शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

आकाश आणि धरणीचे मीलन म्हणजे राम जानकी विवाह; जगद्गुरू रामानुजाचार्य अनंतचार्य महाराज

By जितेंद्र ढवळे | Updated: January 19, 2024 19:26 IST

महाराज म्हणाले, मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला श्रीरामांचा सीतेशी विवाह झाला होता.

नागपूर: आकाश आणि धरणीचे मीलन म्हणजे राम जानकी विवाह. भगवान श्रीरामांचा मिथीलानरेश सीतेशी विवाह झाला होता. सीता ही भूमिकन्या होती आणि श्रीराम हे विष्णूचा अवतार होते. श्रीराम जानकी विवाह म्हणजे पावित्र्य, सत्यता, प्रेम आणि विश्वास याचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन जगद्गुरू रामानुजाचार्य अंनतचार्य महाराज यांनी केले. मारोती देवस्थान ट्रस्ट आणि श्रीराम सेवा समितीद्वारे आयोजित संगीतमय रामकथेचे आयोजन अयोध्या धाम, लेंड्रा पार्क, रामदासपेठ येथे आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवारी रामकथेच्या चौथ्या दिवशी राम जानकी विवाह विषयावर प्रवचन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

महाराज म्हणाले, मार्गशीर्ष शुक्ल पंचमीला श्रीरामांचा सीतेशी विवाह झाला होता. जनकाने आपल्या सर्व कन्या उर्मिला, श्रृतकीर्ती आणि मांडवी या अनुक्रमे लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत यांना दिल्या. हिंदू शास्त्रानुसार विवाह हा संस्कार आहे. तो केवळ शारीरिक मिलन नसून दोन आत्म्याचे मीलन आहे. विवाह संस्कारामुळे नात्यामध्ये दृढता, सुख शांती, कुलवृद्धी होते. श्रीराम जानकी विवाहाच्या कथा ऐकल्यामुळे नात्यांमध्ये माधुर्य, एकता निर्माण होते. तरुण-तरुणींनी राम जानकीच्या कथा ऐकल्या तर त्यांचे वैवाहिक जीवन सफल आणि समृद्ध होते. रामायणानुसार श्रीराम हे मर्यादा पुरुष तर सीता ही आदिशक्ती आहे. सीतारूपी शक्ती जवळ होती म्हणून श्रीरामांना रावणाचा वध करता आला, असे रामायण सांगते, असेही अनंतचार्य महाराज यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूर