शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

तूर डाळ १०० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2016 02:47 IST

मुंबईमध्ये जप्त करण्यात आलेली १० हजार क्ंिवटल तूर डाळ नागपुरात १०० रुपये किलो प्रमाणे खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुंबईत झाली होती जप्ती : रविवारपासून नागपुरात विक्री नागपूर : मुंबईमध्ये जप्त करण्यात आलेली १० हजार क्ंिवटल तूर डाळ नागपुरात १०० रुपये किलो प्रमाणे खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापैकी ४ हजार क्ंिवटल तूर डाळीची पहिली खेप नागपुरात दाखल झाली आहे. येत्या १५ मेपासून ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली. मुंबईत जप्त करण्यात आलेली ही तूर डाळ नागपूर शहरातील २५ केंद्रावरून तर ग्रामीण भागात ५ केंद्रावरून १०० रुपये किलो या प्रमाणे विक्री करण्यात येईल. ही डाळ ज्या दुकानांमध्ये उपलब्ध राहील, ती पुढीलप्रमाणे आहेत. सीताबर्डी, निर्मलानगर, अंबाझरी, बुटीबोरी इंडस्ट्रीज, फ्रेण्ड्स कॉलनी, दत्तात्रयनगर, सोमलवाडा, जयप्रकाशनगर येथील अपना भंडार केंद्रावर उपलब्ध राहील. याशिवाय महेशचंद्र शंकरलाल अग्रवाल (सदर), रितेश ट्रेडिंग कंपनी (सदर), प्रकाश प्रोव्हीजन्स (मोहननगर), शिवधान्य भंडार (हनुमाननगर), चौकोनी मैदान वार्ड क्रमांक ९, प्रियंका धान्य भंडार (पंचशीलनगर), डीएम अग्रवाल ) रविनगर, भारती इंटरप्रायजेस व संगम कंन्झुमर्स को.आॅप. सोसायटी हेमू कॉलनी (जरीपटका), श्याम किराणा स्टोअर्स (गड्डीगोदाम), कंवरराम कंझुमर्स (आहुजानगर जरीपटका), माता बम्लेश्वरी, स्वस्त धान्य दुकान वॉर्ड क्रमांक १४ नागपूर, न्यू सुभाष कन्झ्युमर्स सोसायटी वॉर्ड क्रमांक २१ नागपूर, नवयुवक सहकारी संस्था वॉर्ड क्रमांक १५ नागपूर, सप्तरंग सहकारी संस्था वॉर्ड क्रमांक २२ नागपूर, मेघा धान्य भंडार हावरापेठ वॉर्ड क्रमांक १४ नागपूर, मागासवर्गीय सहकारी संस्था आहुजानगर वॉर्ड क्रमांक ५७ नागपूर येथे उपलब्ध राहील. नागपूर ग्रामीणमध्ये श्री ट्रेडर्स काटोल, रतनलाल बरबटे व मुरलीधर झोपट कामठी, आर.एस. मोहने भंडारबोडी व डी.वाय. चिचखेडे मनसर ता. रामटेक येथे उपलब्ध होईल. (प्रतिनिधी)नागरिकांना आवाहन येत्या काळात नागपूर शहर व ग्रामीण भागातील इतर परवानाधारकांकडून आवश्यकतेनुसार साठा उपलब्ध असेपर्यंत तूरडाळीचे वाटप करण्याचा मानस आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, यासंदर्भात काही तक्रारी असल्यास अन्न धान्य वितरण अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले.