शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षांचे मौनव्रत!

By admin | Updated: August 12, 2014 01:08 IST

जिल्हा परिषद सदस्यांनी ग्रामीण भागातील समस्या मार्गी लावाव्या, किमान त्यांनी सभागृहात आवाज उठवावा अशी लोकांची माफक अपेक्षा असते. परंतु सदस्यच मौनव्रत धारण करीत असेल तर अपेक्षा कुणाकडून

जिल्हा परिषद : सभागृहात एकदाही प्रश्न मांडला नाहीगणेश हूड - नागपूरजिल्हा परिषद सदस्यांनी ग्रामीण भागातील समस्या मार्गी लावाव्या, किमान त्यांनी सभागृहात आवाज उठवावा अशी लोकांची माफक अपेक्षा असते. परंतु सदस्यच मौनव्रत धारण करीत असेल तर अपेक्षा कुणाकडून करणार. १२ सदस्य अडीच वर्षापासून गप्प आहेत. या कालावधीत झालेल्या ११ सभात त्यांनी एकही प्रश्न मांडला नाही. एवढेच नव्हेतर त्यांनी चर्चेतही सहभाग घेतलेला नाही.जि.प.सदस्यांना आपल्या भागातील समस्या, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवता यावे, या हेतूने दर तीन महिन्यांनी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले जाते. एखाद्या तातडीच्या विषयावर वा सदस्यांनी मागणी केल्यास विशेष सभा बोलावली जाते. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कालावधी पुढील महिन्यात २० सप्टेंबरला संपत आहे. त्यांच्या कार्यकाळातील ही अखेरची सर्वसाधारण सभा आहे. गेल्या अडीच वर्षात ११ सभा झाल्या. जि.प.च्या ५९ सदस्यांपैकी १२ सदस्यानी सभागृहात एकदाही प्रश्न उपस्थित केला आहे. अखेरच्या सभेत तरी ते मौनव्रत सोडतील का असा प्रश्न लोकांना पडला आहे. गोपाल खंडाते, आशा खराडे, रामदास मरकाम, शांताराम मडावी, अंजिरा उईके, दीपक गेडाम, माया कुसुंबे, पुष्पा वाघाडे, शालू हटवार, दीपाली इंगोले आदींचा मौनव्रतीत समावेश आहे. काही सदस्य अडीच वर्षात एकदाच बोलले. १० सभात त्यांनीही मौनव्रत पाळले. विशेष म्हणजे यात भावी अध्यक्षांच्या शर्यतीत असलेल्या सदस्यांचाही समावेश आहे. मतदारांना विकासाची अपेक्षा असलेल्या प्रणिता कडू, अरुणा मानकर आदींनी एकदाच प्रश्न मांडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मार्च २०१२ ला सूत्रे स्वीकारली४३० मार्चच्या रात्री घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर ३१ मार्च २०१२ ला विद्यमान अध्यक्ष संध्या गोतमारे, उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी पदाची सूत्रे स्वीकारली होती. प्रथमच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व गोंडवाना गणतंत्र पाटी एकत्र आले होते. अध्यक्षांसह सभापतींचा कार्यकाळ २० सप्टेंबर २०१४ ला संपत असल्याने त्यांच्या कार्यकाळातील ही शेवटचीच सभा आहे. पुन्हा चमत्कार होण्याची शक्यता आहे.