शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

उद्योगाला झुकते माप देण्याचा प्रयत्न : सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 01:18 IST

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : एमआयडीसीमध्ये पारदर्शक पद्धतीने प्लॉटचे वाटप केले आहे. ८० टक्यांपेक्षा जास्त भूखंड विकले गेले आहेत. छोट्या बैठकांमधून उद्योगांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. उद्योगाला झुकते माप देऊन महाराष्ट्र उद्योगात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग आणि खाण मंत्री सुभाष देसाई यांनी केले.विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए), बुटीबोरी ...

ठळक मुद्देव्हीआयए, बीएमए, एमआयएतर्फे सत्कार

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : एमआयडीसीमध्ये पारदर्शक पद्धतीने प्लॉटचे वाटप केले आहे. ८० टक्यांपेक्षा जास्त भूखंड विकले गेले आहेत. छोट्या बैठकांमधून उद्योगांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. उद्योगाला झुकते माप देऊन महाराष्ट्र उद्योगात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग आणि खाण मंत्री सुभाष देसाई यांनी केले.विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए), बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (बीएमए) आणि एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (एमआयए) हिंगणाच्या वतीने बुधवारी उद्योग भवनातील व्हीआयएच्या सभागृहात सुभाष देसाई यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. मंचावर एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, बीएमएचे अध्यक्ष नितीन लोणकर, एमआयएचे अध्यक्ष कॅ. सी.एम. रणधीर, व्हीआयएचे उपाध्यक्ष सुरेश राठी आणि सचिव डॉ. सुहास बुद्धे उपस्थित होते.देसाई म्हणाले, हिंगणा येथे विस्तारासाठी ४६ भूखंड वितरित केले असून १२ गाळेधारकांना प्लॉट देण्यात येणार आहे. बुटीबोरीत ईएसआयसी रुग्णालयासाठी ५ एकर जागा दिली आहे. बैठकीनुसार यापुढे ग्रामपंचायतींनी वसूल केलेल्या कराचा ५० टक्के वाटा एमआयडीसीला मिळेल. यावर ग्रामविकास मंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच अंमलबजावणी होईल. प्लास्टिक बंदीचा निर्णय अप्रिय आहे, पण पर्यावरण विभागाला तो सक्तीने घ्यावा लागला. संबंधित वस्तूंवरील बंदी चर्चेतून सुटू शकते. प्लास्टिकच्या बाटल्या तरंगताना दिसल्या तर त्यावरही बंदी येईल.अमरावती येथील ५०० हेक्टरवरील टेक्सटाईल पार्क यशस्वी झाला आहे. आता या प्रकल्पात ११२४ हेक्टरपर्यंत वाढ केली आहे. काही बाबतीत महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे, पण झारखंडशी तुलना करू नका. शासनासोबत करार केलेल्या उद्योजकांना उद्योग सुरू करण्याचे बंधन नसल्याचे देसाई म्हणाले.पदाधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सेठी म्हणाले, राज्यात अनेक औद्योगिक क्षेत्रात सीईटीपी नाही. ज्या ठिकाणी आहे, तिथे अद्ययावत करण्यात येत आहे. एमआयडीसी वित्तीय पुरवठ्यासाठी तयार आहे. बोर्ड बैठकीत निर्णय घेऊ. असोसिएशननेही त्यात सहभाग नोंदवावा. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट व सिव्हरेज ट्रीटमेंट प्रकल्पावर एमआयडीसी काम करीत आहे. आॅप्टिकल फायबर टाकण्यात असोसिएशनचा सहभाग असावा.संचालन सुहास बुद्धे यांनी केले. याप्रसंगी डिक्कीचे मध्य भारताचे अध्यक्ष निश्चय शेळके, बीएमएचे सचिव सीए मिलिंद कानडे, व्हीआयए महिला विंगच्या अध्यक्षा साची मलिक, व्हीआयएचे पदाधिकारी आणि विविध उद्योजक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईnagpurनागपूर