शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

तूरडाळ स्वस्त झाली पण, किरकोळमध्ये महागच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:07 IST

मोरेश्वर मानापुरे नागपूर : केंद्र सरकारने ऑक्टोबरपर्यंत तूर, मूग आणि उडदाच्या आयातीवरील निर्बंध हटविल्याने गेल्या २० दिवसात तुरीसह डाळीचे ...

मोरेश्वर मानापुरे

नागपूर : केंद्र सरकारने ऑक्टोबरपर्यंत तूर, मूग आणि उडदाच्या आयातीवरील निर्बंध हटविल्याने गेल्या २० दिवसात तुरीसह डाळीचे दर ठोक बाजारात क्विंटलमागे तब्बल १५०० रुपयांनी उतरले आहेत. याशिवाय मूग व उडद मोगरचे दर ५०० ते ६०० रुपयांनी झाले आहेत. उच्च प्रतीची तूरडाळ सध्या प्रतिकिलो १०० रुपये आहे, हे विशेष. आयातीवरील निर्बंध हटविल्यापूर्वी तूरडाळीचे दर १०५ ते १२० रुपयांवर पोहोचले होते. पण आता दर उतरल्यानंतरही किरकोळ दुकानदार पूर्वीची खरेदी असल्याचे कारण सांगून दर कमी करण्यास तयार नाहीत. स्थानिक ठोक बाजारात दर उतरल्यानंतरही ग्राहकांना जास्त भावात तूरडाळाची खरेदी करावी लागत आहे. केंद्र सरकारने एकाच दिवसात निर्णय घेतला, पण जुन्या दरात डाळ खरेदी केली आहे. तोटा सहन करून विकता येणार नाही. जुना माल संपल्यानंतर अस्तित्वातील दरात विक्री करू, असे विक्रेत्यांनी सांगितले.

इतवारी धान्य बाजाराचे सचिव प्रताप मोटवानी म्हणाले, तूरडाळीचे भाव वाढल्यानंतर शेतकऱ्यांना तुरीसाठी प्रतिक्विंटल ७५०० रुपयांपर्यंत भाव मिळायचे. पण निर्बंध हटताच भाव १३०० रुपयांनी कमी झाले. त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. निर्बंध हटविण्यापूर्वी परवानाधारक व्यापाऱ्याला वर्षभरात तूर ३ लाख, मूग व उडीद प्रत्येकी दीड लाख टन आयात करण्याची परवानगी होती. पण आता व्यापारी कितीही प्रमाणात आयात करू शकतो. केंद्राने निर्बंध हटविताना व्यापाऱ्यांच्या स्टॉकची तपासणी करण्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे बाजारात खळबळ उडाली होती. त्याचाच परिणाम म्हणून भाव मोठ्या प्रमाणात कमी झाले. तूर, मूग व उडदाची आयात बर्मा, टांझानिया आणि दक्षिण अफ्रिकन देशातून होते. तर चणा ऑस्ट्रेलियातून येतो. आयात वाढल्यानंतर भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा सर्वाधिक फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे. लॉकडाऊनमुळे आधीच बाजारात मंदीचे वातावरण आहे. व्यापाऱ्यांची उधारी फसली असून अनेकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

भाव घसरणीचा ग्राहकांचा फायदा होणार

पूर्वी ७५ रुपये किलोवर गेलेले तुरीचे दर आता ६२ रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तसेच मूग व उडदाचे भाव क्विंटलमागे ५०० रुपयांनी कमी होऊन ६८०० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. याशिवाय मूग मोगर प्रति क्विंटल दर्जानुसार ८५०० ते १० हजार आणि उडद मोगर ८५०० ते १०,५०० रुपयांपर्यंत भाव आहेत. त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. याशिवाय चना आणि चणा डाळीचेही भाव कमी झाले आहेत. चणा ५ हजार ते ५४०० रुपये आणि डाळ ६ हजार ते ६६०० रुपये प्रति क्विंटल आहे.

डाळींचे दर्जानुसार प्रतिकिलो भाव :

तूर ७५ रुपये

तूरडाळ ८८ ते १०० रुपये

मूग ७३ रुपये

मूग मोगर ९० ते १०५ रुपये

उडीद ७३ रुपये

उडद मोगर ९० ते ११० रुपये

चणा ५२ रुपये

चणाडाळ ६२ ते ७० रुपये