शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

नागपुरात सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 21:20 IST

वेगवेगळी थाप मारून सायबर गुन्हेगार अनेकांच्या खात्यातील रक्कम लांबवत आहेत. नागपुरात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये सारखी वाढ होत आहे. गेल्या दोन आठवड्यात अशा प्रकारच्या शहरात पंधरा घटना घडल्या असताना आता आणखी बुधवारी दोन घटना उघडकीस आल्या आहेत.

ठळक मुद्देवेगवेगळी थाप : रक्कम लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेगवेगळी थाप मारून सायबर गुन्हेगार अनेकांच्या खात्यातील रक्कम लांबवत आहेत. नागपुरात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये सारखी वाढ होत आहे. गेल्या दोन आठवड्यात अशा प्रकारच्या शहरात पंधरा घटना घडल्या असताना आता आणखी बुधवारी दोन घटना उघडकीस आल्या आहेत.अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीहरी नगरात राहणारे नंदकिशोर मधुकर मून (वय ६७) यांना १ मे रोजी सायबर गुन्हेगाराचा फोन आला. आपण बँक अधिकारी बोलतो. तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. ते नव्याने सुरू करण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी मून यांचा एटीएम कार्ड नंबर मागितला. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर मागून मून यांच्या बँक ऑफ बडोदा खात्यातील ४९ हजार ३९५ रुपये काढून घेतले.दुसरी अशीच घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ मे रोजी घडली. पेन्शन नगरातील रहिवासी शकील इक्बाल अब्दुल (वय ४२) यांच्या मोबाईलवर एकाने फोन केला. तुमचे केवायसी करायचे आहे, असे सांगून आरोपीने शकील यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. त्यानंतर त्यांना मोबाईलवर एक लिंक पाठविली. ही लिंक ओपन केल्याच्या काही वेळेनंतर शकील यांच्या खात्यातून आरोपीने ४९ हजार ९९८ रुपये काढून घेतले.या दोन्ही प्रकरणात नमूद पीडित व्यक्तींनी सायबर शाखेत धाव घेतली. त्यांच्या तक्रारी घेतल्यानंतर सायबर शाखेकडून या दोन्ही प्रकरणांचा तपास करण्यात आला. त्यानंतर बुधवारी अनुक्रमे अजनी आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.तरीही फसवणूक सुरूचनागपुरातच नव्हे तर विविध शहरात अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना रोज घडत आहेत. वृत्तपत्रांमधून त्याची माहितीही प्रकाशित होते. तरीसुद्धा काही व्यक्ती शहानिशा न करता आपल्या बँक खात्याबाबत अनोळखी व्यक्तीला माहिती देतात. लॉटरी लागली, एटीएम, क्रेडिट कार्ड ब्लॉक झाले, केवायसी करायचे आहे, अशी थाप सायबर गुन्हेगार मारतात. त्यानंतर कार्ड किंवा बँक खात्याची माहिती विचारतात किंवा मोबाईलवर एक लिंक पाठवितात. ही लिंक ओपन करताच आपल्या बँकेच्या खात्याची संपूर्ण माहिती आरोपीला कळते आणि त्या आधारे तो ऑनलाईन रक्कम काढून घेतो. वारंवार अशा घटना घडत असून बँकेतर्फेही खातेधारकांना नेहमीच सूचना दिल्या जातात. तरीसुद्धा पुरेशी काळजी न घेतल्यामुळे अशा घटना घडण्याची मालिका सुरूच आहे.सायबर शाखेचे आवाहनया घटनांपासून धडा घेऊन नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन, स्थानिक सायबर शाखेकडून करण्यात आले आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या बँक खात्याची, एटीएम अथवा क्रेडिट कार्डची माहिती देऊ नये. केवायसी करण्याचा प्रकार शक्यतो बँकेत जाऊनच करावा. सायबर गुन्हेगाराच्या थापेबाजीला बळी न पडता आपली रक्कम त्याने लंपास करू नये यासाठी प्रत्येकाने पुरेशी काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnagpurनागपूर