंबांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर