शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

महिनाभरात ग्रामीणमध्ये डेंग्यूचे दुप्पट रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:09 IST

नागपूर : गेल्या तीन महिन्यापासून ग्रामीण भागात डेंग्यूने चांगलेच थैमान घातले आहे. २० ऑगस्ट रोजी जिल्ह्यात डेंग्यूचे ४६० ...

नागपूर : गेल्या तीन महिन्यापासून ग्रामीण भागात डेंग्यूने चांगलेच थैमान घातले आहे. २० ऑगस्ट रोजी जिल्ह्यात डेंग्यूचे ४६० रुग्ण होते. २० सप्टेंबरपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार १०८२ रुग्ण नोंदविण्यात आले. यात ५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे.

कोरोनापाठोपाठ डेंग्यूने सुमारे तीन महिन्यापासून ग्रामीण भागात चांगलेच थैमान घातले आहे. सर्वाधिक २५० रुग्ण एकट्या कुही तालुक्यात आढळले आहेत. जिल्ह्यात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जि.प. अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी आरोग्य विभाग व ग्रामपंचायतस्तरावर तणनाशक फवारणी, घरोघरी फॉगिंग करणे व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासह विविध उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले होते. तसेच ज्या खुल्या भूखंडावर पाणी साचत असेल त्या भूखंडधारकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र स्थानिकस्तरावर उपाययोजना राबविण्याबाबत उदासीनता असल्यामुळेच दिवसेंदिवस ग्रामीण भागात डेंग्यूचे रुग्ण वाढतच आहेत.

- खासगी उपचार करणाऱ्यांची नोंदच नाही

शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत १०८२ रुग्ण आढळलेले आहेत. मात्र खासगी डॉक्टरांकडे उपचार घेणाऱ्यांची कुठेही नोंद नाही. खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता चार हजारावर रुग्ण असू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.