शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

नागपुरातील दोन ‘पॉलिटेक्निक’ महाविद्यालये होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 01:21 IST

एक काळ होता जेव्हा ‘पॉलिटेक्निक’ अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडत होत्या. मात्र मागील काही वर्षांपासून ‘पॉलिटेक्निक’ला उतरती कळा लागली आहे. दरवर्षी रिक्त जागांची संख्या वाढत चालली आहे. यातूनच नागपुरातून जुन्या महाविद्यालयांपैकी असलेल्या दत्ता मेघे पॉलिटेक्निक व केडीके नागपूर पॉलिटेक्निक बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या महाविद्यालयांनी तसा अर्जच ‘एआयसीटीई’कडे दिला होता व काही दिवसातच संपूर्ण प्रक्रिया होऊन दोन्ही महाविद्यालये नेहमीसाठी बंद होणार आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या दुष्काळामुळे घेतला निर्णय : रिक्त जागांची डोकेदुखी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एक काळ होता जेव्हा ‘पॉलिटेक्निक’ अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडत होत्या. मात्र मागील काही वर्षांपासून ‘पॉलिटेक्निक’ला उतरती कळा लागली आहे. दरवर्षी रिक्त जागांची संख्या वाढत चालली आहे. यातूनच नागपुरातून जुन्या महाविद्यालयांपैकी असलेल्या दत्ता मेघे पॉलिटेक्निक व केडीके नागपूर पॉलिटेक्निक बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या महाविद्यालयांनी तसा अर्जच ‘एआयसीटीई’कडे दिला होता व काही दिवसातच संपूर्ण प्रक्रिया होऊन दोन्ही महाविद्यालये नेहमीसाठी बंद होणार आहेत.दत्ता मेघे पॉलिटेक्निकची स्थापना १९८३ साली झाली होती, तर ‘केडीके’ नागपूर पॉलिटेक्निकची स्थापना काही काळाने झाली. सुरुवातीच्या काळात या महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांचा प्रचंड ओढा होता व प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असायची. मात्र बदलत्या काळानुसार ‘पॉलिटेक्निक’कडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला. अर्ध्याहून अधिक जागा रिक्त राहायला लागल्या. मागील काही वर्षांपासून तर हे प्रमाण अधिक वाढले. नागपूर विभागात २० हजारांहून अधिक जागांपैकी ७० ते ८० टक्क्यांहून जागा रिक्त राहायला लागल्या. अशास्थितीत महाविद्यालयांना डोलारा सांभाळणे कठीण झाले होते. दोन्ही महाविद्यालयांतील रिक्त जागांचे प्रमाण प्रचंड वाढले होते.महाविद्यालयांतील खर्च, शिक्षक-कर्मचाऱ्यांचे वेतन, इतर सुविधा यांच्यावरील खर्च वाढला होता. त्यातुलनेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची संख्या फारच अत्यल्प होती. यातूनच महाविद्यालय प्रशासनांनी महाविद्यालये बंद करण्याचाच निर्णय घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली.यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाचे प्रभारी विभागीय सहसंचालक डॉ.चंद्रशेखर थोरात यांना संपर्क केला असता, त्यांनी या माहितीला दुजोरा दिला. या दोन्ही महाविद्यालयांकडून ‘बंद’चा अर्ज आला आहे. महाविद्यालये बंद करण्याचा प्रस्ताव त्यांनी अगोदर ‘एआयसीटीई’कडे पाठविला होता. तेथून मान्यता मिळाल्यानंतर संबंधित माहिती आता आमच्याकडे पाठविण्यात आली आहे. लवकरच पूर्ण प्रक्रिया होईल, असे त्यांनी सांगितले.जुन्या विद्यार्थ्यांचे नुकसान नाहीही महाविद्यालये बंद होणार असली म्हणजे जुन्या विद्यार्थ्यांचे नुकसान होईल असे नाही. मात्र यापुढे नवीन प्रवेश घेतले जाणार नाहीत. जुनी ‘बॅच’ बाहेर पडली की महाविद्यालये कायमस्वरूपी बंद होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.आणखी महाविद्यालये बंद होणार ?विभागातील ६२ महाविद्यालयांमध्ये २१ हजार जागा आहेत. या जागांसाठी केवळ पाच हजारांच्या जवळपास अर्ज आले आहेत. मागील वर्षीदेखील अशीच स्थिती होती. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पहिले प्राधान्य शासकीय ‘पॉलिटेक्निक’ महाविद्यालयाला आहे. एकट्या नागपूर शासकीय ‘पॉलिटेक्निक’ची क्षमता हजारहून अधिक आहे. येथे प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थी खासगी महाविद्यालयांचा विचार करतात. त्यामुळे इतर महाविद्यालयांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेदरम्यानदेखील महाविद्यालयांना निराशाच हाती लागते. त्यामुळेच आणखी महाविद्यालयांकडून बंद करण्याचा प्रस्ताव पाठविल्या जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :collegeमहाविद्यालयnagpurनागपूर