शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

उमरेड-कऱ्हांडल्याच्या ‘त्या’ प्रकल्पग्रस्तांना मिळेल लाभ ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:07 IST

नागपूर : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात गेलेल्या रानबाेडी गावातील ५७ कुटुंबांना पुनर्वसन पॅकेजचा लाभ देण्याची मागणी जिल्हाधिकारी व वनविभागाने अखेर मान्य ...

नागपूर : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात गेलेल्या रानबाेडी गावातील ५७ कुटुंबांना पुनर्वसन पॅकेजचा लाभ देण्याची मागणी जिल्हाधिकारी व वनविभागाने अखेर मान्य केली. पात्र असूनही या कुटुंबांना काही निकष लावून अपात्र ठरविण्यात आले हाेते. दाेन वर्षाच्या लढ्यानंतर त्यांना दिलासा मिळाला.

उमरेड-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य प्रकल्पग्रस्त अन्याय निवारण समितीच्या शिष्टमंडळाने वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अन्यायग्रस्त कुटुंबाची बाजू मांडली. समितीतील राजानंद कावळे यांनी सांगितले, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात वाघांची संख्या वाढत असताना मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जंगलातील गावांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. यानुसार कुही तालुक्यातील तारणा गटग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या गावांचा पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार झाला हाेता. २०१८ च्या जानेवारी व जून महिन्यात ग्रामसभा घेऊन पुनर्वसन पॅकेजबाबत ठराव करण्यात आला. त्यानुसार गावातील ४३५ पैकी २२४ कुटुंबांची यादी पात्र ठरविण्यात आली. कामधंद्यासाठी बाहेर राहणाऱ्या कुटुंबांची दुसरी यादी तयार करण्याचा ठरावही घेण्यात आला. मात्र त्यानंतर चार गाव बाधित कृती समितीच्या सदस्यांनी मर्जीतील कुटुंबांची यादी तयार करून इतरांना डावलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जाणकारानुसार गाव नमुना ८ अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंब पुनर्वसनासाठी लाभार्थी ठरताे. मात्र वेगळे निकष लावून ५७ कुटुंबांना यादीतून डावलण्यात आले व त्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आले.

पुनर्वसनाचा पैसा आणि निर्धारित गावात घरासाठी भूखंड न मिळाल्याने या कुटुंबांना गाव साेडता येत नव्हते. दुसरीकडे वनविभाग या नागरिकांना गावात राहू देण्यास तयार नव्हते. दाेन्हीकडून पिचलेल्या या कुटुंबांना मानसिक त्रास सहन करावा लागत हाेता. रानबाेडीतील ५७ लाभार्थीना हेतुपुरस्सर अपात्र ठरविणे ही गंभीर चूक यंत्रणेकडून झाली आहे. त्यामुळे त्यांना पुनर्वसनस्थळी भूखंड व पॅकेजसहित सर्व लाभ तातडीने उपलब्ध करून द्यावेत. तसा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे पाठवून लाभ मिळवून देण्याची हमी जिल्हाधिकारी यांनी दिल्याचे कावळे यांनी सांगितले. शिष्टमंडळात माजी आमदार जाेगेंद्र कवाडे, पंचायत समिती सदस्य संदीप खानोरकर, डाॅ. राजहंस वंजारी, रामकृष्ण रिठे, आत्माराम वंजारी, भीमराव देशपांडे, परसराम वंजारी, बंडू वरखडे, मधुकर फुकट, शांताराम ठाकरे, कैलास ठाकरे, कीर्तीजय वंजारी, राजू मेश्राम आदी उपस्थित हाेते.