शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

गांधीसागरात बुडाले दोन कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:16 IST

उपराजधानीचे वैभव असलेल्या गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व विकास करण्यावर गेल्या वर्षभरात दोन कोटींहून अधिक खर्च करण्यात आला.

ठळक मुद्देविसर्जन टँकमुळे दुर्गंधी : फाऊंटन पाण्यात बुडाले, लावलेली झाडे बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीचे वैभव असलेल्या गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व विकास करण्यावर गेल्या वर्षभरात दोन कोटींहून अधिक खर्च करण्यात आला. परंतु ९५ लाख खर्च करून बांधण्यात आलेल्या विसर्जन टँकमध्ये साचलेला कचरा व निर्माल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. टँक लिकेज असल्याने तलावात घाण पाणी पाझरते. १७ लाखांहून अधिक खर्च करून बांधलेले फाऊंटन पाण्यात बुडाले आहे. ७२ लाखांची खाऊ गल्ली धूळखात आहे. अन्य प्रकल्पांचीही अशीच अवस्था झाल्याने महापालिकेचे दोन कोटी पाण्यात बुडाले आहे.गांधीसागर तलावातील पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी तलावाच्या एका कोपºयात मूर्ती विसर्जन टँक बांधण्यात आला आहे. परंतु काम निकृष्ट केल्याने यातील दूषित पाणी तलावात पाझरते. १.४४ लाखांचा खर्च करून तलावाच्या काठावर चाफा झाडांची लागवड करण्यात आली होती. फाऊंटनवर १७.३० लाख, उद्यानावर १५ लाख, उद्यानातील शौचालयावर २७ लाख तर रंगरंगोटी व स्वच्छतेवर ५.५० लाखांचा खर्च करण्यात आला. शौचालये व खाऊ गल्ली अशा विकास कामांवर २ कोटी १० लाखांचा खर्च गेल्या वर्षभरात करण्यात आला. परंतु गांधीसागर तलाव परिसरात फेरफटका मारला तर करण्यात आलेला खर्च पाण्यात गेल्याचे निदर्शनास येते.प्रदूषण थांबले नाहीमूर्ती विसर्जनामुळे होणारे तलावाचे प्रदूषण थांबावे या हेतूने तलावाच्या काठावर टँक बांधण्यात आला आहे. परंतु यात कचरा व निर्माल्य अजूनही साचलेले आहे. यामुळे दुर्गंधी पसरल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. टँक लिकेज असल्याने दूषित पाणी तलावात पाझरते. यामुळे तलावाचे प्रदूषण होते.फाऊंटन कधी बंद कधी सुरूगांधीसागर तलावाच्या सौदर्यात भर पडावी, यासाठी फाऊंटन उभारण्यात आले आहे. यावर १७ लाख ३० हजारांचा खर्च करण्यात आला आहे. परंतु फाऊंटन कधी बंद तर कधी सुरू असते. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने गेल्या काही महिन्यांपासून फाऊंटन बंद आहे.शौचालयावर २७ लाखांचा खर्चचाचा नेहरू उद्यानात २७ लाख खर्च करून शौचालय उभारण्यात आले आहे. परंतु या कामावर इतका खर्च शक्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गांधीसागर परिसरातील दोन्ही उद्यानाच्या सौंदर्यीकरणावर ४० ते ५० लाखांचा खर्च करण्यात आला आहे. परंतु उद्यानात कचरा साचलेला असतो.गैरकारभाराची चौकशी करागांधीसागर परिसर, खाऊ गल्ली, शौचालय बांधकाम, उद्यानांची देखभाल व सौंदर्यीकरण, फाऊंटन अशा विविध कामांवर दोन कोटीहून अधिक खर्च करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात इतक्या खर्चाची कामे झालेली नाही. टँकचे काम निकृष्ट दर्जाचे असून फाऊंटन पाण्यात बुडाले आहे. शौचालयाच्या बांधकामातही गैरप्रकार असल्याने याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष राजेश कुंभलकर यांनी केली आहे. ं