शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य; प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसन निर्णयासाठी आता ७ ऑगस्टचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 12:03 IST

उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य आणि गोसेखुर्द प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावकऱ्यांच्या पुनर्वसनाच्या निर्णयासाठी आता वनविभागाने ७ ऑगस्टचा नवा मुहूर्त काढला आहे.

ठळक मुद्देसात महिन्यानंतर पोहचले भंडारा जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र

गोपालकृष्ण मांडवकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्य आणि गोसेखुर्द प्रकल्पामुळे बाधित झालेल्या गावकऱ्यांच्या पुनर्वसनाच्या निर्णयासाठी आता वनविभागाने ७ ऑगस्टचा नवा मुहूर्त काढला आहे. मागील वर्षभरापासून भिजतघोंगडे असलेला हा प्रश्न भंडारा जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रासाठी अडला होता. आता त्यांच्याकडून हे पत्र आल्याने वन विभागाने पुनर्वसनाच्या निर्णयासाठी मुंबईमध्ये बैठक बोलाविली आहे.उमरेड-पवनी-कऱ्हांडला विस्तारित वन्यजीव अभयारण्य आणि गोसेखुर्द प्रकल्पामुळे बाधित गावकऱ्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया मागील वर्षभारापासून रेंगाळत आहे. ६.३४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या या अभयारण्यामध्ये ३.१२ चौरस किलोमीटर वनजमीन जाणार आहे. या सोबतच २.९५ चौरस किलोमीटर शेतजमीन आणि ०.२७ चौरस किलोमीटर महसुलाचे क्षेत्र जाणार आहे. या महसुलाच्या क्षेत्रामध्ये गावठाण, आबादी, कुरण, स्मशानभूमी आदी जागांचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या वाढीव क्षेत्रामुळे बाधित होणारी पाऊणगाव, कवडसी आणि गायडोंगरी ही तीन गावे भंडारा जिल्ह्यातील आहेत. या विस्तारीकरणामुळे ६०५ कुटुंब बाधित होणार आहेत. तर पाच रिठी गावांचाही यात समावेश आहे.मागील वर्षभरापासून ही प्रक्रिया सुरू आहे. हे विस्तारित वन्यजीव अभयारण्य घोषित करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली २१ ऑगस्ट २०१८ रोजी मंत्रालयात पहिली बैठक झाली होती. त्यानंतर ५ डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या १४ व्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य वन्यजीव मंडळाने या विस्तारित अभयारण्याला मान्यता दिली होती.

असा झाला विलंबशासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयाने त्रुटी काढल्या होत्या. विस्तारित म्हणून घोषित केलेल्या जागेमध्ये स्मशानभूमी, आबादी, कुरण, मरघट, महसूल वन असे नमूद करण्यात येऊनही सर्वे एरिया नमूद नव्हता. त्यामुळे ही त्रुटी दुरुस्त करण्यासाठी भंडाराचे तत्कालीन जिल्हाधिकारी गोयल यांच्याकडे सात महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार झाला होता. मात्र ही त्रुटी दुरुस्त करण्यासाठी या कार्यालयाला सात महिने लागले. या संदर्भात खुद्द प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयाने पाठपुरावा केल्यावर अलिकडे हे दुरुस्तीचे पत्र प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयाला पोहचले. तेव्हा कुठे आदिवासी विकास व वन राज्यमंत्री परिणय फुके यांनी मुंबईत ७ ऑगस्टची बैठक ठरविली आहे.

 

टॅग्स :Tigerवाघ