शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

देशाचे खरे भाग्यविधाता आहेत पंडित नेहरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:45 IST

पंडित नेहरू यांच्या हाती देश आला तेव्हा देशाची अवस्था अतिशय बिकट होती. दर तीन वर्षाने दुष्काळ पडत होता. लाखो नागरिक दृष्काळात मृत्युमुखी पडत होते. शेती धड होत नव्हती, साधी टाचणीसुद्धा या देशात बनत नव्हती. अशा दुष्काळग्रस्त भारताला कृषी, उद्योग, रोजगार, अणुऊर्जा, क्षेपणास्त्र अशा सर्वच आघाड्यांवर पुढे नेणारे पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे खरे भाग्यविधाता आहेत. त्यांच्या प्रयत्नाने पहिल्याच पंचवार्षिक योजनेत देशाचा उत्पन्नाचा दर १८ टक्क्यांवर पोहचला होता. आज हा दर ६ टक्क्याच्या घरात असतानाही चांगला मानला जातो आहे, अशा शब्दात राजकीय विचारवंत व लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी पंडित नेहरूंवर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले.

ठळक मुद्देसुरेश द्वादशीवार : पंतप्रधान पंडित नेहरू यावर विशेष व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंडित नेहरू यांच्या हाती देश आला तेव्हा देशाची अवस्था अतिशय बिकट होती. दर तीन वर्षाने दुष्काळ पडत होता. लाखो नागरिक दृष्काळात मृत्युमुखी पडत होते. शेती धड होत नव्हती, साधी टाचणीसुद्धा या देशात बनत नव्हती. अशा दुष्काळग्रस्त भारताला कृषी, उद्योग, रोजगार, अणुऊर्जा, क्षेपणास्त्र अशा सर्वच आघाड्यांवर पुढे नेणारे पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे खरे भाग्यविधाता आहेत. त्यांच्या प्रयत्नाने पहिल्याच पंचवार्षिक योजनेत देशाचा उत्पन्नाचा दर १८ टक्क्यांवर पोहचला होता. आज हा दर ६ टक्क्याच्या घरात असतानाही चांगला मानला जातो आहे, अशा शब्दात राजकीय विचारवंत व लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी पंडित नेहरूंवर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरतर्फे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू या विषयावर सुरेश द्वादशीवर यांच्या व्याख्यानाचे आयोजन शनिवारी श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात करण्यात आले होते. व्याख्यानाला अध्यक्ष म्हणून प्रतिष्ठानेचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी उपस्थित होते. यावेळ द्वादशीवार यांनी नेहरुंनी पंतप्रधानांची सूत्र स्वीकारल्यानंतर त्यांच्यापुढे उभी ठाकलेली आव्हाने आणि त्यातून साधलेली देशाची प्रगती यावर विस्तृत भाष्य केले. नेहरूंना पंतप्रधान करून सरदार पटेलांना डावलल्याचे बोलले जाते. हा गैरसमज दूर करताना द्वादशीवार म्हणाले की, देश स्वतंत्र झाल्यानंतर सरदार पटेल हे ७२ वर्षाचे होते, शिवाय ते आजाराने ग्रस्त होते. त्यावेळी पंडित नेहरू हे केवळ ५८ वर्षाचे होते आणि सर्वांचे आवडते होते. काँग्रेसच्या वर्किंग कमिटीत सरदार पटेलांनी नेहरूंना पंतप्रधानपद देण्याची भूमिका मांडली होती. पटेलांनी कधी अन्याय झाला असे म्हटले नाही. पण पंतप्रधान मोदींनी पटेलांचे वकीलपत्र घेऊन त्याचे परिमार्जन करण्यासाठी पटेलांचे भव्य स्मारक उभारत आहे आणि त्यांचा पुतळा चीनमध्ये तयार केला जात आहे.दुष्काळ, दारिद्र्यात खितपत पडलेला हा देश नेहरूं च्या वाट्याला आला. भीक मागून त्यांनी हा देश उभा केला. तो जगविला आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या पूर्णत्वानंतर प्रगतीच्या वाटा सुकर केल्या. देशाच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन बसलेल्या नेहरूंना पक्षांतर्गतसुद्धा मोठे आव्हान होते. सरदार पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर त्यांची अडवणूक केली.आपली बाजू मांडताना त्यांनी पंतप्रधान पदसुद्धा त्यागण्याची भूमिका मांडली होती. त्याच काळात संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या चळवळी सुरू झाल्या होत्या. या सर्व चळवळींवर त्यांनी यशस्वी मात करून देशात लोकशाही रुजविली, संसदीय कार्यप्रणालीचा अंगीकार केला.त्यांचे अलिप्ततेचे धोरण ठरले प्रभावीदेशाची फाळणी सुरू असतानाच पाकिस्तानचे आक्रमण झाले. त्यावेळी पाकिस्तान व भारताची सेना सारखी होती. पण भारतात इतर चळवळी आक्रमक असल्याने सेना विखुरलेली होती. त्यामुळे काही अप्रिय निर्णय घ्यावे लागले, पण तो नेहरूंचा दुबळेपणा नव्हता. त्यावेळी असलेली लष्कराची शक्ती आणि बळ हेच प्रमुख कारण होते. फाळणीनंतर पाकिस्तान अमेरिकेच्या गोटात सामील झाला होता. महासत्ता असलेला रशिया भारताला प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे पंडित नेहरूंनी अलिप्ततेचे धोरण स्वीकारले. पुढे त्यांच्या धोरणाला १४० देशांनी पाठिंबा दिला. ते जगाचे नेते झाले. त्यामुळेच डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी नेहरूंना भारतरत्न बहाल केले असल्याचे द्वादशीवर म्हणाले.

 

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूYashwantrao Chavhanयशवंतराव चव्हाण