शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

नागपूर विभागात ७५ लाखांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 21:06 IST

कृषी विभागाच्या गुणवत्ता मिशन नियंत्रण कार्यक्रमांतर्गत भरारी पथकांनी केलेल्या कारवाईमध्ये नागपूर विभागात २२ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवडाअखेरपर्यंत झालेल्या कारवायांमध्ये ७५ लाख एक हजार रुपयांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त करण्यात आले आहे. विक्रेत्यांवरील सर्वाधिक कारवाया नागपूर जिल्ह्यात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृषी विभागाच्या गुणवत्ता मिशन नियंत्रण कार्यक्रमांतर्गत भरारी पथकांनी केलेल्या कारवाईमध्ये नागपूर विभागात २२ विक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवडाअखेरपर्यंत झालेल्या कारवायांमध्ये ७५ लाख एक हजार रुपयांचे अनधिकृत कापूस बियाणे जप्त करण्यात आले आहे. विक्रेत्यांवरील सर्वाधिक कारवाया नागपूर जिल्ह्यात आहेत.नागपूर विभागातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर या चार जिल्ह्यात अनधिकृत कापूस बियाणे विक्रेत्यांवर मागील महिनाभरात कारवाया करण्यात आल्या. भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात कापसाचे पीक होत नसल्याने या दोन्ही जिल्ह्यात कारवाया नाही. अनधिकृत कापूस बियाणे विके्रत्यांवर नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १२ गुन्हे दाखल आहेत. त्यापाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यात सहा, गडचिरोली जिल्ह्यात तीन तर वर्धा जिल्ह्यात फक्त एका गुन्ह्याची नोंद आहे. या सर्व ठिकाणांहून अनधिकृत बियाण्यांचे ८ हजार ९६७ पॉकेट आणि २८३ खुले बियाणे जप्त करण्यात आले आहे.कापूस बियाणेसंदर्भात जिल्हा अणि तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी, तसेच तालुका व पंचायत समितीस्तरावर तालुका कृषी अधिकारी यांच्याअंतर्गत ही मोहीम १५ मेपासून राबविणे सुरू झाले असून, १५ आॅगस्टपर्यंत चालणार आहे.शेतकऱ्यांना योग्य दर्जाच्या कृषी निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विभाग तसेच जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत गुणवत्ता मिशन नियंत्रण-२०२० कार्यक्रम राबविला जात आहे. या पथकांमार्फत बियाणे, खते व कीटकनाशकांचे नमुने काढण्याचे वर्गीकरण केले जात आहे. प्रत्येक तालुक्यात मिळून १३ तालुका तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविली जात आहे.जिल्ह्यात १३५६ विक्रेतेनागपूर जिल्ह्यात बियाण्यांचे १ हजार ३५६ विक्रेते आहेत. रासायनिक खतांचे १ हजार ४५४ विक्रेते असून, कीटकनाशकांचे १ हजार २६६ विक्रेते आहेत. जिल्ह्यात पूर्णवेळ गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक २, अर्धवेळ गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक (राज्यस्तर) २३, अर्धवेळ निरीक्षक (जिल्हा परिषद स्तर) १६, असे एकूण ४१ गुणनियंत्रक कार्यरत आहेत.

टॅग्स :cottonकापूसraidधाड