शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘जेल ब्रेक’मध्ये दोघे अडकले

By admin | Updated: April 7, 2015 02:03 IST

सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या कैदी पलायन प्रकरणाच्या कटात सहभागी असलेल्या दोन गुन्हेगारांना अटक

पाचही कैदी पळाले छिंदवाड्याकडे / पळून जाण्यास मदत; पैसेही मागून दिलेनागपूर : सर्वत्र प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या कैदी पलायन प्रकरणाच्या कटात सहभागी असलेल्या दोन गुन्हेगारांना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर यश मिळवले. नवाब तोहिद खान (वय २२, रा. मानकापूर) आणि गणेश कमलकिशोर शर्मा (वय ३०, रा. ताजनगर) अशी या दोघांची नावे आहेत. त्यांनी बिशनसिंग रामूलाल उईके, शिबू ऊर्फ मोहम्मद शोएब सलीम खान, सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादूर गुप्ता, प्रेम ऊर्फ नेपाली शालिकराम खत्री आणि गोलू ऊर्फ आकाश रज्जूसिंग ठाकूर या पाच खतरनाक कैद्यांना कारागृहातून पळून जाण्यात सक्रिय मदत केली. राज्यातील सर्वात सुरक्षित समजला जाणाऱ्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून उपरोक्त पाच खतरनाक कैदी मंगळवारी पहाटे पळून गेले. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी पळून जाण्याचा कट रचला होता. तो अमलात आणण्यासाठी त्यांनी खान आणि शर्मा या गुन्हेगारांची मदत घेतली. हे दोघे जबरीचोरीच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत. मोबाईलच्या माध्यमातून शोएब आणि गुप्ताच्या ते दोन आठवड्यांपासून सतत संपर्कात होते. कसे पळायचे, कुठून पळायचे यासाठी पळालेले कैदी आणि खान तसेच शर्मा एकमेकांच्या सतत संपर्कात होते. सोमवारी मध्यरात्री पलायनाचा कट अमलात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. ठरल्याप्रमाणे मंगळवारी पहाटे २ च्या सुमारास नवाब खान आणि गणेश शर्मा चुनाभट्टीच्या दिशेला उभे राहिले. फोनवरून मिळणाऱ्या सूचनांनुसार त्यांनी बाहेरून दोर फेकला. त्याआधारे आरोपी बिशन उईके, शिबू खान, सत्येंद्र गुप्ता, प्रेम नेपाली आणि गोलू ठाकूर बाहेर आले. (प्रतिनिधी)१ नातेवाईकांकडून घेतले पैसे नवाब खान आणि गणेश शर्माच्या मोटरसायकल तसेच अन्य एका वाहनावर बसून कैदी मोमीनपुऱ्यातील बकरामंडीत पोहचले. तेथून ते गुप्ताच्या पिवळी नदी येथील नातेवाईकांकडे आले. नातेवाईकांकडून पैसे घेतल्यानंतर आरोपी कोराडी मार्गावर आले. तेथून छिंदवाड्याकडे जाणाऱ्या बसमध्ये बसून पाचही खतरनाक कैदी महाराष्ट्राबाहेर पळाले.पुन्हा दोन तुरुंगाधिकारी निलंबितदरम्यान, या प्रकरणात सोमवारी आणखी दोन वरिष्ठ तुरुंगाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. वैभव आत्राम आणि अशोक मलवाड अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे आता निलंबित अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या १० झाली आहे. यापूर्वी अधीक्षक कांबळे तसेच तुरुंगाधिकारी पारेकर आणि महाशिखरेला निलंबित करण्यात आले. त्यानंतर शनिवारी राजू पाटील, मंगेश प्रजापती, रमेश ढेकळे, अशोक भांडारकर आणि संजय ठोकळ या पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते.३ अब तक ४७सोमवारी पुन्हा कारागृहात १२ मोबाईल, ४ सीमकार्ड, ७ बॅटरी आणि चार्जरसह ब्ल्यूटूथही सापडले. मंगळवारपासून कारागृहात सुरू असलेल्या झाडाझडतीत सोमवारपर्यंत एकूण ४७ मोबाईल सापडले. या कारागृहात किमान ५०० मोबाईल असल्याचे वृत्त लोकमतने यापूर्वी वेळोवेळी प्रकाशित केले, हे येथे उल्लेखनीय.४ लोकमतचे वृत्त तंतोतंत दरम्यान खतरनाक कैद्याच्या पलायनाने राज्यभर खळबळ उडाली. कैद्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेसह शहर पोलिसांची वेगवेगळी पथके कामी लागली. मोबाईल टॉवरवरून सीडीआर काढण्यात आला. त्यात घटनेच्या वेळेदरम्यान तोहिद खान आणि गणेश शर्मांच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स अधोरेखित झाले. हे दोघे यापूर्वी कारागृहात उपरोक्त कैद्यांच्या भेटीलाही गेले होते, त्याचीही पुष्टी झाली. त्यामुळे या दोघांना रविवारी रात्री अटक करण्यात आली. ‘ठोकपीट’ झाल्यानंतर या दोघांनी कैदी पलायन प्रकरणाच्या कटाचा उलगडा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसमोर केला. त्यांनी या कटात सहभागी असल्याची कबुली देतानाच पळून गेलेल्या कैद्यांबाबतही महत्त्वाची माहिती गुन्हे शाखेला दिली. त्यामुळे गुन्हे शाखेच्या उपायुक्त दीपाली मासीरकर यांच्या पथकाने सोमवारी रात्री या दोघांना परिमंडळ ४ चे उपायुक्त यिशू सिंधू यांच्या ताब्यात दिले. विशेष म्हणजे, लोकमतने या प्रकरणात प्रकाशित केलेले वृत्त तंतोतंत खरे ठरल्याचे अटकेतील आरोपीच्या जबानीवरून आणि एकूणच घडामोडीवरून स्पष्ट झाले आहे. दीक्षितांचे नो कॉमेंटगेल्या तीन दिवसांपासून नागपूरच्या कारागृहात चौकशी करणारे पोलीस महासंचालक (एसीबी) प्रवीण दीक्षित सोमवारी पुन्हा ४ ते ५ तास कारागृहात होते. त्यांच्यासोबत अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) के. एल. बिष्णोई हे सुद्धा होते. त्यांनी सोमवारी बॉम्ब शोधक-नाशक पथकासह श्वान पथकालाही कारागृहात तपासणीसाठी बोलवून घेतले. मात्र, सोमवारीदेखील त्यांनी पत्रकारांसमोर चुप्पीच साधली. गेल्या तीन दिवसांपासून ते पत्रकारांपुढे येतात, मात्र कसल्याही प्रकारची माहिती उघड होणार नाही, याची ते कटाक्षाने काळजी घेत आहेत.