शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

गांधीसागरात बुडाले दोन कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:16 IST

उपराजधानीचे वैभव असलेल्या गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व विकास करण्यावर गेल्या वर्षभरात दोन कोटींहून अधिक खर्च करण्यात आला.

ठळक मुद्देविसर्जन टँकमुळे दुर्गंधी : फाऊंटन पाण्यात बुडाले, लावलेली झाडे बेपत्ता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीचे वैभव असलेल्या गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व विकास करण्यावर गेल्या वर्षभरात दोन कोटींहून अधिक खर्च करण्यात आला. परंतु ९५ लाख खर्च करून बांधण्यात आलेल्या विसर्जन टँकमध्ये साचलेला कचरा व निर्माल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. टँक लिकेज असल्याने तलावात घाण पाणी पाझरते. १७ लाखांहून अधिक खर्च करून बांधलेले फाऊंटन पाण्यात बुडाले आहे. ७२ लाखांची खाऊ गल्ली धूळखात आहे. अन्य प्रकल्पांचीही अशीच अवस्था झाल्याने महापालिकेचे दोन कोटी पाण्यात बुडाले आहे.गांधीसागर तलावातील पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी तलावाच्या एका कोपºयात मूर्ती विसर्जन टँक बांधण्यात आला आहे. परंतु काम निकृष्ट केल्याने यातील दूषित पाणी तलावात पाझरते. १.४४ लाखांचा खर्च करून तलावाच्या काठावर चाफा झाडांची लागवड करण्यात आली होती. फाऊंटनवर १७.३० लाख, उद्यानावर १५ लाख, उद्यानातील शौचालयावर २७ लाख तर रंगरंगोटी व स्वच्छतेवर ५.५० लाखांचा खर्च करण्यात आला. शौचालये व खाऊ गल्ली अशा विकास कामांवर २ कोटी १० लाखांचा खर्च गेल्या वर्षभरात करण्यात आला. परंतु गांधीसागर तलाव परिसरात फेरफटका मारला तर करण्यात आलेला खर्च पाण्यात गेल्याचे निदर्शनास येते.प्रदूषण थांबले नाहीमूर्ती विसर्जनामुळे होणारे तलावाचे प्रदूषण थांबावे या हेतूने तलावाच्या काठावर टँक बांधण्यात आला आहे. परंतु यात कचरा व निर्माल्य अजूनही साचलेले आहे. यामुळे दुर्गंधी पसरल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. टँक लिकेज असल्याने दूषित पाणी तलावात पाझरते. यामुळे तलावाचे प्रदूषण होते.फाऊंटन कधी बंद कधी सुरूगांधीसागर तलावाच्या सौदर्यात भर पडावी, यासाठी फाऊंटन उभारण्यात आले आहे. यावर १७ लाख ३० हजारांचा खर्च करण्यात आला आहे. परंतु फाऊंटन कधी बंद तर कधी सुरू असते. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने गेल्या काही महिन्यांपासून फाऊंटन बंद आहे.शौचालयावर २७ लाखांचा खर्चचाचा नेहरू उद्यानात २७ लाख खर्च करून शौचालय उभारण्यात आले आहे. परंतु या कामावर इतका खर्च शक्य नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गांधीसागर परिसरातील दोन्ही उद्यानाच्या सौंदर्यीकरणावर ४० ते ५० लाखांचा खर्च करण्यात आला आहे. परंतु उद्यानात कचरा साचलेला असतो.गैरकारभाराची चौकशी करागांधीसागर परिसर, खाऊ गल्ली, शौचालय बांधकाम, उद्यानांची देखभाल व सौंदर्यीकरण, फाऊंटन अशा विविध कामांवर दोन कोटीहून अधिक खर्च करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात इतक्या खर्चाची कामे झालेली नाही. टँकचे काम निकृष्ट दर्जाचे असून फाऊंटन पाण्यात बुडाले आहे. शौचालयाच्या बांधकामातही गैरप्रकार असल्याने याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गांधीसागर उद्यान कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष राजेश कुंभलकर यांनी केली आहे. ं