शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सर्वात स्वस्त कॅन्सरच्या उपचारासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 01:49 IST

राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा जो सेवाभाव आहे, त्याच आधारावर ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ची वाटचाल असणार आहे. केवळ सेवा हेच या संस्थेचे ध्येय, प्राथमिकता आणि ब्रीद असणार आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन:‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या प्रथम टप्प्याचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा जो सेवाभाव आहे, त्याच आधारावर ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’ची वाटचाल असणार आहे. केवळ सेवा हेच या संस्थेचे ध्येय, प्राथमिकता आणि ब्रीद असणार आहे. देशात सर्वात स्वस्त दरात कॅन्सरवर येथे उपचार होऊ शकेल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि यात आम्हाला नक्कीच यश मिळेल, असे विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केले.डॉ. आबाजी थत्ते सेवा आणि संशोधन संस्थेच्यावतीने आऊटर हिंगणा रिंगरोड, जामठा येथे ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या प्रथम टप्प्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या संस्थेचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी व टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या हस्ते झाले.संस्थेच्या प्रथम टप्प्यांतर्गत ‘रेडिओ आॅन्कोलॉजी, रेडिओ डायग्नोस्टिक’ सेवा सुरू करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय कोळसा ऊर्जा मंत्री पीयूष गोयल, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, खा. अजय संचेती, खा. कृपाल तुमाने, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, सन फार्मास्युटिकल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप सांघवी, आयटीसीचे संजीव पुरी, एस बँकेचे प्रबंध संचालक राणा कपूर, टाटा मेमोरियल ट्रस्टचे डॉ. कैलास शर्मा, पी. डी. हिंदुजा हॉस्पिटलचे डॉ. आशा कापडिया, रेडिएशन आॅन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. व्ही. एस. कन्नन, महापौर नंदा जिचकार व अ‍ॅड. सुनील मनोहर उपस्थित होते. पीयूष गोयल म्हणाले, ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट’च्या रूपात एक अद्ययावत हॉस्पिटल नागपूरसह संपूर्ण मध्यभारताला मिळाले आहे. धर्मेंद्र प्रधान म्हणाले, नागपुरात ही संस्था ५० वर्षांपूर्वीच सुरू व्हायला हवी होती. या पूर्वीच्या सरकारने आरोग्य क्षेत्रात या संदर्भात प्रयत्न करायला हवे होते.प्रास्ताविक डॉ. आनंद पाठक यांनी केले. संचालन मेघा दीक्षित यांनी केले तर आभार नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे महासचिव शैलेश जोगळेकर यांनी मानले.कॅन्सरवरील उपचारासाठी मुंबईत जाण्याची गरज नाहीनितीन गडकरी म्हणाले, विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील कॅन्सरच्या रुग्णांना उपचारासाठी मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही.गरिबांना चांगली आरोग्य सेवा देण्याचे लक्ष्य असावेटाटा ट्रस्टचे चेअरमन व प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा म्हणाले, मध्यभारतात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटची उभारणी होणे हे मध्यभारतातील कॅन्सरच्या रुग्णांसाठी चांगली बाब आहे. येथे टाटा मेमोरियल हॉस्पिटलसारखीच योग्य व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळेल.