शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

पेठ-नेरी मार्गावरील पुलाचे बारा वाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:17 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क धामणा : पेठ (काळडाेंगरी)-नेरी (मानकर) मार्गावरील वेणा नाल्यावर असलेला पूल पुराच्या पाण्यामुळे दाेन्ही बाजूंनी खरडून गेला ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

धामणा : पेठ (काळडाेंगरी)-नेरी (मानकर) मार्गावरील वेणा नाल्यावर असलेला पूल पुराच्या पाण्यामुळे दाेन्ही बाजूंनी खरडून गेला आहे. वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन हा खड्डेमय पुलावरून प्रवास करावा लागताे. खड्ड्यांमुळे अपघात हाेण्याची शक्यता बळावली असली, तरी या पुलाच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष द्यायला तयार नाही, असा आराेप या भागातील नागरिकांनी केला आहे.

खड्ड्यांमुळे या पुलासाेबतच पेठ (काळडाेंगरी)-नेरी (मानकर) या मार्गावरील चार किमीचा प्रवास धाेकादायक बनला आहे. या राेडवर वारंवार अपघात हाेत असल्याने, या राेडसह पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने दिली. याबाबत स्थानिक लाेकप्रतिनिधींनाही अवगत केले. मात्र, कुणीही लक्ष दिले नाही, असा आराेप नेरी (मानकर)च्या सरपंच सरपंच संगीता सूर्यवंशी यांच्यासह नागरिकांनी केला आहे.

यासाठी नेरी (मानकर) ग्रामपंचायत प्रशासनाने २५ जून व नंतर ऑगस्टमध्ये ठराव पारित केले आणि ते जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे पाठविले. यात राेडचे मजबुतीकरण व डांबरीकरण, तसेच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली. दुसऱ्यांदा घेण्यात आलेल्या ठरावात वर्क ऑर्डरही पाठविण्यात आला, परंतु अद्यापही कामाला सुरुवात करण्यात आली नाही.

या मार्ग व पुलावरील खड्डे गराेदर माता, रुग्ण, लहान मुले, वयाेवृद्ध नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकऱ्यांसह इतरांसाठी धाेकादायक ठरत असल्याने या दाेन्हींची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी सरपंच संगीता सूर्यवंशी, उपसरपंच कमलाकर आंदे यांच्यासह परिसरातील गावांमधील नागरिकांनी केली आहे.

...

राेडचीही वाईट अवस्था

पेठ (काळडाेंगरी)-नेरी (मानकर) हा चार किमीचा मार्ग नागपूर (ग्रामीण) व हिंगणा तालुक्याला जाेडणारा आहे. या मार्गाची सुरुवात नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरून हाेते. पावसामुळे पुलाप्रमाणेच या राेडवरही ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. काही ठिकाणी तर राेडवर डांबर शाेधूनही सापडत नाही. त्यामुळे पुलासाेबतच हा चार किमीचा प्रवासही वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे.