शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मुद्रा योजनेमुळे बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 01:48 IST

देशात कृषीच्या समस्येनंतरची सर्वात मोठी समस्या ही बेरोजगारीची असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर हाथ को काम, हर खेत को पानी’ या संकल्पनेनुसार मुद्र्रा योजनेच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना ....

ठळक मुद्दे केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर : मुद्रा प्रोत्साहन अभियानाचे उद्््घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात कृषीच्या समस्येनंतरची सर्वात मोठी समस्या ही बेरोजगारीची असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हर हाथ को काम, हर खेत को पानी’ या संकल्पनेनुसार मुद्र्रा योजनेच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना स्वयंरोजगार करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी येथे केले.मुद्रा कर्ज योजनेचा प्रसार व्हावा, या उद्देशाने राज्यस्तरीय बँकर्स समिती, महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित ‘मुद्रा प्रोत्साहन अभियाना’चे उद्घाटन करताना केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर बोलत होते. याप्रसंगी महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यसभेचे खासदार अजय संचेती, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, आ. गिरीश व्यास, आ. सुधाकर देशमुख, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे व बँक आॅफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक आर.के. गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते. पंतप्रधानांनी जन-धन योजना, विमा योजना, पीक विमा योजना यासारख्या अनेक योजना हाती घेतल्या असून, त्यातील मुद्रा योजनेमुळे बेरोजगारीचा गंभीर प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे नोकर कपात होत असताना स्वयंरोजगारनिर्मिती हे बेरोजगारीचे आव्हान पेलू शकते. तरुणांनी स्वयंरोजगारासाठी मुद्रा योजनेचा लाभ घेऊन इतरांनाही रोजगार उपलब्ध करून द्यावेत. ग्रामीण भागात परंपरागत शेती व्यवसायासोबतच कुक्कुटपालन, शेळीपालन, दुग्धव्यवसाय यासारख्या पूरक व्यवसायाची कास शेतकºयांनी धरावी. त्याकरिता मुद्रा योजनेंतर्गत कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे. या जोडधंद्यामुळे शेतकरी आत्महत्या थांबतील, असा विश्वासही अहीर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी मुद्रा योजनेंतर्गत व स्टॅन्ड अप इंडिया योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरीपत्राचे वितरण करण्यात आले. राजकुमार जगने, प्रशांत हाडके, शंकर उमरेडकर, प्रवीण कांबळे, कुंजन पटेल, विनायक इंगोले यांना मुद्रा योजनेच्या ‘शिशू, किशोर व तरुण’ या श्रेणीतील कर्जाचे मंजूरपत्र वितरित करण्यात आले. मुद्रा योजनेचे लाभार्थी प्रदीप मेश्राम व स्टॅन्ड अप इंडिया योजनेच्या लाभार्थी निशिगंधा राऊत यांनी योजनेसंदर्भात अनुभव विशद केले. प्रास्ताविक आर.के. गुप्ता यांनी केले.तालुकास्तरावरही अभियान राबवायाप्रसंगी महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी अशाप्रकारचे मुद्र्रा प्रोत्साहन अभियान जिल्हा प्रशासन व बँकेच्यामार्फत तालुका व तहसीलस्तरावरही आयोजित करण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. या योजनेची फलश्रुती लाभार्थ्यांनी त्यांच्या कर्जाच्या परतफेडीवर अवलंबून आहे, त्यामुळे इतरांना कर्ज मिळण्याची संधी मिळेल, या बाबीचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.मुद्रा योजनेची यशोगाथायाप्रसंगी नागपुरातील मुद्रा योजनेंतर्गत विविध लाभार्थ्यांची यशकथा चित्रफितीद्वारे उपस्थितांना दाखविण्यात आल्या. डिजिटल बँकिंग व्यवहारांना चालना मिळण्याच्या हेतूने ‘भीम अ‍ॅपचे (भारत इंटरफेस फॉर मनी) प्रात्यक्षिकही यावेळी सादर करण्यात आले. याप्रसंगी विविध बँकांच्या मुद्रा योजना लाभार्थ्यांच्या यशकथा समाविष्ट असणाºया ‘यशोगाथा’ या पुस्तिकेचे प्रकाशनही अहीर यांच्या हस्ते करण्यात आले.नोटाबंदी देशासाठी लाभदायकजी मंडळी कालपर्यंत समर्थन करीत होती ती आज विरोध करीत आहेत. परंतु नोटाबंदीमुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने खूप मोठा फायदा झाला आहे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यावेळी स्पष्ट केले....तर तो गुन्हा ठरेलमुद्रा योजनेचा कार्यक्रम हा पंतप्रधानांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला सर्वच क्षेत्रीय बँक अधिकाºयांनी हजर असणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही, याबाबत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या योजनेंतर्गत अर्ज करणाºया प्रत्येकाला कर्ज हे सुलभपणे मिळावे, ही बँकेच्या अधिकाºयांची जबाबदारी आहे. अधिकारी आपल्या खिशातून कर्ज देत नाही, तेव्हा अर्ज करणाºयाला कर्ज मिळालेच पाहिजे. तसे होत नसेल तर पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अडथळा निर्माण केल्यासारखे होईल आणि तो मोठा गुन्हा ठरेल, असा इशाराही केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यावेळी बँकेच्या अधिकाºयांना दिला. तसेच कर्जाची परतफेड करण्याबाबत अधिकारी उदासीन असतात, ही उदासीनता झटकून फिल्डमध्ये जाऊन कर्तव्य बजावावे, अशी सूचनाही केली.