शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आता शाळांचे होणार ट्युनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 09:55 IST

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी दोन शाळांमध्ये ट्युनिंग साधण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करीत आहे. राज्यातील प्रत्येक केंद्रातून यासाठी दोन शाळा निवडायच्या आहेत.

ठळक मुद्देप्रत्येक केंद्रातून दोन शाळा जोडणार शिक्षणासोबत भौतिक सुविधांचेही सहकार्य

ऑनलाईन लोकमत्नागपूर : शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी भारत सरकार व राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अनेकवेळा निरनिराळे प्रयोग करून उपक्रम राबविले. याअंतर्गत आता दोन शाळांमध्ये ट्युनिंग साधण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करीत आहे. राज्यातील प्रत्येक केंद्रातून यासाठी दोन शाळा निवडायच्या आहेत. त्यातील एक शाळा शाळासिद्धीमध्ये ‘अ’ श्रेणीत येणे आवश्यक आहे.सदर उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण आयुक्त व शिक्षण सचिव यांनी सर्वांगीण गुणवत्ता विकास (सगुण) (ट्युनिंग ऑफ स्कूल) कार्यक्रमांतर्गत केंद्रप्रमुखांना माहिती गोळा करण्याचे काम दिले आहे. यासंदर्भातील आदेश जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.राज्यातील ४,८६० ग्रामीण भागातील समूह साधन केंद्र व शहरी भागातील शहर साधन केंद्रातील केंद्रप्रमुखांना केंद्रातील शाळांमधून शाळा सिद्धीमध्ये ‘अ’ श्रेणीप्राप्त एका शाळेची निवड करून, दुसरी एक शाळा जोडावयाची आहे. या निवडलेल्या दोन शाळांमध्ये सहकार्य घेणे व सहकार्य देणे अशा सामंजस्य आंतरक्रिया घडवून आणणे, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सात मुद्यांवर सहकार्य घेण्यास व सहकार्य करण्यास तयार आहे किंवा कसे? याबाबत स्पष्टपणे माहिती केंद्रप्रमुखांना नोंदवायची आहे.

केंद्रप्रमुखाची रिक्त पदे भरणे आवश्यकविद्या प्राधिकरणाचा ‘सगुण’ उपक्रम चांगला आहे. मात्र राज्यातील केंद्रप्रमुखांची ६० टक्के पदे रिक्त आहेत. या उपक्रमाची जबाबदारी केंद्रप्रमुखांवरच दिली आहे. शाळांच्या संख्यात्मक वाढीमुळे शाळांवर संनियंत्रण करण्यासाठी २४ वर्षांपूर्वी निश्चित करण्यात आलेल्या समूह साधन केंद्राची फेररचना करण्यात यावी तरच गुणवत्ता विकासास चालना मिळेल, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक, शिक्षकेतर सेनेचे राज्य सरचिटणीस शरद भांडारकर यांनी केली आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र