शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

बारावीचा निकाल जाहीर : नागपुरात मुलींची बाजी अन् यशाचे ‘चैतन्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 23:05 IST

गुरुवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. वाणिज्य, कला शाखांमध्ये मुलींनीच पहिला क्रमांक पटकावला आहे. निकालानंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दांत गुणवंतांचे कौतुक सुरू होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुरुवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. वाणिज्य, कला शाखांमध्ये मुलींनीच पहिला क्रमांक पटकावला आहे. निकालानंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दांत गुणवंतांचे कौतुक सुरू होते. बारावीच्या निकालाने ‘कोरोना’ काळात विद्यार्थ्यांना केवळ दिलासाच मिळालेला नाही तर स्वप्नांच्या पंखांना नवे बळ मिळाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर जिल्ह्याचा निकाल ८.२१ टक्के तर नागपूर शहराचा निकाल ८.१२ टक्के वाढला हे विशेष.

विज्ञान शाखेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी येथील चैतन्य अय्यर याने ९९.२३ टक्के (६४५ गुण) प्राप्त करत अव्वल क्रमांक पटकावला आहे. त्याच्यापाठोपाठ सोमलवार रामदासपेठ येथील विद्यार्थिनी सन्मती पांडे ही ९७.२ टक्के (६३२ गुण) प्राप्त करत दुसऱ्या क्रमांकावर आली. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रथमेश ढवळे याने ९७.०८ टक्क्यांसह (६३१ गुण) तिसरा क्रमांक मिळविला.वाणिज्य शाखेत सी.बी.आदर्श विद्या मंदिरची विद्यार्थिनी आयुषी नवगाजे ही ९६.१५ टक्के (६२५ गुण) प्राप्त करत प्रथम आली. तर याच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी गुंजन सहा व यशा दशोत्तर यांनी ९६ टक्के (६२४ गुण) मिळवत दुसरा क्रमांक मिळविला.कला शाखेतून ‘एलएडी’ महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी वैभवी कोहळे हिने ९४.१५ टक्के ( ६१२ गुण) मिळवत पहिले स्थान पटकाविले तर तेथीलच श्रेया दवे हिने ९४ टक्क्यांसह (६११ गुण) दुसऱ्या स्थानावर आली. ‘एमसीव्हीसी’मध्ये सिद्ध भोंगाडे हा टक्क्यांसह पहिल्या स्थानावर आला.विज्ञान शाखा१ चैतन्य अय्यर डॉ.आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय ९९.२३ %२ सन्मती पांडे सोमलवार कनिष्ठ महाविद्यालय, रामदासपेठ ९७.२० %३ प्रथमेश ढवळे शिवाजी विज्ञान महाविद्यालय ९७.०८ %वाणिज्य शाखा१ आयुषी नवगाजे सी.बी.आदर्श विद्या मंदिर ९६.१५ %२ गुंजन सहा सी.बी.आदर्श विद्या मंदिर ९६.०० %२ यशा दशोत्तर सी.बी.आदर्श विद्या मंदिर ९६.०० %३ कामाख्या नाडगे एल.ए.डी.कनिष्ठ महाविद्यालय ९५.६९ %३ समिक्षा भिडकर डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय ९५.६९ %कला शाखा१ वैभवी कोहळे एल.ए.डी.कनिष्ठ महाविद्यालय ९४.१५ %२ श्रेया दवे एल.ए.डी.कनिष्ठ महाविद्यालय ९४.०० %३ अनुश्री वखरे एल.ए.डी.कनिष्ठ महाविद्यालय ९३.५४ %विभाग, जिल्ह्यात विद्यार्थिनींचीच बाजीनागपूर विभागातून ७६,८९० पैकी ७२,३७६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.१३ टक्के इतकी आहे तर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ८९.२६ टक्के इतके आहे. नागपूर जिल्ह्याच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर ३०,२३८ पैकी २८,७१५ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९४.९६ टक्के इतके आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही आकडेवारी १.७५ टक्क्यांनी अधिक आहे. नागपूर जिल्ह्यातून ९०.१६ टक्के मुले उत्तीर्ण झाली. संपूर्ण जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.५३ टक्के इतका राहिला.नागपूर जिल्ह्यातील उत्तीर्णांची टक्केवारी              सहभागी     उत्तीर्ण     टक्केवारीविद्यार्थी ३०,९५४     २७,९०९    ९०.१६विद्यार्थिनी ३०,२३८  २८,७१५  ९४.९६एकूण       ६१,१९२    ५६,६२४  ९२.५३उपराजधानीतील उत्तीर्णांची टक्केवारी             सहभागी   उत्तीर्ण     टक्केवारीविद्यार्थी १८,५७०     १६,८३७    ९०.६७विद्यार्थिनी १८,८८५  १७,९८१    ९५.२१एकूण      ३७,४५५ ३४,८१८    ९२.९६गुणपडताळणीसाठी २७ जुलैपर्यंत अर्ज१७ जुलैपासून गुणपडताळणी व छायाप्रतिसाठी ऑललाईन अर्ज करता येणार आहे. अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी गुणपत्रिकेच्या स्वसाक्षांकित प्रतिसह २७ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर ५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन शुल्क भरता येणार आहे.उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यापासून पुढील पाच दिवसांत पूनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येईल. त्यासाठी शुल्क भरुन संकेतस्थळावर अर्ज करावा लागणार आहे, अशी माहिती मंडळाचे विभागीय अध्यक्ष डॉ.रविकांत देशपांडे यांनी दिली आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालnagpurनागपूर