शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

उमरेड-कऱ्हांडल्याच्या ‘त्या’ प्रकल्पग्रस्तांना मिळेल लाभ ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:07 IST

नागपूर : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात गेलेल्या रानबाेडी गावातील ५७ कुटुंबांना पुनर्वसन पॅकेजचा लाभ देण्याची मागणी जिल्हाधिकारी व वनविभागाने अखेर मान्य ...

नागपूर : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात गेलेल्या रानबाेडी गावातील ५७ कुटुंबांना पुनर्वसन पॅकेजचा लाभ देण्याची मागणी जिल्हाधिकारी व वनविभागाने अखेर मान्य केली. पात्र असूनही या कुटुंबांना काही निकष लावून अपात्र ठरविण्यात आले हाेते. दाेन वर्षाच्या लढ्यानंतर त्यांना दिलासा मिळाला.

उमरेड-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य प्रकल्पग्रस्त अन्याय निवारण समितीच्या शिष्टमंडळाने वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अन्यायग्रस्त कुटुंबाची बाजू मांडली. समितीतील राजानंद कावळे यांनी सांगितले, उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात वाघांची संख्या वाढत असताना मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जंगलातील गावांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. यानुसार कुही तालुक्यातील तारणा गटग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या गावांचा पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार झाला हाेता. २०१८ च्या जानेवारी व जून महिन्यात ग्रामसभा घेऊन पुनर्वसन पॅकेजबाबत ठराव करण्यात आला. त्यानुसार गावातील ४३५ पैकी २२४ कुटुंबांची यादी पात्र ठरविण्यात आली. कामधंद्यासाठी बाहेर राहणाऱ्या कुटुंबांची दुसरी यादी तयार करण्याचा ठरावही घेण्यात आला. मात्र त्यानंतर चार गाव बाधित कृती समितीच्या सदस्यांनी मर्जीतील कुटुंबांची यादी तयार करून इतरांना डावलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जाणकारानुसार गाव नमुना ८ अंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंब पुनर्वसनासाठी लाभार्थी ठरताे. मात्र वेगळे निकष लावून ५७ कुटुंबांना यादीतून डावलण्यात आले व त्यांना लाभापासून वंचित ठेवण्यात आले.

पुनर्वसनाचा पैसा आणि निर्धारित गावात घरासाठी भूखंड न मिळाल्याने या कुटुंबांना गाव साेडता येत नव्हते. दुसरीकडे वनविभाग या नागरिकांना गावात राहू देण्यास तयार नव्हते. दाेन्हीकडून पिचलेल्या या कुटुंबांना मानसिक त्रास सहन करावा लागत हाेता. रानबाेडीतील ५७ लाभार्थीना हेतुपुरस्सर अपात्र ठरविणे ही गंभीर चूक यंत्रणेकडून झाली आहे. त्यामुळे त्यांना पुनर्वसनस्थळी भूखंड व पॅकेजसहित सर्व लाभ तातडीने उपलब्ध करून द्यावेत. तसा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे पाठवून लाभ मिळवून देण्याची हमी जिल्हाधिकारी यांनी दिल्याचे कावळे यांनी सांगितले. शिष्टमंडळात माजी आमदार जाेगेंद्र कवाडे, पंचायत समिती सदस्य संदीप खानोरकर, डाॅ. राजहंस वंजारी, रामकृष्ण रिठे, आत्माराम वंजारी, भीमराव देशपांडे, परसराम वंजारी, बंडू वरखडे, मधुकर फुकट, शांताराम ठाकरे, कैलास ठाकरे, कीर्तीजय वंजारी, राजू मेश्राम आदी उपस्थित हाेते.