शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या निकालाला पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:06 IST

नागपूर : दहावीचा निकाल वेळेत लावण्यात राज्य शिक्षण मंडळाला यश आले. परंतु बारावीच्या निकालात मंडळापुढे पावसाचे विघ्न निर्माण झाले ...

नागपूर : दहावीचा निकाल वेळेत लावण्यात राज्य शिक्षण मंडळाला यश आले. परंतु बारावीच्या निकालात मंडळापुढे पावसाचे विघ्न निर्माण झाले आहे. राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने वीज, इंटरनेट सेवा खोळंबल्या आहे. त्यामुळे ऑनलाईन मूल्यांकनास अडचणी जात आहे. वेबसाईट सपोर्ट करीत नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

राज्य शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत लावण्याचे संकेत दिले होते. परंतु मूल्यांकनाची वेबसाईटच सुरुवातीचे दोन दिवस बंद होती. बोर्डाने ठरवून दिलेल्या निकषानुसार शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे गुणदान केले आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेले गुणदान बोर्डाने उपलब्ध करून दिलेल्या वेबसाईटवर भरायचे आहे. शिक्षण विभागाच्या बहुतांश वेबसाईटचे सर्व्हर सक्षम नसल्याने वेबसाईटमध्ये तांत्रिक अडचणी भेडसावत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा डाटा अपलोड करताना बराच कालावधी लागत आहे. अशातच गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाने थैमान घातले आहे. पूरपरिस्थितीमुळे वीज, इंटरनेटची व्यवस्था कोलमडली आहे. बोर्डाने मूल्यांकनासाठी २३ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. परंतु अजूनही अनेक शाळांचा डाटा वेबसाईटवर अपलोड व्हायचा आहे.

- मंडळाला निवेदन

मंडळाचे संकेतस्थळ १४ जुलैला सुरू होणार होते. ते १७ जुलैला सुरू झाले. ग्रामीण व शहरी भागात अनेक ठिकाणी नेटवर्कची समस्या आहे. निकाल २३ तारखेपर्यंत तयार करून ऑनलाईनवर भरणे व त्याच तारखेला सीलबंद लिफाफा सादर करावा, अशा सूचना असल्याने शिक्षक व मुख्याध्यापकांचा गोंधळ होऊन घाईने निकाल तयार झाल्यास चुका होऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे मूल्यांकन प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी डॉ. अशोक गव्हाणकर, अनिल गोतमारे, प्रा. दिलीप तडस, डॉ. अभिजित पोटले, विलास केरडे, प्रा. सी.एल. पाचपोर या शिक्षकांनी विभागीय सचिव माधुरी सावरकर यांच्याकडे केली.

- शिक्षण मंडळामार्फत उपलब्ध संगणकप्रणाली दोन दिवस उशिरा सुरु झाली, त्यातच नेटवर्कची संथगती, तांत्रिक व इतर अडचणीमुळे वेळेत मूल्यांकन करणे शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना अवघड आहे. अशात राज्यभरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे इंटरनेट व विजेची व्यवस्था खेळंबली आहे.

प्रा.सपन नेहरोत्रा, विभागीय कार्यवाह, शिक्षकभारती