शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आकाश आणि धरणीचे मीलन म्हणजे राम जानकी विवाह; जगद्गुरू रामानुजाचार्य अनंतचार्य महाराज

By जितेंद्र ढवळे | Updated: January 19, 2024 19:26 IST

महाराज म्हणाले, मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला श्रीरामांचा सीतेशी विवाह झाला होता.

नागपूर: आकाश आणि धरणीचे मीलन म्हणजे राम जानकी विवाह. भगवान श्रीरामांचा मिथीलानरेश सीतेशी विवाह झाला होता. सीता ही भूमिकन्या होती आणि श्रीराम हे विष्णूचा अवतार होते. श्रीराम जानकी विवाह म्हणजे पावित्र्य, सत्यता, प्रेम आणि विश्वास याचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन जगद्गुरू रामानुजाचार्य अंनतचार्य महाराज यांनी केले. मारोती देवस्थान ट्रस्ट आणि श्रीराम सेवा समितीद्वारे आयोजित संगीतमय रामकथेचे आयोजन अयोध्या धाम, लेंड्रा पार्क, रामदासपेठ येथे आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवारी रामकथेच्या चौथ्या दिवशी राम जानकी विवाह विषयावर प्रवचन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

महाराज म्हणाले, मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला श्रीरामांचा सीतेशी विवाह झाला होता. जनकाने आपल्या सर्व कन्या उर्मिला, श्रृतकीर्ती आणि मांडवी या अनुक्रमे लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत यांना दिल्या. हिंदू शास्त्रानुसार विवाह हा संस्कार आहे. तो केवळ शारीरिक मिलन नसून दोन आत्म्याचे मीलन आहे. विवाह संस्कारामुळे नात्यामध्ये दृढता, सुख शांती, कुलवृद्धी होते. श्रीराम जानकी विवाहाच्या कथा ऐकल्यामुळे नात्यांमध्ये माधुर्य, एकता निर्माण होते. तरुण-तरुणींनी राम जानकीच्या कथा ऐकल्या तर त्यांचे वैवाहिक जीवन सफल आणि समृद्ध होते. रामायणानुसार श्रीराम हे मर्यादा पुरुष तर सीता ही आदिशक्ती आहे. सीतारूपी शक्ती जवळ होती म्हणून श्रीरामांना रावणाचा वध करता आला, असे रामायण सांगते, असेही अनंतचार्य महाराज यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूर