शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

नागपुरातील दोन ‘पॉलिटेक्निक’ महाविद्यालये होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 01:21 IST

एक काळ होता जेव्हा ‘पॉलिटेक्निक’ अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडत होत्या. मात्र मागील काही वर्षांपासून ‘पॉलिटेक्निक’ला उतरती कळा लागली आहे. दरवर्षी रिक्त जागांची संख्या वाढत चालली आहे. यातूनच नागपुरातून जुन्या महाविद्यालयांपैकी असलेल्या दत्ता मेघे पॉलिटेक्निक व केडीके नागपूर पॉलिटेक्निक बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या महाविद्यालयांनी तसा अर्जच ‘एआयसीटीई’कडे दिला होता व काही दिवसातच संपूर्ण प्रक्रिया होऊन दोन्ही महाविद्यालये नेहमीसाठी बंद होणार आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या दुष्काळामुळे घेतला निर्णय : रिक्त जागांची डोकेदुखी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एक काळ होता जेव्हा ‘पॉलिटेक्निक’ अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडत होत्या. मात्र मागील काही वर्षांपासून ‘पॉलिटेक्निक’ला उतरती कळा लागली आहे. दरवर्षी रिक्त जागांची संख्या वाढत चालली आहे. यातूनच नागपुरातून जुन्या महाविद्यालयांपैकी असलेल्या दत्ता मेघे पॉलिटेक्निक व केडीके नागपूर पॉलिटेक्निक बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या महाविद्यालयांनी तसा अर्जच ‘एआयसीटीई’कडे दिला होता व काही दिवसातच संपूर्ण प्रक्रिया होऊन दोन्ही महाविद्यालये नेहमीसाठी बंद होणार आहेत.दत्ता मेघे पॉलिटेक्निकची स्थापना १९८३ साली झाली होती, तर ‘केडीके’ नागपूर पॉलिटेक्निकची स्थापना काही काळाने झाली. सुरुवातीच्या काळात या महाविद्यालयाकडे विद्यार्थ्यांचा प्रचंड ओढा होता व प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असायची. मात्र बदलत्या काळानुसार ‘पॉलिटेक्निक’कडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला. अर्ध्याहून अधिक जागा रिक्त राहायला लागल्या. मागील काही वर्षांपासून तर हे प्रमाण अधिक वाढले. नागपूर विभागात २० हजारांहून अधिक जागांपैकी ७० ते ८० टक्क्यांहून जागा रिक्त राहायला लागल्या. अशास्थितीत महाविद्यालयांना डोलारा सांभाळणे कठीण झाले होते. दोन्ही महाविद्यालयांतील रिक्त जागांचे प्रमाण प्रचंड वाढले होते.महाविद्यालयांतील खर्च, शिक्षक-कर्मचाऱ्यांचे वेतन, इतर सुविधा यांच्यावरील खर्च वाढला होता. त्यातुलनेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची संख्या फारच अत्यल्प होती. यातूनच महाविद्यालय प्रशासनांनी महाविद्यालये बंद करण्याचाच निर्णय घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली.यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाचे प्रभारी विभागीय सहसंचालक डॉ.चंद्रशेखर थोरात यांना संपर्क केला असता, त्यांनी या माहितीला दुजोरा दिला. या दोन्ही महाविद्यालयांकडून ‘बंद’चा अर्ज आला आहे. महाविद्यालये बंद करण्याचा प्रस्ताव त्यांनी अगोदर ‘एआयसीटीई’कडे पाठविला होता. तेथून मान्यता मिळाल्यानंतर संबंधित माहिती आता आमच्याकडे पाठविण्यात आली आहे. लवकरच पूर्ण प्रक्रिया होईल, असे त्यांनी सांगितले.जुन्या विद्यार्थ्यांचे नुकसान नाहीही महाविद्यालये बंद होणार असली म्हणजे जुन्या विद्यार्थ्यांचे नुकसान होईल असे नाही. मात्र यापुढे नवीन प्रवेश घेतले जाणार नाहीत. जुनी ‘बॅच’ बाहेर पडली की महाविद्यालये कायमस्वरूपी बंद होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.आणखी महाविद्यालये बंद होणार ?विभागातील ६२ महाविद्यालयांमध्ये २१ हजार जागा आहेत. या जागांसाठी केवळ पाच हजारांच्या जवळपास अर्ज आले आहेत. मागील वर्षीदेखील अशीच स्थिती होती. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पहिले प्राधान्य शासकीय ‘पॉलिटेक्निक’ महाविद्यालयाला आहे. एकट्या नागपूर शासकीय ‘पॉलिटेक्निक’ची क्षमता हजारहून अधिक आहे. येथे प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थी खासगी महाविद्यालयांचा विचार करतात. त्यामुळे इतर महाविद्यालयांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियेदरम्यानदेखील महाविद्यालयांना निराशाच हाती लागते. त्यामुळेच आणखी महाविद्यालयांकडून बंद करण्याचा प्रस्ताव पाठविल्या जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :collegeमहाविद्यालयnagpurनागपूर