शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

दोन हजारांवर डॉक्टरांचा १२ तासांचा उपवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:23 IST

डॉक्टर व रुग्णांच्या हिताचा विचार न करता लादले जात असलेल्या जाचक कायद्यांच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), नागपूर...

ठळक मुद्देआयएमए : सत्याग्रह करून मागण्यांकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉक्टर व रुग्णांच्या हिताचा विचार न करता लादले जात असलेल्या जाचक कायद्यांच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), नागपूर शाखेने सोमवारी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबून मागण्यांकडे लक्ष वेधले. उपराजधानीतील सुमारे दोन हजारावर डॉक्टरांनी १२ तासांचा उपवास करीत रुग्णसेवा दिली, काहींनी या विषयीचे फलक इस्पितळात लावले होते.‘आयएमए’चे हे सत्याग्रह आंदोलन सकाळी ६ वाजतापासून सुरू झाले. यात ‘आयएमए’चे माजी राष्टÑीय अध्यक्ष डॉ. विनय अग्रवाल, माजी राष्टÑीय अध्यक्ष व पद्मश्री डॉ. ए. मार्तंड पिल्लई, या सत्याग्रह आंदोलनाचे राष्टÑीय संयोजक डॉ. अशोकन यांच्यासह आयएमए नागपूरच्या अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत, सचिव डॉ. प्रशांत राठी, डॉ. प्रकाश देव, डॉ. कृष्णा पराते, डॉ. अलका मुखर्जी आदींचा सहभाग होता.कायदा नव्हे, जाचक अटीला विरोधडॉ. विनय अग्रवाल म्हणाले, डॉक्टरांचा हा सत्याग्रह कुठल्याही कायद्याच्या विरोधात नाही तर त्यातील जाचक अटींच्या विरोधात आहे. यात मुख्य पाच मागण्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोमवारी सायंकाळपर्यंत सादर केले जाणार आहे. शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी हे सत्याग्रह आंदोलन सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपवास करून केले जात आहे. देशभरातील प्रत्येक ‘आयएमए’ शाखेसह राजघाट, साबरमती व सेवाग्राम आश्रम येथे मोठ्या संख्येत आयएमएचे वरिष्ठ पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.पाच मुख्य मागण्याडॉ. ए. मार्तंड पिल्लई म्हणाले, ‘आयएमए’च्या मुख्य पाच मागण्या आहेत. यात ‘क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट’ मधील जाचक अटी रद्द करा ही पहिली मागणी आहे. या कायद्यामुळे छोटे व मध्यम खासगी इस्पितळे बंद पडतील. दुसरी मागणी म्हणजे, राज्यात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यात बदल करावा. या कायद्यामुळे डॉक्टरांवर गुन्हे सिद्ध होण्यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई होत आहे. तिसरी मागणी, ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’ (एमसीआय) बरखास्त करून त्याऐवजी ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ नेमण्याचा घाट केंद्र शासनाने घातला आहे. हा वैद्यकीय व्यावसायिकांच्या स्वायत्ततेवरच घाला आहे. चवथी मागणी, रुग्णाला दिल्या जाणाºया नुकसानभरपाईमध्ये ठराविकपणा असावा, पाचवी व शेवटची मागणी म्हणजे, एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘नेक्स्ट’ (नॅशनल अ‍ॅक्झिट टेस्ट) परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्याची अट शिथिल करावी अशा मागण्या आहेत.