शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

तुम इतना जो मुस्कुरा रहे हो... : मजरुह व कैफी आझमी यांच्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:37 IST

उर्दू साहित्य जगतामध्ये उत्कृष्ट शायर म्हणून मजरुह सुलतानपुरी आणि कैफी आझमी यांचे नाव आदराने घेतले जाते. आपल्या रचनांमधून त्यांनी साहित्य, समाज आणि देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. या दोन्ही शायरांनी गीतकार म्हणूनही हिंदी सिनेमाची कारकीर्द गाजविली आहे. कैफींचे ‘कर चले हम फिदा...’ व मजरुह यांचे ‘वक्त ने किया क्या हंसी सितम...’ हे गीत देशभक्तीने ओतप्रोत आणि समाजाला आरसा दाखविणारे होते. या दोन महान शायरांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांच्या गीतांची मैफिल श्रोत्यांसाठी सजली.

ठळक मुद्देसिद्धीविनायक पब्लिसिटीचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उर्दू साहित्य जगतामध्ये उत्कृष्ट शायर म्हणून मजरुह सुलतानपुरी आणि कैफी आझमी यांचे नाव आदराने घेतले जाते. आपल्या रचनांमधून त्यांनी साहित्य, समाज आणि देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. या दोन्ही शायरांनी गीतकार म्हणूनही हिंदी सिनेमाची कारकीर्द गाजविली आहे. कैफींचे ‘कर चले हम फिदा...’ व मजरुह यांचे ‘वक्त ने किया क्या हंसी सितम...’ हे गीत देशभक्तीने ओतप्रोत आणि समाजाला आरसा दाखविणारे होते. या दोन महान शायरांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांच्या गीतांची मैफिल श्रोत्यांसाठी सजली.श्री सिद्धीविनायक पब्लिसिटीच्या ‘डायमंड फॉरेव्हर’ या संगीत उपक्रमात रविवारी मजरुह सुलतानपुरी आणि कैफी आझमी यांना स्वरांजली वाहण्यात आली. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाची संकल्पना श्री सिद्धीविनायकचे समीर पंडित यांची होती. सागर मधुमटके, अरविंद पाटील, सारंग जोशी, सोनाली दीक्षित आणि श्रेया खराबे या आघाडीच्या गायकांनी ही स्वरांची मैफिल सजविली. सोनाली यांनी ‘वक्त ने किया क्या हंसी सितम...’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. पुढे सारंग यांनी ‘तुम इतना जो मुस्कुरा रही हो..., ये नयन डरे डरे...’, पाटील यांच्या ‘तारो मे सजके..., एक दिन बिक जायेगा माटी के मोल...’, सागर यांनी ‘चला जाता हुं..., ओ मेरे दिल के चैन..., ठंडी हवा ये चांदनी सुहानी...’ तर श्रेया यांचे ‘बाहो मे चले आ...’ अशा सुरुवातीच्या गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. पुढे ‘ये दिल सुन रहा है..., माना हो तुम..., रुक जाना नही..., मेरी भीगी भीगी सी..., दिल पुकारे..., मेरा प्यार भी तू है..., ओ बेकरार दिल..., चलते चलते युंही कोई..., गुम है किसी के प्यार मे..., लुटे कोई मन का नगर..., वो तो है अलबेला..., रात अकेली है..., तुम जो मिल गये हो...’ अशा विविधांगी गीतांनी कार्यक्रम बहरत गेला.सुरेल साथसंगत करताना किबोर्डवर राजा राठोड, रुग्वेद पांडे (गिटार), अमर शेंडे (व्हायोलिन), प्रशांत नागमोते (तबला), विक्रम जोशी (तुंबा) व ऑक्टोपॅडवर राजू ठाकूर यांनी समा बांधला.

 

टॅग्स :musicसंगीतnagpurनागपूर