शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

संभाजी ब्रिगेडसोबत युती हा उद्धव ठाकरेंचा फुसका बार, चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र

By योगेश पांडे | Updated: August 26, 2022 18:22 IST

उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे ज्या पद्धतीने सरकार चालविले, त्यांना त्याच पद्धतीचे सहकारी भेटतील, असा चिमटादेखील बावनकुळे यांनी काढला.

नागपूर : आगामी निवडणूकांसाठी शिवसेना व संभाजी ब्रिगेड यांची युती झाली आहे. यावर भाजपेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. संभाजी ब्रिगेडला मागील वेळी ०.०६ टक्के मते मिळाली होती. त्यांच्याशी परत युती करून उद्धव ठाकरे यांनी फुसका बार सोडला आहे, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले. शुक्रवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

२०१९ मध्ये संभाजी ब्रिगेडची शिवसेनेसोबत युती होती. त्यावेळी ते ४० जागांवर निवडणुका लढले व त्यांनी ३६ हजाराच्या वर त्यांनी मतं घेतली नाही. त्यांच्या मतांची टक्केवारी ०.०६ टक्के होती. त्यामुळे संभाजी ब्रिगेडसोबत युती करून उद्धव ठाकरे यांनी फुसका बार सोडला आहे. आम्ही काहीतरी करतो आहे हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे बावनकुळे म्हणाले. या युतीचा भाजप किंवा सरकारवर कुठलाही परिणाम होणार नाही. उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे ज्या पद्धतीने सरकार चालविले, त्यांना त्याच पद्धतीचे सहकारी भेटतील, असा चिमटादेखील बावनकुळे यांनी काढला.

पंकजा मुंडे अजिबात नाराज नाहीत

दिल्लीत मी ज्येष्ठ नेत्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी गेलो होतो. त्यांच्याशी चर्चेतून मला उर्जा मिळाली. या भेटीचा इतर काहीही उद्देश नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. पंकजा मुंडे या कधीच नाराज नव्हत्या व आतादेखील नाराज नाहीत. त्यांच्याबाबत चुकीच्या बातम्या पेरण्यात येतात. त्या राष्ट्रीय सचिव आहेत. महाराष्ट्रातदेखील पक्ष संघटन बळकट करण्यासाठी तसेच निवडणूकांत पूर्ण क्षमतेने काम करण्याचे त्यांनी मला आश्वासन दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

आदित्य ठाकरेंचे इव्हेंट मॅनेजमेन्ट बंद होणार

तान्हा पोळा निमित्य आदित्य ठाकरे नागपुरात येत आहेत. खरे तर त्यांचे इव्हेंट मॅनेजमेंट सुरू आहे. एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या की ते इव्हेंट मॅनेजमेंट व विदर्भाचे दौरेदेखील बंद होतील. जेव्हा जनतेची सेवा करण्याची संधी होती तेव्हा त्यांनी काही केले नाही. तेव्हा ते मंत्रालयातदेखील बसले नाही. जनतेला सत्य कळाले आहे व जनता आता त्यांच्या प्रयत्नांना दाद देणार नाही, असे बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना