शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचा निकाल जाहीर : नागपुरात मुलींची बाजी अन् यशाचे ‘चैतन्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 23:05 IST

गुरुवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. वाणिज्य, कला शाखांमध्ये मुलींनीच पहिला क्रमांक पटकावला आहे. निकालानंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दांत गुणवंतांचे कौतुक सुरू होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुरुवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. वाणिज्य, कला शाखांमध्ये मुलींनीच पहिला क्रमांक पटकावला आहे. निकालानंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दांत गुणवंतांचे कौतुक सुरू होते. बारावीच्या निकालाने ‘कोरोना’ काळात विद्यार्थ्यांना केवळ दिलासाच मिळालेला नाही तर स्वप्नांच्या पंखांना नवे बळ मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर जिल्ह्याचा निकाल ८.२१ टक्के तर नागपूर शहराचा निकाल ८.१२ टक्के वाढला हे विशेष.

विज्ञान शाखेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी येथील चैतन्य अय्यर याने ९९.२३ टक्के (६४५ गुण) प्राप्त करत अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्याच्यापाठोपाठ सोमलवार रामदासपेठ येथील विद्यार्थिनी सन्मती पांडे ही ९७.२ टक्के (६३२ गुण) प्राप्त करत दुसऱ्या क्रमांकावर आली. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रथमेश ढवळे याने ९७.०८ टक्क्यांसह (६३१ गुण) तिसरा क्रमांक मिळविला.वाणिज्य शाखेत सी.बी.आदर्श विद्या मंदिरची विद्यार्थिनी आयुषी नवगाजे ही ९६.१५ टक्के (६२५ गुण) प्राप्त करत प्रथम आली. तर याच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी गुंजन सहा व यशा दशोत्तर यांनी ९६ टक्के (६२४ गुण) मिळवत दुसरा क्रमांक मिळविला.कला शाखेतून ‘एलएडी’ महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी वैभवी कोहळे हिने ९४.१५ टक्के ( ६१२ गुण) मिळवत पहिले स्थान पटकाविले तर तेथीलच श्रेया दवे हिने ९४ टक्क्यांसह (६११ गुण) दुसऱ्या स्थानावर आली. ‘एमसीव्हीसी’मध्ये सिद्ध भोंगाडे हा टक्क्यांसह पहिल्या स्थानावर आला.विज्ञान शाखा१ चैतन्य अय्यर डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय ९९.२३ %२ सन्मती पांडे सोमलवार कनिष्ठ महाविद्यालय, रामदासपेठ ९७.२० %३ प्रथमेश ढवळे शिवाजी विज्ञान महाविद्यालय ९७.०८ %वाणिज्य शाखा१ आयुषी नवगाजे सी.बी.आदर्श विद्या मंदिर ९६.१५ %२ गुंजन सहा सी.बी.आदर्श विद्या मंदिर ९६.०० %२ यशा दशोत्तर सी.बी.आदर्श विद्या मंदिर ९६.०० %३ कामाख्या नाडगे एल.ए.डी.कनिष्ठ महाविद्यालय ९५.६९ %३ समिक्षा भिडकर डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय ९५.६९ %कला शाखा१ वैभवी कोहळे एल.ए.डी.कनिष्ठ महाविद्यालय ९४.१५ %२ श्रेया दवे एल.ए.डी.कनिष्ठ महाविद्यालय ९४.०० %३ अनुश्री वखरे एल.ए.डी.कनिष्ठ महाविद्यालय ९३.५४ %विभाग, जिल्ह्यात विद्यार्थिनींचीच बाजीनागपूर विभागातून ७६,८९० पैकी ७२,३७६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.१३ टक्के इतकी आहे तर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ८९.२६ टक्के इतके आहे. नागपूर जिल्ह्याच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर ३०,२३८ पैकी २८,७१५ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९४.९६ टक्के इतके आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही आकडेवारी १.७५ टक्क्यांनी अधिक आहे. नागपूर जिल्ह्यातून ९०.१६ टक्के मुले उत्तीर्ण झाली. संपूर्ण जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.५३ टक्के इतका राहिला.नागपूर जिल्ह्यातील उत्तीर्णांची टक्केवारी              सहभागी     उत्तीर्ण     टक्केवारीविद्यार्थी ३०,९५४     २७,९०९    ९०.१६विद्यार्थिनी ३०,२३८  २८,७१५  ९४.९६एकूण       ६१,१९२    ५६,६२४  ९२.५३उपराजधानीतील उत्तीर्णांची टक्केवारी             सहभागी   उत्तीर्ण     टक्केवारीविद्यार्थी १८,५७०     १६,८३७    ९०.६७विद्यार्थिनी १८,८८५  १७,९८१    ९५.२१एकूण      ३७,४५५ ३४,८१८    ९२.९६गुणपडताळणीसाठी २७ जुलैपर्यंत अर्ज१७ जुलैपासून गुणपडताळणी व छायाप्रतिसाठी ऑललाईन अर्ज करता येणार आहे. अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी गुणपत्रिकेच्या स्वसाक्षांकित प्रतिसह २७ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर ५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन शुल्क भरता येणार आहे.उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यापासून पुढील पाच दिवसांत पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. त्यासाठी शुल्क भरुन संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे, अशी माहिती मंडळाचे विभागीय अध्यक्ष डॉ.रविकांत देशपांडे यांनी दिली आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालnagpurनागपूर