शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

सोन्यात अडीच हजारांची वाढ! युद्धाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 21:51 IST

Nagpur News बुधवारी ५०,५०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात तब्बल अडीच हजारांची वाढ होऊन ५३ हजारांवर पोहोचले.

ठळक मुद्देआणखी भाववाढीची शक्यता

नागपूर : रशिया आणि युक्रेन या देशांमधील युद्धामुळे गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बुधवारी ५०,५०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात तब्बल अडीच हजारांची वाढ होऊन ५३ हजारांवर पोहोचले. त्यासोबतच चांदीच्या दरात प्रति किलो ३,५०० रुपयांची वाढ होऊन बुधवारच्या ६५,५०० रुपयांच्या तुलनेत भाव ६९ हजारांवर गेले. त्यामुळे व्यापारी आणि ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव पुढे आणखी किती वाढणार हे आता सांगणे कठीण असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.

बाजारात सकाळच्या सत्रात युद्धाचे वृत्त येताच सोने १३०० रुपयांनी आणि चांदी १४०० रुपयांनी वधारली. एक तासानंतर सोने पुन्हा २०० रुपयांनी वाढून ५२ हजार तर चांदी ४०० रुपयांनी वाढून ६७,३०० रुपयांवर गेली. त्यानंतर दुपारच्या सत्रात सोने ५०० रुपये आणि चांदीत १२०० रुपयांची वाढ झाली. अखेरच्या सत्रात सोने २०० रुपयांनी वाढून ५३ हजार आणि चांदी ५०० रुपयांची वाढ होऊन ६९ हजारांवर स्थिरावली. एकाच दिवसात सोन्यात अडीच हजार आणि चांदीत साडेतीन हजारांची वाढ झाली. युद्ध सुरूच राहिल्यास आणखी भाववाढीची शक्यता असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.

टॅग्स :Goldसोनं