शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

दोन हजारांवर डॉक्टरांचा १२ तासांचा उपवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:23 IST

डॉक्टर व रुग्णांच्या हिताचा विचार न करता लादले जात असलेल्या जाचक कायद्यांच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), नागपूर...

ठळक मुद्देआयएमए : सत्याग्रह करून मागण्यांकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉक्टर व रुग्णांच्या हिताचा विचार न करता लादले जात असलेल्या जाचक कायद्यांच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), नागपूर शाखेने सोमवारी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबून मागण्यांकडे लक्ष वेधले. उपराजधानीतील सुमारे दोन हजारावर डॉक्टरांनी १२ तासांचा उपवास करीत रुग्णसेवा दिली, काहींनी या विषयीचे फलक इस्पितळात लावले होते.‘आयएमए’चे हे सत्याग्रह आंदोलन सकाळी ६ वाजतापासून सुरू झाले. यात ‘आयएमए’चे माजी राष्टÑीय अध्यक्ष डॉ. विनय अग्रवाल, माजी राष्टÑीय अध्यक्ष व पद्मश्री डॉ. ए. मार्तंड पिल्लई, या सत्याग्रह आंदोलनाचे राष्टÑीय संयोजक डॉ. अशोकन यांच्यासह आयएमए नागपूरच्या अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत, सचिव डॉ. प्रशांत राठी, डॉ. प्रकाश देव, डॉ. कृष्णा पराते, डॉ. अलका मुखर्जी आदींचा सहभाग होता.कायदा नव्हे, जाचक अटीला विरोधडॉ. विनय अग्रवाल म्हणाले, डॉक्टरांचा हा सत्याग्रह कुठल्याही कायद्याच्या विरोधात नाही तर त्यातील जाचक अटींच्या विरोधात आहे. यात मुख्य पाच मागण्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोमवारी सायंकाळपर्यंत सादर केले जाणार आहे. शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी हे सत्याग्रह आंदोलन सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपवास करून केले जात आहे. देशभरातील प्रत्येक ‘आयएमए’ शाखेसह राजघाट, साबरमती व सेवाग्राम आश्रम येथे मोठ्या संख्येत आयएमएचे वरिष्ठ पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.पाच मुख्य मागण्याडॉ. ए. मार्तंड पिल्लई म्हणाले, ‘आयएमए’च्या मुख्य पाच मागण्या आहेत. यात ‘क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट’ मधील जाचक अटी रद्द करा ही पहिली मागणी आहे. या कायद्यामुळे छोटे व मध्यम खासगी इस्पितळे बंद पडतील. दुसरी मागणी म्हणजे, राज्यात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यात बदल करावा. या कायद्यामुळे डॉक्टरांवर गुन्हे सिद्ध होण्यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई होत आहे. तिसरी मागणी, ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’ (एमसीआय) बरखास्त करून त्याऐवजी ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ नेमण्याचा घाट केंद्र शासनाने घातला आहे. हा वैद्यकीय व्यावसायिकांच्या स्वायत्ततेवरच घाला आहे. चवथी मागणी, रुग्णाला दिल्या जाणाºया नुकसानभरपाईमध्ये ठराविकपणा असावा, पाचवी व शेवटची मागणी म्हणजे, एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘नेक्स्ट’ (नॅशनल अ‍ॅक्झिट टेस्ट) परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्याची अट शिथिल करावी अशा मागण्या आहेत.